२ ते १७ ऑक्टोबर दरम्यान बल्लारपूर येथील तालुका क्रीडा संकुलात अग्निवीर सैन्य भरती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी भरतीच्या तयारी संदर्भात आढावा बैठक…
पारडी (ठवरे) ग्रामपंचायतीतील मग्रारोहयोच्या वैयक्तिक लाभाच्या सिंचन विहिरींची कामे २०२५ मध्ये पूर्ण झाली. संबंधित अनुदानाची रक्कम ग्रामपंचायतीला प्राप्त झाली आहे. मात्र अद्याप ही रक्कम लाभार्थ्यांना मिळालेली नाही.
चिमूर तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. इच्छुकांकडून आपल्या गटातील योग्य उमेदवाराचा शोध सुरू झाला असून, काही ठिकाणी आतापासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे.
भाजप समर्थित युवा नेते रोहित बोम्मावार यांच्या 'साथ फाऊंडेशन'तर्फे सोमवारी दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र खा. प्रतिभा धानोरकर काँग्रेस समर्थित दहीहंडीला उपस्थित न राहता भाजप समर्थित दहीहंडीला उपस्थित राहणार…
गिधाडांच्या योग्य संवर्धनासाठी ठोस उपाययोजना न झाल्याने त्यांचे अस्तित्वच धोक्यात आल्याचे अभ्यासातून समोर आले आहे. नियमित होणाऱ्या नोंदींवरून राज्यात सध्या सुमारे १०० गिधाडेच उरली असल्याचे स्पष्ट होते.
शुक्रवारी शाळेत आयोजित करण्यात आलेले संमेलन एक दिवस आधी केंद्रप्रमुखांकडून रद्द करण्यात आले. विद्यार्थ्यांना व पालकांना वेळेत ही माहिती मिळाली नव्हती, त्यामुळे ४० पेक्षा जास्त विद्यार्थी शाळेत दाखल झाले.
चंद्रपूरच्या चिमूर तालुक्यातील शंकरपूर गावात मटण करीवरून झालेल्या वादाला हिंसक वळण मिळाले. संतापलेल्या मोठ्या भावाने धाकट्या भावावर कुऱ्हाडीने वार केल्याने त्याचा मृत्यू झाला.
ब्रह्मपुरी तालुक्यातील तब्बल २६ ग्रामसभांनी सामूहिक वनहक्क (सीएफआर) उपक्रमांतर्गत प्रलंबित प्रश्न आणि कामांना गती मिळावी यासाठी पुढाकार घेतला आहे. सामूहिक वनहक्क उपक्रमामुळे गावपातळीवर रोजगाराच्या संधी निर्माण झाल्याने अनेक कुटुंबांना त्याचा…
नागभीड येथे ग्रामीण रुग्णालय असल्याने तळोधी (बा.) व परिसरातील अनेक गावांमधील नागरिकांना उपचारासाठी दूरवरच्या मोठ्या रुग्णालयांमध्ये जावे लागते. त्यामुळे येथे ग्रामीण रुग्णालय मंजूर करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
दीक्षाभूमीच्या विकास व धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभाबाबत शिष्टमंडळाची संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा झाली. विद्यमान दीक्षाभूमी परिसर, वास्तू आणि विहाराबाबत सुरू असलेल्या विविध चर्चांमुळे निर्माण झालेल्या संभ्रमावरही शिष्टमंडळाने संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.
गेल्या दोन दिवसांपासून चंद्रपूर बसस्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी उसळली आहे. रक्षाबंधन आणि सलग सुट्ट्यांमुळे अनेकजण गावी आले होते. मात्र आता परत जाण्यासाठी बसमध्ये चढण्यासाठीही प्रवाशांना मोठी कसरत करावी लागत आहे.
गणेश मंडळांनी आतापासूनच तयारीला वेग दिला आहे. शहरासह ग्रामीण भागात विविध आकारांच्या आकर्षक गणेशमूर्ती तयार करण्याचे काम मूर्तिकारांकडून सुरू आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मंडप उभारणी, देखावे आणि विद्युत रोषणाईची तयारी…
खडसंगी ग्रामपंचायतीच्या कारभारावरून गेल्या काही दिवसांपासून नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे. चिमूर-वरोरा मार्गावरील अतिक्रमित शासकीय जागेवरील इमारतीच्या फेरफार नोंदीचा मुद्दाही चर्चेत आला आहे.
पावसाने ओढ दिल्याने शेतकरी व नागरिक चिंतेत होते. मात्र आता नागभीड तालुक्यासह परिसरात गेल्या दोन दिवसांपासून सतत पाऊस सुरु आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
शाळांना प्रधानमंत्री पोषण आहार शक्ती निर्माण योजना नोंदणी/ परवाना करण्याची सक्ती रद्द करण्यात यावी, अशी मागणी मुख्याध्यापक संघाने केली आहे. ही मागणी मान्य न झाल्यास राज्यातील खाजगी अनुदानित शाळांतील सर्व…
चंद्रपुर शहरात रस्त्यावर उच्छाद मांडणाऱ्या तळीराम, विनाहेल्मेट सुसाट धावणारे आणि नियमांना पायदळी तुडवणाऱ्यांवर पोलिसांचा बडगा उगारला. वाहतूक पोलिसांच्या पथकाने चौका-चौकात उभे राहून उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई सुरु केली.
खडसंगी येथील क्रीडांगणाचे काम सन २०२३-२४ मध्ये मंजूर करण्यात आले होते. मात्र, मंजूर काम पूर्णत्वास न जाता कागदोपत्री ते पूर्ण दाखविण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणात अंदाजपत्रकाबाबतही संभ्रम निर्माण…
चंद्रपूर जिल्ह्यातील प्रमुख जलप्रकल्पांमध्ये सध्या एकूण ५५.८५ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे आगामी काळात पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संभाव्य पाणीटंचाईवर उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.
ब्रह्मपुरीतील काही गावांमध्ये स्थानिक बेरोजगार तरुणांना संधी न देता बाहेरगावच्या व्यक्तींना सहायक नियुक्ती प्रक्रियेत प्राधान्य दिल्याचा गंभीर आरोप केला जात आहे. तलाठ्यांनी त्यांच्या जवळील बाहेरगावच्या व्यक्तीची सहायक म्हणून नोंदणी केल्याची…
पूर्व विदर्भातील गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात यंदा पावसाचा जोर अधिक राहिला आहे. चंद्रपुरातील अनेक भागांत अद्याप पावसाची तूट जाणवत आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.