Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

High Court News : 48 मतांनी जिंकलेल्या खासदाराबाबत कोर्टाचा मोठा निर्णय; फेरमतमोजणीसाठी दाखल केली होती याचिका

रविंद्र वायकर यांना न्यायालयाने दिलासा दिला असून ठाकरे गटाचे नेते अमोल कीर्तिकर यांनी दाखल केलेली याचिका न्यायालयाने रद्द केली आहे. अतिशय अटीतटीच्या लढतीत वायकर यांनी ४८ मतांनी विजय मिळवला होता.

  • By संदीप गावडे
Updated On: Dec 19, 2024 | 05:10 PM
48 मतांनी जिंकलेल्या खासदाराबाबत कोर्टाचा मोठा निर्णय; फेरमतमोजणीसाठी दाखल केली होती याचिका

48 मतांनी जिंकलेल्या खासदाराबाबत कोर्टाचा मोठा निर्णय; फेरमतमोजणीसाठी दाखल केली होती याचिका

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा निवडणुकीत वायकर विरुद्ध कीर्तिकर असा सामना रंगला होता. अतिशय अटीतटीच्या लढतीत वायकर यांनी ४८ मतांनी विजय मिळवला होता. त्यावर आक्षेप घेत फेरमतमोजणीची मागणी करण्याच्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. रविंद्र वायकर यांना न्यायालयाने दिलासा दिला असून ठाकरे गटाचे नेते अमोल कीर्तिकर यांनी दाखल केलेली याचिका न्यायालयाने रद्द केली आहे.

मागील सहा महिन्यांपासून ही याचिका कोर्टात प्रलंबित होती. त्यामुळे सहा महिन्यांपासून या प्रकरणात नक्की काय होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अखेर मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या निकालाविरोधातील याचिका अखेर मुंबई हायकोर्टाने गुरूवारी निकाली काढली. 333 मते ही बोगस असल्याचा दावा कीर्तिकरांनी केला होता. हा दावा न्यायालयाने फेटाळून लावला.

नेमकं काय घडलं होतं?

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं. अनेक जागांवर अटीतटीच्या लढती पहायला मिळल्या. त्यापैकी एक मुंबई उत्तर-पश्चिम मदारासंघातील निवडणूक. या मतदारसंघात खूपच अटीतटीची लढत पहायला मिळाली आणि या लढतीत शिंदे गटाचे नेते रविंद्र वायकर यांचा अवघ्या 48 मतांनी विजय झाला होता. तर ठाकरे गटाच्या अमोल कीर्तिकरांचा पराभव झाला. मात्र या विजयावर आक्षेप घेणारी निवडणूक याचिका कीर्तिकरांनी जून महिन्यात हायकोर्टात दाखल केली होती. निकालाला स्थगिती देण्याची मागणी याचिकेत करण्यात आली होती. या याचिकेमध्ये अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते. मतमोजणीवेळी पारदर्शकता नसल्याचे आणि त्रुटी असल्याचा दावा त्यांनी केला होता.

निवडणूक आयोगाला मोकळ्या आणि पारदर्शक वातावरणात निवडणुकीचे व मतमोजणीचे काम करण्यात अपयश आले आहे. सातत्याने विजयाच्या दिशेने अग्रक्रमावर असलेल्या कीर्तिकर यांना विजयी घोषित करण्यात आलं होतं. मात्र पोस्टल बॅलेटची फेरमोजणी करण्याची मागणी रविंद्र वायकर यांच्यातर्फे करण्यात आली. या मतमोजणी अचानक रविंद्र वायकर 48 मतांनी विजयी करण्यात आलं.

निवडणूक अधिकारी कार्यालयात तात्पुरत्या सेवेत असलेल्या दिनेश गुरव या व्यक्तीचा मोबाईल फोन प्राजक्ता वायकर – महाले आणि नंतर मंगेश पांडिलकर यांनी मतमोजणीच्या वेळी व मतमोजणी सुरू असलेल्या ठिकाणी वापरण्यावर याचिकेत आक्षेप घेतलेला आहे. निवडणूक अधिकारी कार्यालयात दिनेश गुरव या व्यक्तीची तात्पुरती झालेली नेमणूक योग्य आहे का?, असा सवालही याचिकेत करण्यात आला होता.

खासगी कंपनीतील एखाद्या व्यक्तीची अशाप्रकारे तात्पुरती नेमणूक होऊ शकते का?, निवडणूक आयोगासोबत कार्यरत कोणतीही व्यक्ती मतमोजणीच्या ठिकाणी मोबाईल फोन घेऊन जाऊ शकतात का? असे प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. तसेचं निवडणूक रिटरनिंग अधिकारी वंदना सूर्यवंशी यांच्यापासून केवळ दोन फुटांच्या अंतरावर प्राजक्ता वायकर- महाले मोबाईल वापरताना त्यांनी आक्षेप का घेतला नाही, असंही याचिकेत म्हटलं आहे.

दरम्यान हाट कोर्टाने ही याचिका रद्द केली असून अमोल कीर्तिकरांना हा मोठा धक्का मानला जात आहे. आता कीर्तिकर सर्वोच्च न्यायाययात याविरोधात आव्हान देणार काय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Web Title: Bombay high court dismiss amol kirtikar petition recounting lok sabha election mumbai north west constituency against ravindra waikar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 19, 2024 | 02:51 PM

Topics:  

  • Bombay High Court

संबंधित बातम्या

Bombay High Court: पत्नीला पतीला नपुंसक म्हणण्याचा अधिकार आहे; मुंबई उच्च न्यायालयाने मानहानीची याचिका फेटाळली; काय आहे प्रकरण?
1

Bombay High Court: पत्नीला पतीला नपुंसक म्हणण्याचा अधिकार आहे; मुंबई उच्च न्यायालयाने मानहानीची याचिका फेटाळली; काय आहे प्रकरण?

१८७ प्रवासी मृत्युमुखी तरी लोकल बॉम्बस्फोटातील सर्व आरोपी निर्दोष? हलगर्जीपणा अन् तपासातील त्रुटींचा परिणाम
2

१८७ प्रवासी मृत्युमुखी तरी लोकल बॉम्बस्फोटातील सर्व आरोपी निर्दोष? हलगर्जीपणा अन् तपासातील त्रुटींचा परिणाम

रणवीर अलाहाबादियाला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, युट्यूबरला मिळणार पासपोर्ट…
3

रणवीर अलाहाबादियाला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, युट्यूबरला मिळणार पासपोर्ट…

Kunal Kamra: मुंबई उच्च न्यायालयाचा कुणाल कामराला दिलासा! अटकेपासून स्थगित, तपास राहणार सुरू!
4

Kunal Kamra: मुंबई उच्च न्यायालयाचा कुणाल कामराला दिलासा! अटकेपासून स्थगित, तपास राहणार सुरू!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.