Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrapur News: पाणी प्रश्न ऐरणीवर! चिमुरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण, अनेक भागांत भीषण पाणीटंचाई

चिमूर पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. ५४ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना असली तरी देखील अनेक भागांमध्ये नागरिकांना पाण्याच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. यामुळे नागरिकांनी घागरफोड आंदोलनचा इशारा दिला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 20, 2025 | 12:57 PM
Chandrapur News: पाणी प्रश्न ऐरणीवर! चिमुरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण, अनेक भागांत भीषण पाणीटंचाई

Chandrapur News: पाणी प्रश्न ऐरणीवर! चिमुरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण, अनेक भागांत भीषण पाणीटंचाई

Follow Us
Follow Us:
  • परिसरातील नागरिकांनी पाणीपुरवठा नाही
  • चिमूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची धावपळ
  • अनेक भागांना पाणीटंचाईचा फटका
नगर परिषद चिमूर अंतर्गत एमजीपीमार्फत सुमारे ५४ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. मात्र तरी देखील प्रत्यक्षात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. ५४ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना असूनही या परिसरातील नागरिकांनी पाणीपुरवठा होत नाही. नवीन पाइपलाइन टाकून काही प्रभागात पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. मात्र अजूनही अनेक नागरिकांच्या नळाला अजिबात पाणी येत नाही. तर काही ठिकाणी अत्यल्प दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

Navi Mumbai News: नाईकांनी केली स्वबळावर लढण्याची गर्जना, नवी मुंबईतील युतीच्या घोषणेकडे लागले इच्छुकांचे डोळे

इंदिरानगर येथील रहिवासी मो. शफीक ऊर्फ पप्पुभाई शेख यांनी या संपूर्ण प्रकरणाबाबत नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नवीन पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा अद्याप पूर्ण क्षमतेने सुरू नसताना जुनी पाइपलाइन बंद करण्यात आल्याने अनेक भागांत भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ज्या ठिकाणी पाणी येते, तेथे धार अत्यंत बारीक असल्याने दैनंदिन गरजा भागविणे अशक्य झाले आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

नवीन पाणीपुरवठा योजना पूर्ण होईपर्यंत जुने घरगुती तसेच सार्वजनिक नळ कनेक्शन तत्काळ सुरू करण्यात यावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. अन्यथा नगर परिषद कार्यालयावर घागरफोड आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान, या प्रश्नाकडे नगर परिषद प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन संपूर्ण नगर परिषद क्षेत्रातील नागरिकांना नियमित व पुरेशा प्रमाणात पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी नागरिकांडून केली जात आहे. नागरिकांनी पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.

आलेवाहीवासींना शुद्ध पाण्याची प्रतीक्षा

वाढोणा, (वा.), केंद्र व राज्य शासनाच्या जलजीवन योजनेअंतर्गत ‘हर घर नल से जल’ अंतर्गत नागभीड तालुक्यातील आलेवाही येथील पाणीपुरवठा योजना ३ वर्षापासून मंजूर करण्यात आली आहे. पण कधी निधीची अडचण तर कधी कंत्राटदार तर कधी कामातील अनियमतेमुळे येथील नागरिकांना शुद्ध पाणी कधी मिळणार? असा प्रश्न नागरिकांनी केला आहे. ग्रामीण भागातील गावकऱ्यांना नळ योजनेच्या माध्यमातून शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र व राज्य शासन पुरस्कृत जनजीवन योजनेअंतर्गत जिल्ह्यात व तालुक्यात पाणीपुरवठा योजनेच्या कामाला मंजुरी देण्यात आली.

Manikrao Kokate Bail: माणिकराव कोकाटेंना मोठा दिलासा! अटक टळली, उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

त्यानंतरच पाणीपुरवठा योजनेत कामाला सुरुवात करण्यात आली. मात्र, जिल्हा परिषद ग्रामीण पुरवठा विभागाच्या गलथान कारभारामुळे गावोगावी जल जीवन मिशनचे कामे अद्यापही पूर्ण झालेले नाही. नागभीड तालुक्यातील आलेवाही हे शेवटच्या टोकावर असेलेले जंगलव्याप्त गाव आहे. या ठिकाणी गट ग्रामपंचायत आहेत. गावातील लोकांना पाण्याच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे गावकऱ्यांची ही समस्या लवकरात लवकर सोडवावी, अशी मागणी आता केली जात आहे.

Web Title: In chimur citizens are facing water shortage problem chandrapur news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 20, 2025 | 12:57 PM

Topics:  

  • Chandrapur
  • Marathi News
  • Water Shortage

संबंधित बातम्या

US – Iran करारानंतर भारताचं चित्र बदलणार… गोल्डमन सॅक्सने दिली Good News, सामान्यांना फायदा होणार?
1

US – Iran करारानंतर भारताचं चित्र बदलणार… गोल्डमन सॅक्सने दिली Good News, सामान्यांना फायदा होणार?

पालघरमधील शिक्षण व्यवस्थेचा कायापालट होणार! मोतीलाल ओसवाल फाउंडेशन आणि जिल्हा परिषदेमध्ये 3 वर्षांचा ऐतिहासिक करार
2

पालघरमधील शिक्षण व्यवस्थेचा कायापालट होणार! मोतीलाल ओसवाल फाउंडेशन आणि जिल्हा परिषदेमध्ये 3 वर्षांचा ऐतिहासिक करार

Varanasi सिनेमा थेट IMAX फॉरमॅटमध्ये! दिग्दर्शक राजामौली यांनी आगामी प्रोजेक्टबाबत केला मोठा खुलासा
3

Varanasi सिनेमा थेट IMAX फॉरमॅटमध्ये! दिग्दर्शक राजामौली यांनी आगामी प्रोजेक्टबाबत केला मोठा खुलासा

Rishabh Sawhney Birthday: ‘फायटर’मधील डेंजर्स खलनायकापासून ते ‘नागाबंधम’मधील मेगा व्हिलनपर्यंत, ऋषभ साहनीचा पडद्यावर दमदार अंदाज
4

Rishabh Sawhney Birthday: ‘फायटर’मधील डेंजर्स खलनायकापासून ते ‘नागाबंधम’मधील मेगा व्हिलनपर्यंत, ऋषभ साहनीचा पडद्यावर दमदार अंदाज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.