Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना कार्यकर्ते का देत आहेत ‘दे धक्का? बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं

उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला गळती लागली आहे. निवडणुकीत दारुण पराभव झाल्यामुळे नेते नाराज असून शिंदे गट किंवा भाजपमध्ये जात आहे. याबाबत चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 15, 2025 | 01:13 PM
chandrashekhar bawankule give reasons why leader detach from thackeray group

chandrashekhar bawankule give reasons why leader detach from thackeray group

Follow Us
Close
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर जोरदार राजकारण रंगले आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. यामुळे महाविकास आघाडीमधील मित्रपक्ष हे एकमेकांवर पराजयाचे खापर फोडत आहेत. शरद पवारांबाबत देखील ठाकरे गटाने नाराजी व्यक्त केली आहे. ठाकरे गटाचे नेते आणि पदाधिकारी देखील पक्ष सोडून जात आहेत. यामुळे उद्धव ठाकरेंच्या पक्षाला गळती लागली आहे. याबाबत आता भाजप नेते व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या इतर पक्षातील नेत्यांचे स्वागत केले आहे. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, आज संभाजीनगर मध्ये मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचा पक्षप्रेवश झाला, महायुतीच्या पुढच्या काळामध्ये आम्हाला मजबुत सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थानच्या निवडणुकीमध्ये सुद्धा महायुती चांगल्या पद्धतीने काम करेल आणि संघटनेत दीड कोटी सदस्य संख्या असलेली भारतीय जनता पार्टी घरोघरी जात आहे. ज्या ज्या ठिकाणी जात आहोत तिथला प्रत्येक व्यक्ती भाजपाचं सदस्यत्व मागत आहे, मोदी, फडणवीसांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रात डबल इंजिन सरकार आपल्याला पुढे नेईल, असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

एकीकडे भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्यांची संख्या वाढत असली तरी उद्धव ठाकरेंच्या गटाला गळती लागली आहे. राजन साळवी यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे. तर भास्कर जाधव हे कोकणातील ठाकरे गटाचे एकमेव आमदार नाराज असल्याची चर्चा आहे. यावर मत मांडताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचे विचार सोडून दिल्यामुळे काँग्रेस सारख्या अविचाराच्या पक्षाशी युती केल्यामुळे हे होत आहे त्यांना अनेक कार्यकर्ते सोडून जात आहे, उद्धव ठाकरे यांनी मुळ भुमिकांशी तडजोड करायला नको होती, त्यामुळे हिंदुत्ववादी कार्यकर्ते त्यांच्यासोबत राहायला मागत नाहीयेत, अशी भूमिका भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली आहे.

पुढे चंद्रशेखर बावनकुळे ठाकरे गटाबाबत म्हणाले की, “उद्धव ठाकरे आमच्या सोबत होते तेव्हा देखील काही जास्त पक्ष सांभाळण्याचं काम झालं नाही. आम्ही चांगल्या कार्यकर्त्यांना पक्षात पुन्हा संधी देणार आहे,” असे मत भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी देखील याबाबत वक्तव्य केले आहे. सामंत म्हणाले की,शिवसेना शिंदे गटात अनेक जण प्रवेश करीत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे भास्कर जाधव शिवसेनेत आले, तर त्यांचे स्वागतच करू. त्यांच्या नेतृत्वाखाली काम करू, अशी प्रतिक्रिया मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. भास्कर जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यास कोकणात शिवसेनेची आखणी ताकद वाढेल.महायुतीत लढायचं आमचं धोरण आहे. पण स्थानिक लेव्हलला काही लोकांना वाटत असेल की ते स्वबळावर लढणार आहेत तर आम्ही देखील स्वबळाची तयारी ठेवू, असेही मत उदय सामंत यांनी म्हटले.

Web Title: Chandrashekhar bawankule give reasons why leader detach from thackeray group

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2025 | 01:13 PM

Topics:  

  • chandrashekhar bawankule
  • Uday Samant
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका
1

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा
2

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uddhav Thackeray Pune PC:  महापालिका निवडणुका आघाडीतून लढवणार का? उद्धव ठाकरेंचे सूचक विधान
3

Uddhav Thackeray Pune PC: महापालिका निवडणुका आघाडीतून लढवणार का? उद्धव ठाकरेंचे सूचक विधान

‘भारताला हिंदू पाकिस्तान बनवू पाहत आहेत…’ उद्धव ठाकरे शिवसेनेचा RSS वर गंभीर आरोप, नव्या वादाची ठिणगी
4

‘भारताला हिंदू पाकिस्तान बनवू पाहत आहेत…’ उद्धव ठाकरे शिवसेनेचा RSS वर गंभीर आरोप, नव्या वादाची ठिणगी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.