Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur News : दहावीच्या परीक्षेत कॉपी होऊ नये यासाठी जिल्ह्याधिकाऱ्यांनी दिल्या ‘या’ महत्त्वपूर्ण सूचना; म्हणाले…

दहावी-बारावी परीक्षा सुरू झाल्यापासून नागरिक पत्रकार व मान्यवर व्यक्तीकडून काही परीक्षा केंद्रावर कॉपी व अन्य परीक्षेतील गैरप्रकार सुरू असल्याबाबतच्या तक्रारी येत होत्या.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 04, 2025 | 01:37 PM
दहावी अन् बारावी परीक्षांचे निकाल १५ मेपर्यंत लागणार

दहावी अन् बारावी परीक्षांचे निकाल १५ मेपर्यंत लागणार

Follow Us
Close
Follow Us:

सोलापूर : सध्या दहावी व बारावीची बोर्ड परीक्षा सुरू असून, बारावीचा एक तर दहावीचे चार पेपर राहिले आहेत. तरी दहावी व बारावीच्या उर्वरित पेपरसाठी एकाही परीक्षा केंद्रावर मास कॉपी अथवा अन्य कोणताही गैरप्रकार होणार नाही. यासाठी सर्व प्रांताधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी, तहसीलदार आणि गटशिक्षण अधिकारी यांनी अत्यंत दक्ष राहून परीक्षा सुरळीत पार पाडावी, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.

दहावी व बारावी बोर्ड परीक्षेच्या उर्वरित पेपरसाठी कॉपी होऊ नये यासाठी दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मार्गदर्शन करत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, निवासी उपजिल्हाधिकारी मनिषा कुंभार, शिक्षणाधिकारी माध्यमिक सचिन जगताप, शिक्षणाधिकारी प्राथमिक कादर शेख, सर्व उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि गट शिक्षण अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले की, ‘दहावी-बारावी परीक्षा सुरू झाल्यापासून नागरिक पत्रकार व मान्यवर व्यक्तीकडून काही परीक्षा केंद्रावर कॉपी व अन्य परीक्षेतील गैरप्रकार सुरू असल्याबाबतच्या तक्रारी येत होत्या. त्या अनुषंगाने त्या तक्रारीचे तपासणी केली असता त्यात तथ्य आढळून आलेले आहे. त्यामुळे सर्व प्रशासकीय यंत्रणेने विशेषत: शिक्षण विभागाने दहावी-बारावीच्या उर्वरित पेपरसाठी अत्यंत काटेकोरपणे नियोजन करून संवेदनशील परीक्षा केंद्राबरोबरच अन्य परीक्षा केंद्रावर कॉपी होणार नाही याची दक्षता घ्यावी’.

तरीही परीक्षा केंद्रावर कॉपी होत असल्याचे आढळल्यास संबंधित परीक्षा केंद्रावरील पर्यवेक्षक यास जागेवरच निलंबित करावे तर संबंधित परीक्षा केंद्र चालकावर गुन्हे दाखल करून ते केंद्र पुढील कोणत्याही परीक्षेसाठीचे बंदी आदेश काढावेत, असे निर्देशही यावेळी त्यांनी दिले.

प्रत्येक उपविभागीय अधिकारी व उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी त्या-त्या तालुक्यातील संवेदनशील परीक्षा केंद्र तसेच कॉपीच्या तक्रारी आलेल्या परीक्षा केंद्र चालकांना बोलावून त्यांच्या केंद्रावर उर्वरित पेपरसाठी कॉपी होणार नाही, याबाबत अत्यंत कठोरपणे निर्देश द्यावेत, असेही जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले. उपविभागीय अधिकारी माळशिरस यांनी शिरपूर येथील परीक्षा केंद्रावर भेट देऊन तेथे कॉपी होत असल्याचे संबंधितांच्या निदर्शनास आणून दिले होते, त्या केंद्रावरील पर्यवेक्षक तसेच केंद्र चालकावर त्वरित कारवाई करावी, असेही त्यांनी निर्देशित केले.

Web Title: District magistrates gave important instructions to prevent cheating in the 10th standard exams nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2025 | 01:37 PM

Topics:  

  • 10th Board Exam
  • mahaarshtra
  • Solapur News

संबंधित बातम्या

विद्यार्थ्यांनी भरलेल्या शाळेचे छतच कोसळले; जिल्हा परिषद शाळेतील प्रकार
1

विद्यार्थ्यांनी भरलेल्या शाळेचे छतच कोसळले; जिल्हा परिषद शाळेतील प्रकार

सोलापूर शहरात एसीचा स्फोट; महिलेचा होरपळून मृत्यू, संपूर्ण घर जळून खाक
2

सोलापूर शहरात एसीचा स्फोट; महिलेचा होरपळून मृत्यू, संपूर्ण घर जळून खाक

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात सक्रिय सहभाग घेऊन गावे आत्मनिर्भर करावीत : पालकमंत्री जयकुमार गोरे
3

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात सक्रिय सहभाग घेऊन गावे आत्मनिर्भर करावीत : पालकमंत्री जयकुमार गोरे

पंढरपुरात व्हीआयपी दर्शनासाठी वशिलेबाजी सुरूच; अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मर्जीतील लोकांना उत्तरद्वारमधून प्रवेश
4

पंढरपुरात व्हीआयपी दर्शनासाठी वशिलेबाजी सुरूच; अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मर्जीतील लोकांना उत्तरद्वारमधून प्रवेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.