लातूर : डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लातुरात 70 फूट उंचीचा स्टेच्यु ऑफ नॉलेज पुतळ्याचे अनावरण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार झाल्यापासून प्रशासनाकडून वाईट वागणूक मिळत असल्याचे जाहीर भाषणात खासदार सुधाकर शृंगारे यांनी सांगितले. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर विषय मांडण्याच साकडं रामदास आठवले आणि देवेंद्र फडणवीस यांनी घातलं आहे़. यामुळे खुद्द खासदार शृंगारे हे जातिव्यवस्थेचे बळी ठरले काय हा प्रश्न निर्माण झाला आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त 70 फूट उंचीच्या पुतळ्याचे काम सुरू असताना मनपाच्या आयुक्तांनी मला वरून दबाव आहे. पुतळ्याचे काम थांबवा म्हणून खासदार सुधाकर शृंगारे याच्या PA ला फोन करून सांगण्यात आले तर शासकीय कार्यक्रम पत्रिकेत खासदार याच नाव टाकलं पाहिजे असा प्रोटोकॉल असताना कार्यक्रम पत्रिकेत नाव टाकलं जात नाही योजना या केंद्र सरकारच्या असताना मी दिल्लीला गेलो की उदघाटन करून घेतात अशी अपमानास्पद वागणूक मिळत आहे यामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याविषयी बोलावं अशी मागणी जाहीर सभेत लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे यांनी केली आहे.
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या कामाला विरोध करणारी ही कसली महानगरपालिका? खर तर महानगपालिकेने विरोध करायला नको होता अशी प्रतिक्रिया व्यक्त करताना मी संविधानाच रक्षण करण्यासाठी दिल्लीत आहे खासदाराला अपमानास्पद वागणूक देणाऱ्या अधिकाऱयांच्या बदल्या करून टाकू असा दम मंत्री रामदास आठवले यांनी भरला. खासदार असेल मंत्री असेल तो कोणत्याही पक्षाचा असो प्रोटोकॉल पाळला पाहिजे. खासदार सुधाकर शृंगारे यांना लातुर येथील अधिकारी अपमानित करत असतात शासकीय कार्यक्रमात पत्रिकेवर नाव लिहिणे हा प्रोटोकॉल आहे पण त्या कार्यक्रम पत्रिकेवर नाव लिहिलं जात नाही सतत अपमानित केलं जातं असल्याची खंत व्यक्त केली होती त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी अधिकार्यांना खडेबोल सुनावले.
[read_also content=”…तर मनसे भाजपसोबत असेल; प्रवीण दरेकर यांचं मोठं वक्तव्य https://www.navarashtra.com/maharashtra/then-mns-will-be-with-bjp-praveen-darekars-big-statement-nrdm-268215.html”]
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे तुम्ही खासदार झालात कोणाच्या बापाच्या लाचारीवर खासदार झाला नाहीत खासदाराला अपमानित करणाऱ्या अधिकाऱ्यांना आता संसदेच्या कटघरात उभं करून जरब बसवणार तोपर्यंत शांत बसणार नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.