Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महावितरण कर्मचाऱ्यांची धाडसी कामगिरी! 3 तास पाण्यात उभं राहून विद्युत पुरवठा केला सुरळीत

गोंदिया जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पाणी साचलं आहे. केशोरी परिसरात असलेल्या 25 गावांत पुरस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे या भागांत विजपुरवठा खंडित झाला होता. मात्र केशोरी येथील महावितरणच्या विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी साहस दाखवून 3 तास पाण्यात उभं राहून या 25 गावांमधील विजपुरवठा पुन्हा सुरळित केला.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 24, 2024 | 03:52 PM
महावितरण अधिकाऱ्यांच्या धाडसी कामगीरीने विजपुरवठा सुरळीत

महावितरण अधिकाऱ्यांच्या धाडसी कामगीरीने विजपुरवठा सुरळीत

Follow Us
Close
Follow Us:

गोंदिया जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. गोंदिया जिल्ह्यात रात्रीपासून रिमझीम पडणाऱ्या पावसाचा जोर सकाळपासूनच वाढला आहे. त्यामुळे गोंदिया जिल्ह्याच्या धरण साठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. जिल्ह्यातील धरण साठ्यामधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक भागांत पाणी साचलं आहे, तर अर्जुनी मोरगाव तालुक्याला पावसाचा सर्वाधिक फटका बसला. या तालुक्यात अनेक ठिकाणी पाणी साचून पुरस्थिती निर्माण झाली होती. तर केशोरी परिसरात असलेल्या 25 गावांना देखील पुराचा फटका बसला. सतत सुरु असलेल्या पावसामुळे या भागातील विजपुरवठा खंडित झाला होता. गेल्या 36 तासांपासून केशोरी परिसरात असलेल्या 25 गावांमध्ये वीज नव्हती.

हेदेखील वाचा – सातारा आणि रायगडसाठी पुढील 24 तास महत्त्वाचे; अतिवृष्टी होण्याची शक्यता; रेड अलर्ट जारी

अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे विज पुरवठा पुन्हा सुरळित करणं कठिण झालं होतं. मात्र गोंदियातील महावितरणाच्या अधिकाऱ्यांच्या धाडसी कामगिरीमुळे विद्युत पुरवठा पुन्हा सुरळित झाला. महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी 3 तास पाण्यात उभं राहून विद्युत पुरवठा सुरळीत केला. महावितरण अधिकाऱ्यांच्या या कामगिरीमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. केशोरी परिसरातील गावातील वीज पुरवठा मागील 36 तासांपासून खंडित झाला होता. मात्र या परिसरात नदी नाले तुडुंब भरून वाहत असल्यामुळे या ठिकाणी येण्या जाण्याचे मार्गही बंद झाले होते. अशातच विद्युत खांब देखील पाण्याच्या वेढ्यात सापडला होता. त्यामुळे दोन दिवसांपासून बंद असलेला विद्युत पुरवठा भर पावसात कोण दुरुस्त करणार असा प्रश्न निर्माण झाला होता.

हेदेखील वाचा – मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; माटुंगा स्थानकावर ओव्हरहेड वायर तुटली; प्रवाशांचा रेल्वे ट्रॅकवरून पायी प्रवास

केशोरी येथील महावितरणाच्या विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी साहस दाखवून 3 तास पाण्यात उभं राहून विद्युत पुरवठा सुरळीत केला. महावितरणच्या विभागातील अधिकारी व कर्मचारी दोरीच्या साहाय्याने तुडुंब वाहत असलेल्या दोन नाल्यातून वाट काढत विद्युत विभागाच्या डीपीपर्यंत गेले. पाण्यात तीन तास उभे राहून त्यांनी वीज पुरवठा सुरळीत केला आहे व मागील 36 तासांपासून अंधारात असलेल्या 25 गावात पुन्हा वीजप्रवाह सुरु झाला. महावितरण विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचा नाल्यातून प्रवास करणारा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. महावितरणाच्या विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या या धाडसी कार्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

गोंदिया जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पाणी साचलं आहे. जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्याला पावसाचा सर्वाधिक फटका बसला असून येथे पुरस्थिती निर्माण झाली होती. केशोरी परिसरात असलेल्या 25 गावांना देखील पुराचा फटका बसला. त्यामुळे या भागांत विजपुरवठा खंडित झाला होता. मात्र केशोरी येथील महावितरणच्या विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी साहस दाखवून 3 तास पाण्यात उभं राहून या 25 गावांमधील विजपुरवठा पुन्हा सुरळित केला.

Web Title: Brave work by mseb staff stand for 3 hours in water to make power supply smooth

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2024 | 03:52 PM

Topics:  

  • maharashtra news

संबंधित बातम्या

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे
1

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर
2

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर

Maharashtra Digital Governance: कागदपत्रांची गुंतागुंत होणार कमी! राज्यात E-Bond सुविधा सुरू; बावनकुळे यांची मोठी घोषणा
3

Maharashtra Digital Governance: कागदपत्रांची गुंतागुंत होणार कमी! राज्यात E-Bond सुविधा सुरू; बावनकुळे यांची मोठी घोषणा

‘परंपरा खंडित होऊ देणार नाही, भगवान गडावर दसरा मेळावा होणारच’; पंकजा मुंडेंचा निर्धार
4

‘परंपरा खंडित होऊ देणार नाही, भगवान गडावर दसरा मेळावा होणारच’; पंकजा मुंडेंचा निर्धार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.