महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या चंद्रपूर आगारात सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. ड्युटी व्यवस्थापन, रजा मंजुरी आणि कथित दबावाच्या आरोपांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी वाढत आहे.
वरोरा तालुक्यातील शेगाव बु. येथे मजुरांच्या किरकोळ वादात मध्यस्थी करणाऱ्या 65 वर्षीय विश्वनाथ कांबळी यांची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. पोलिसांनी आरोपीला एका तासात अटक केली.
चंद्रपूर जिल्ह्यात मागील वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला होता. मात्र यंदाच्या उन्हाळ्यात जिल्ह्यावर गंभीर पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले असून शहर आणि ग्रामीण भागात नागरिकांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे.
चंद्रपूरच्या मूल शहरातील ऐतिहासिक तलावावर प्रस्तावित मालधक्का प्रकल्पामुळे स्थानिकांमध्ये चिंता वाढली आहे. या प्रकल्पामुळे पर्यावरणासोबतच ढिवर समाजाच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
गडचांदूरमध्ये गॅस एजन्सीच्या गैरप्रकारांमुळे ग्राहकांची लूट होत असून प्रशासनाकडून कारवाईला विलंब होत असल्याने नागरिकांमध्ये संताप वाढला आहे. ग्राहकांच्या तक्रारीची दखल घेत प्रशासनाने छापा टाकून तपासणी केली.
धानोरा परिसरातून अत्यंत दुर्मिळ शोध लागल्याची माहिती समोर आली आहे. वर्धा नदीकाठी सापडलेल्या जीवाश्म, मानवी अवशेष आणि पाषाणयुगीन साधनांमुळे हा परिसर हजारो वर्षांपूर्वी मानवाच्या वस्तीचा भाग होता, असे संकेत मिळत…
चंद्रपूरमध्ये भीम जयंती मिरवणुकीदरम्यान DJवर नाचताना झालेल्या किरकोळ धक्क्यावरून वाद वाढून पाच युवकांनी रविकांत टेंभूरकर याला भोसकले. रुग्णालयात नेताना त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी अल्पवयीनासह 5 जणांना अटक केली.
‘लाडकी बहीण’ योजनेत मानधन 1500 वरून 2100 रुपये करण्याचे आश्वासन दिले असले तरी त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. त्यातच सुमारे 50 हजार महिलांचे अर्ज अपात्र ठरल्याने लाभार्थींमध्ये नाराजी वाढली आहे.
चंद्रपूरमध्ये मित्राच्या लग्नात डीजेवर नाचताना 25 वर्षीय तरुण अचानक कोसळला. रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले. प्राथमिक अंदाजानुसार हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानामुळे ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला मोठी चालना मिळाली आहे.
बल्लारपूरमध्ये पोलिसांनी दोन कारवायांत तिघांना अटक केली. आरोपींकडून देशी पिस्तूल, काडतूस, तलवार व कोयता जप्त करण्यात आले. शहरात दहशत निर्माण करण्याच्या हेतूने शस्त्रे बाळगल्याचा संशय आहे.
चंद्रपुरात 22 वर्षीय तरुणाने लिव्ह-इन पार्टनरचा चार्जर वायरने गळा आवळून खून केला. आत्महत्येचा बनाव केला, पण 20 दिवसांनी शवविच्छेदन अहवालातून सत्य समोर आले आणि आरोपी अटकेत आहे.
एलपीजी गॅस टंचाई निर्माण झाल्याने राज्य शासनाने पात्र शिधापत्रिकाधारकांना रेशन दुकानातून पुन्हा केरोसिन देण्याचा निर्णय घेतला आहे. या पुरवठ्यासमोर स्टोव्हची अनुपलब्धता आणि साठवणुकीच्या अडचणी मोठे आव्हान ठरत आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यात जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांत 193 चोरीच्या घटना घडल्या आहेत. जिल्ह्यातील बंद घरांना चोरट्यांनी मुख्य लक्ष्य केले आहे. त्यामुळे पोलीसांसमोर मोठे आव्हान आहे.
अमेरिका आणि ईराण यांच्यामध्ये सुरु असलेल्या युद्धाचा परिणाम सर्वसामान्यांच्या आयुष्यावर होत असल्याचे पाहायला मिळत आहे. युद्धामुळे भारतात गॅस सिलींडरची टंचाई निर्माण झाली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली असून मुलीनेच आपल्या वडिलांचा काटा काढल्याचे तब्बल 3 वर्षांनंतर उघड झाले असून या प्रकरणाने संपूर्ण पोलीस दल हादरले आहे.
चंद्रपुरातील ग्रामस्थ अजूनही 'बिबट समस्यामुक्त ग्राम' योजनेची अंमलबजावणी कधी होणार याची प्रतिक्षा करत आहेत. बिबट्याच्या हल्ल्यात गेल्या 5 वर्षांमध्ये 200 जणांचा मृत्यू झालाचा अहवाल समोर आला आहे.
सोलार बोरवेलच्या मदतीने पाणीपुरवठा करून वाघांसह इतर प्राण्यांना मोठा दिलासा देण्याचा वन विभागाचा प्रयत्न आहे. यासाठीच बफर क्षेत्रात वन्यजीवांसाठी 617 कृत्रिम आणि नैसर्गिक पाणवठ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
लाखो रुपये खर्चूनही रस्ता खड्डेमय असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. अनेक ठिकाणी उखडलेल्या रस्त्यावर केवळ ऑइलमिश्रित डांबराचा पातळ पापुद्रा टाकून दुरुस्ती केल्याचा देखावा करण्यात येत आहे.
जिल्हा खनिज निधीतून चंद्रपूरमध्ये रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत कामांना मंजुरी देण्यात आली आहे. तसेच रस्त्यांच्या कडेला धूळ उडू नये यासाठी पाणी मारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.