Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune News: राज्यातील १ हजार ७०० तलाठी पदांची भरती प्रक्रिया कधी? विद्यार्थांचा संतप्त सवाल

Talathi Post: पेसा क्षेत्रातील पदांवर न्यायालयीन प्रलंबन २०२३ च्या तलाठी भरतीत एकूण ४६१२ पदांसाठी काही गैरप्रकार आणि पेसा क्षेत्रातील पदांवरून विवाद झाले होते.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 28, 2025 | 02:35 AM
Pune News: राज्यातील १ हजार ७०० तलाठी पदांची भरती प्रक्रिया कधी? विद्यार्थांचा संतप्त सवाल
Follow Us
Close
Follow Us:
पेसा क्षेत्रातसुद्धा कायमस्वरूपी भरती करण्याची मागणी
लवकरच भरती होण्याची शक्यता
ग्राम महसूल अधिकाऱ्यांची तब्बल १ हजार ७०० पदे रिक्त
 

पुणे: राज्यातील तलाठीच्या सुमारे १ हजार ७०० जागांवर लवकरात लवकर भरती प्रक्रिया कधी होणार, असा सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे. या संदर्भात महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी स्पष्ट केले की, महसूल विभागातच नव्हे तर पेसा क्षेत्रातसुद्धा कायमस्वरूपी भरती व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे. नोकरीच्या संधीसाठी वित्त विभागाची मान्यता मिळताच परीक्षा घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे भावी उमेदवारांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून राज्यातील तलाठी पदांची भरती प्रक्रिया रखडलेली आहे. मात्र, येत्या काळात ही भरती प्रक्रिया सुरू होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

बहुचर्चित तलाठी अर्थात ग्राम महसूल अधिकाऱ्यांची तब्बल १ हजार ७०० पदे आहेत. ही पदे लवकरच भरली जाणार असून त्याची प्रक्रियादेखील सुरू करण्यात आली आहे. केवळ वित्त विभागाची मान्यता मिळताच ती भरली जाणार आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या राज्यातील उमेदवारांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वीच खुशखबर मिळणार आहे.
राज्यात २०२३ साली झालेल्या तलाठी मेगा भरतीत ४ हजार ७९३ पदांसाठी जाहिरात काढण्यात आली होती. त्यापैकी ४ हजार २१२ उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात आले असून ३ हजार ८५० जणांनी पदभार स्वीकारला आहे. त्यामुळे सुमारे १ हजार ७०० पदे अद्याप रिक्त आहेत. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या रिक्त पदांवर लवकरच भरती प्रक्रिया सुरू होणार असल्याचे सांगितले असून, डिसेंबरअखेरपर्यंत उमेदवारांना आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, २०२३ सालच्या ग्राममहसूल अधिकाऱ्यांच्या पदभरतीच्या परीक्षा आयोजनातील गैरप्रकार आणि नियुक्तीवेळीही पैसा मुळे भरती प्रक्रिया वादग्रस्त ठरली होती.
पेसा क्षेत्रातील पदांवर न्यायालयीन प्रलंबन २०२३ च्या तलाठी भरतीत एकूण ४६१२ पदांसाठी काही गैरप्रकार आणि पेसा क्षेत्रातील पदांवरून विवाद झाले होते. न्यायालयीन निर्णय प्रलंबित असून, शासनाने पेसा क्षेत्रातील उमेदवारांना तात्पुरते ११ महिन्यांसाठी नियुक्तीचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या अंतिम निर्णयानुसार पुढील कार्यवाही होईल. यंदाच्या २०२५-२६ भरतीतही अशा मुद्यांवर सावधगिरी बाळगली जाईल.
राज्यातील तलाठी पद हे ग्रामीण भागातील सर्वांत महत्त्वांचा घटक असतो, शासन जनताचा समन्वयक म्हणून तलाठी पद महत्वांचा आहे. शेतकरी , मंजूर , विद्यार्थी,गोरगरिबांना मिळणाऱ्या शासकीय योजना लाभा मिळवून देण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांचं दाखले व इतर अनेक कामासाठी तलाठी आवश्यकांता आहे. एकाच तलाठी वर दोन-तीन गावाच्या जबाबदारी आहे.हि भरती प्रक्रिया लवकरात लवकर पार पडली पाहिजे,आचारसंहितेच्या अगोदर नियुक्ती व निवड यादी जाहीर करून एका दिवशी होणे अपेक्षित आहे. त्यामुळे राज्यातील असा बेरोजागार युवकांना रोजगार मिळू शकेल.
-प्रशांत शिरगुर स्पर्धा परीक्षा समन्वयक
पद भरती करून प्रत्येक तलाठी साठी कार्यालय असणे अपेक्षित आहे. एकाच तलाठीकडे अनेक सज्जाचा (गावाचा) कार्यभार राज्यात अनेक गावात तलाठी उपलब्ध नाहीत एकाच तलाठी कडे अनेक गांवाचा कारभारामुळे कामाचा ताण येतो. अनेक मिटिंग आणि इतर कामामुळे रावसाहेबाना गावांना भेट देणे अवघड होत आहे.
-महेश घरबुडे अध्यक्ष स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असो. महाराष्ट्र

Web Title: Chandrashekhar bawankule statement abou 1700 talathi post students pune marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2025 | 02:35 AM

Topics:  

  • Chandrasekhar Bawankule
  • Maharashtra Government

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: :”मराठी भाषा विद्यापीठ जागतिक…”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ग्वाही
1

Devendra Fadnavis: :”मराठी भाषा विद्यापीठ जागतिक…”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ग्वाही

लाडकी बहीण योजनेत पुरुषांची ‘एंट्री’; तब्बल ‘इतक्या’ पुरुषांनी घेतला लाभ, सरकारला 24 कोटींचा बसला फटका
2

लाडकी बहीण योजनेत पुरुषांची ‘एंट्री’; तब्बल ‘इतक्या’ पुरुषांनी घेतला लाभ, सरकारला 24 कोटींचा बसला फटका

लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी ! e-KYC च्या ‘त्या’ निर्णयाला राज्य सरकारची स्थगिती
3

लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी ! e-KYC च्या ‘त्या’ निर्णयाला राज्य सरकारची स्थगिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.