चंद्रपूर महानगर पालिकेसाठी काँग्रेसचे विधिमंडळ नेते आ. विजय वडेट्टीवार व खा. धानोरकर यांच्यातील वर्चस्वाची लढाई आहे. प्रचाराची धुरा दोन्ही पक्षातील नेत्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने सांभाळली.
उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून देखील महापौरपदी मनस्वी संदीप गिहे यांचा अर्ज दाखल करण्यात आला आहे. बसपाने काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी ७ नगरसेवकांनी १० नामांकन अर्ज दाखल…
जलजीवन मिशनअंतर्गत जिल्ह्यात १३०० कामांची निवड करण्यात आली. अनेक ठिकाणची कामे कंत्राटदारांनी अर्धवट सोडली. निधी आला नसल्याने कंत्राटदारांनी कामे थांबवून ठेवली.
अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर याबाबत विरोधकांकडून टिका केली जात आहे. अर्थसंकल्पावर अनेकांनी टीका केली आहे. अन्नदात्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप केला जात आहे.
ओव्हरलोड तांदळाची वाहतूक होत असल्याच्या तक्रारी यापूर्वी देखील अनेकदा समोर आल्या होत्या. अत्यावश्यक वस्तू कायदा १९५५ तसेच सार्वजनिक वितरण प्रणाली (पीडीएस) नियमांनुसार शासकीय धान्याचा अपहार हा गंभीर गुन्हा मानला जातो.
मसाळा तुकूमला अजूनही पुनर्वसनाची प्रतीक्षा आहे. गावातील नागरिकांसमोर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. गावामध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या भीषण होत चाललेली आहे.
चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसचे २७ नगरसेवक निवडून आले आहेत. महापौरपदासाठी बहुमत मिळवण्यासाठी किमान ३४ नगरसेवकांची आवश्यकता असल्याने काँग्रेसला आणखी चार नगरसेवकांची गरज आहे.
आ. वडेट्टीवार आणि खा. धानोरकर यांच्यातील सुरू असलेल्या वादात शुक्रवारचा दिवस अत्यंत नाट्यमय ठरला. मंगळवारी सर्व २७ काँग्रेस सदस्यांचा गट नोंदणीकृत होईल.
डिजिटल आणि ऑनलाइन युगात प्रवेश करूनही आजही सामान्य ग्राहकांना बँकिंग कामांसाठी तासन्तास रांगेत उभे राहावे लागत आहे. सामान्य ग्राहक रांगेत अडकलेले असताना दुसरीकडे श्रीमंत व व्यावसायिकांचे व्यवहार मागील दाराने होत…
शिवसेना (ठाकरे गट) आणि भाजपमध्ये महापौरपदावरून जोरदार कलगीतुरा रंगला आहे. चंद्रपूर महापालिकेत त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्यामुळे आता लहान पक्षांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून चंद्रपूरचा पाहिजे तसा विकास झालेला नाही. शहतारील समस्या देखील मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. या समस्या आता नवीन उमेदवार कसे सोडवणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
फार्मर आयडी अनिवार्य केल्यामुळे आयडी नसलेल्या शेकडो शेतकऱ्यांना शासनाच्या कृषी योजनांचा लाभ मिळत नाही. सातबारा संगणकीकरण अपूर्ण आणि आधार लिंक नसल्याने महाडीबीटीवर नोंदणीच अडत आहे.
पर्यावरण तज्ज्ञांचा विरोध असून देखील ताडोबा खाण प्रकल्पावर मंजूरी दिली. याच निर्णयामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. हा निर्णय म्हणजे ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला उध्वस्त करणारा निर्णय, असं वन्यजीव प्रेमींचं म्हणण…
चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत ४५१ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळी उच्चशिक्षित उमेदवारांची संख्या वाढली आहे. मतदानासाठी अवघे दोन दिवस शिल्लक आहेत.
चंद्रपुरात एका विवाहितेला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली. उपचारादम्यान या महिलेचा मृत्यू झाला असून आरोपीला पोलिसांकडून अटक करण्यात आली. या मृत्यूला तिचा पती जबाबदार असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला.
राज्य वन्यजीव मंडळाच्या तज्ज्ञांचा विरोध असूनही ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील अतिसंवेदनशील कॉरिडॉरमध्ये लोहखनिज खाण प्रकल्पाला राज्य सरकारने मंजुरी दिली. यामुळे ताडोबातील 75 वाघांच्या अस्तित्वावर गंभीर प्रश्न निर्माण झाला आ
चंद्रपुरातील ६६ जागांसाठी एकूण ५६२ उमेदवारांनी चंद्रपूर मनपा निवडणुकीत १७ प्रभागातील नामांकन दाखल केले आहे. आज अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. कोण माघार घेणार आणि कोणाला संधी मिळणार, याकडे…
घुग्घूसच्या धानोरा पॉईंटवर सिमेंट भरलेल्या भरधाव बलकरने कार, सलून व हॉटेलला धडक दिली. कारमधील तिघे गंभीर जखमी झाले, सलून चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर हॉटेल चालक भाजला. ट्रकचालक पसार.
केंद्राची संसदीय पॅनल समिती ताडोबा आणि नागपूरच्या ३ दिवसीय दौऱ्यावर होती. यावेळी अधिकाऱ्यांनी पॅनलला खाणकामाच्या परिणामाबाबत माहिती दिली. ताडोबा-अंधारी प्रकल्पाचा केंद्राच्या संसदीय पॅनलने आढावा घेतला.