Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Delhi Bomb Blast : पर्यटकांनो सावधान! आता किनारपट्टीवर हायअलर्ट जारी, दिल्ली बॉम्बस्फोटानंतर सुरक्षेत वाढ

कार बॉम्बब्लास्टमध्ये मृतांचा आकडा अधिकाधिक वाढतच जात आहे. या हल्यामुळे आता देशातील किनारपट्टी भागात देखील सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Nov 11, 2025 | 01:35 PM
Delhi Bomb Blast : पर्यटकांनो सावधान! आता किनारपट्टीवर हायअलर्ट जारी, दिल्ली बॉम्बस्फोटानंतर सुरक्षेत वाढ
Follow Us
Follow Us:

दिल्लीमध्ये झालेल्या दहशतवादी बॉम्बस्फोट हल्यानंतर संपूर्ण देश हादरुन गेला. लाल किल्ला मेट्रो स्टेशन परिसरात झालेल्या कार बॉम्बब्लास्टमध्ये मृतांचा आकडा अधिकाधिक वाढतच जात आहे. या हल्यामुळे आता देशातील किनारपट्टी भागात देखील सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे. या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाराष्ट्र-गोवा पत्रादेवी सीमेवर सुद्धा हाय अलर्ट देण्यात आला आहे. पत्रादेवी सीमेवर महाराष्ट्र येणाऱ्या आणि गोव्यात जाणाऱ्या वाहनांची पोलीस प्रशासनाकडून कसून चौकशी करण्यात येत आहे.

सुरक्षा यंत्रणा तैनात

रत्नागिरीतील  प्रसिद्ध बंदर मिरकरवाडा येथील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे. मिरकरवाडा बंदर हे व्यापारी केंद्र आहे.  देशविदेशातून व्यापारी जहाजं येथे येत असताता. त्यामुळे हा परिसर तसा पाहायला गेला तर संवेदनशील ठिकाणात येतो. याचकारणाने बाहेरून येणाऱ्या बोटींची डॉग स्क्वॉड आणि बॉम्ब शोधक पथकाच्या मदतीने कसून चौकशी केली जात आहे. बॉम्ब स्फोटाच्या पार्श्वभूमीवर सागरी सुरक्षा अधिक वाढवण्यात आली आहे. ‘रत्नागिरी शहरात काल जसा अलर्ट आला त्यावेळपासूनच शहरातील तसेच कोस्टल चे लँडिंग पॉइंट संवेदनशील लँडिंग पॉइंट आहेत. याठिकाणी सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक करण्यात आलेली आहे.’ यानुसार, घातपात विरोधी तपासणी आणि खलाशांची नोंदणी यांसारख्या उपाययोजना अंमलात आणल्या जात आहेत, स्थानिक पोलीस प्रशासनाकड़ून सांगण्यात आलं आहे.

बंदरांवर खलाशांची कसून चौकशी

दिल्लीतील हल्यानंतर आता महाराष्ट्रासह देशातील किनारपट्टी भागात देखील हाय अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे पर्यटकांना देखील याचा चांगलाच फटका बसणार आहे. कोकणात किंवा देशाच्या इतर किनारपट्टी भागात  फिरायला जाणाऱ्या पर्यटकांचा यामुळे हिरमोड होणार आहे. मात्र सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पाहायचं झालं तर पर्यटकांनी याकाळात खबरदारी घेणं गरजेचं आहे. नोव्हेंबर ते पुढील वर्षातील जानेवारी हा काळ कोकणाातील पर्यटन व्यवयाला चालना देणारा असतो मात्र आता झालेल्या या बॉम्बस्फोटाचे तीव्र पडसाद देशभर उमटत आहेत.  मुंबई गोवा सागरी वाहतूक करणाऱ्या खलाशांची देखील कसून चौकशी केली जात आहे.  फक्त सागरी मार्गच नाही तर महामार्गांवरील वाहनांची देखील तपासणी सुरु असून नाकाबंदी करण्यात येत आहे.

Delhi Bomb Blast मधील कारचा संबंध पुलवामा हल्ल्याशी? त्या कार कुठून आल्या

फक्त किनारपट्टी भागच नाही तर तीर्थक्षेत्र आणि इतर महत्वाच्या ठिकाणांची सुद्धा सुरक्षा वाढवण्यात आली आहे. अहिल्यानगरच्या शनिशिंगणापूर येथे देखील पोलीस प्रशासनाकडून भाविकांच्या वाहनांची आणि भाविकांची कसून तपासणी करण्यात येत आहे. शनिशिंगणापूर येथे राज्यातूनच नाही तर देशभरातून मोठ्या संख्येने भाविक दर्शनाला येतात. त्याचबरोबर शिर्डीच्या साई मंदिरातील सुरक्षा देखील वाढवण्यात आलेली आहे.

दिल्ली बाँबस्फोट हे सरकार आणि सुरक्षा यंत्रणांचं अपयश – प्रकाश आंबेडकर

दिल्ली स्फोट प्रकरणात प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आंबेडकरांनी थेट सरकारच्या सुरक्षा यंत्रणेवर ताशेरे ओढले आहेत. आंबेडकर म्हणाले की, या स्फोटामागे बाह्यशक्ती किंवा अंतर्गत शक्तीचा हात आहे का? याचा सखोल तपास झाला पाहिजे.. सर्व गोष्टी पूर्णपणे उघड झाल्या पाहिजे, अशी मागणी आंबेडकरांनी केलीय… दरम्यान, देशात ठीक-ठिकाणी झालेल्या स्पोटचा उल्लेख करत आंबेडकरांनी संघाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंये. बिहार निवडणुकीतील मतदानाच्यावेळी स्फोट झाल्याने वेळेगसंदर्भात संशय व्यक्त होत असल्यावरही त्यांनी चिंता प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केली आहे.

 

Delhi bomb Blastचा मोठा पुरावा पोलिसांच्या हाती? साडेतीन वाजल्यापासून सात वाजेपर्यंत काय काय झालं?

 

 

 

 

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: किनार पट्टीभागात सुरक्षा यंत्रणा तैनात 

    Ans: दिल्लीतील हल्यानंतर आता महाराष्ट्रासह देशातील किनारपट्टी भागात देखील हाय अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे पर्यटकांना देखील याचा चांगलाच फटका बसणार आहे. कोकणात किंवा देशाच्या इतर किनारपट्टी भागात  फिरायला जाणाऱ्या पर्यटकांचा यामुळे हिरमोड होणार आहे. मात्र सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पाहायचं झालं तर पर्यटकांनी याकाळात खबरदारी घेणं गरजेचं आहे. नोव्हेंबर ते पुढील वर्षातील जानेवारी हा काळ कोकणाातील पर्यटन व्यवयाला चालना देणारा असतो मात्र आता झालेल्या या बॉम्बस्फोटाचे तीव्र पडसाद देशभर उमटत आहेत.  मुंबई गोवा सागरी वाहतूक करणाऱ्या खलाशांची देखील कसून चौकशी केली जात आहे. 

  • Que: स्थानिक प्रशासनाची प्रशासनाची भूमिका काय ?

    Ans: या बॉम्बस्फोटाचे तीव्र पडसाद देशभर उमटत आहेत.  मुंबई गोवा सागरी वाहतूक करणाऱ्या खलाशांची देखील कसून चौकशी केली जात आहे.  फक्त सागरी मार्गच नाही तर महामार्गांवरील वाहनांची देखील तपासणी सुरु असून नाकाबंदी करण्यात येत आहे. 

  • Que: दिल्ली बॉम्बस्फोटात बाबत काय म्हणाले प्रकाश आंबेडकर ?

    Ans: दिल्ली स्फोट प्रकरणात प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आंबेडकरांनी थेट सरकारच्या सुरक्षा यंत्रणेवर ताशेरे ओढले आहेत. आंबेडकर म्हणाले की, या स्फोटामागे बाह्यशक्ती किंवा अंतर्गत शक्तीचा हात आहे का? याचा सखोल तपास झाला पाहिजे.. सर्व गोष्टी पूर्णपणे उघड झाल्या पाहिजे, अशी मागणी आंबेडकरांनी केलीय... दरम्यान, देशात ठीक-ठिकाणी झालेल्या स्पोटचा उल्लेख करत आंबेडकरांनी संघाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंये. बिहार निवडणुकीतील मतदानाच्यावेळी स्फोट झाल्याने वेळेगसंदर्भात संशय व्यक्त होत असल्यावरही त्यांनी चिंता प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केली आहे. 

Web Title: Delhi bomb blast after the delhi bomb blasts high alert issued for the coastal area security guards patrolling the port

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2025 | 01:07 PM

Topics:  

  • Bomb Blast Case
  • Delhi news
  • kokan

संबंधित बातम्या

Horror Story : काळ्या बाहुलीला लाथ मारणं पडलं महागात! ‘तो’ कधीच परतला नाही; अलिबागच्या समुद्रकिनाऱ्यावर घडलेला थरार
1

Horror Story : काळ्या बाहुलीला लाथ मारणं पडलं महागात! ‘तो’ कधीच परतला नाही; अलिबागच्या समुद्रकिनाऱ्यावर घडलेला थरार

Sateri Devi Temple: संपूर्ण कोकणात आषाढात भरते सातेरी देवीची यात्रा; जाणून घ्या 700 वर्षे जुन्या मंदिराचा इतिहास
2

Sateri Devi Temple: संपूर्ण कोकणात आषाढात भरते सातेरी देवीची यात्रा; जाणून घ्या 700 वर्षे जुन्या मंदिराचा इतिहास

Satai Devi: कोकणातील हजारो कुटुंबांची कुलदेवता, जाणून घ्या मंदिराचा इतिहास आणि महिमा
3

Satai Devi: कोकणातील हजारो कुटुंबांची कुलदेवता, जाणून घ्या मंदिराचा इतिहास आणि महिमा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.