Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bhayander News : सुक्या मासळीचा बाजारात तुटवडा; खवय्यांची होतेय निराशा

भाईंदरमधील मच्छीमारांच्या म्हणण्यानुसार बाजारात ओल्या बोंबिलांना मागणी जास्त होती. ओल्या बोंबीलची अधिक विक्री झाल्याने सुक्या मासळीकडे दुर्लक्ष झालं आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jun 20, 2025 | 02:09 PM
सुक्या मासळीचा बाजारात तुटवडा; खवय्यांची होतेय निराशा

सुक्या मासळीचा बाजारात तुटवडा; खवय्यांची होतेय निराशा

Follow Us
Close
Follow Us:

सुकीमासळी प्रेमींच्या पदरी आता निराशा पडली आहे. सध्या बाजारात सुक्या मासळीचा तुटवडा निर्माण झाल्याचं पहायला मिळत आहे. सुक्या बोंबिलांची विक्री बाजारात दरवर्षी मोठ्या प्रमाणात असते या बोंबिलांची मागणी जास्त असल्याने याचा पुरवठा देखील तितकाच असतो. मात्र यावेळी तसं होत नसल्याचं दिसत आहे. भाईंदरमधील मच्छीमारांच्या म्हणण्यानुसार बाजारात ओल्या बोंबिलांना मागणी जास्त होती. ओल्या बोंबीलची अधिक विक्री झाल्याने सुक्या मासळीकडे दुर्लक्ष झालं आहे.

सुक्या बोबिंलांच्या विक्रीवर येणाऱ्या अडचणींमुळे भाईंदर पश्चिमेकडील मच्छीमारांचा याचा त्रास सहन करावा लागत आहे. याला यंदाचं वातावरण देखील तितकंच कारणीभूत असल्याचं म्हटलं जात आहे. यंदा मान्सूनने मे महिन्यात हजेरी लावल्याने याचा फटका सुक्या बोंबिलांना बसल्याचं मच्छीमार सांगत आहेत.

मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडीत केवळ 29 टक्के जलसाठा; मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम

नेमकं कारण काय ?

यंदा सुक्या बोंबिलांचा तुटवडा होत असल्याचं पहायला मिळत आहे. भाईंदरमधील मच्छीमारांच्या म्हणण्यानुसार बाजारात ओल्या बोंबिलांना मागणी जास्त होती. ओल्या बोंबीलची अधिक विक्री झाल्याने सुक्या मासळीकडे दुर्लक्ष झालं.भाईंदर पश्चिमेकडील समुद्रकिनाऱ्यावर वर्षानुवर्षे मासेमारी करणारे मच्छीमार सध्या सुक्या मासळीच्या तुटवड्यामुळे अडचणीत आले आहेत.

उद्योगनगरीमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग; चिंचवडमधील मोरया गोसावी मंदिरात शिरले पाणी

एरवी 2 हजार रुपये प्रति टप या दराने बाजारात ओले बोंबिल विकले जातात मात्र यंदाच्या हंगामात ओल्या बोंबिलांना मोठ्या प्रमाणात पसंती मिळत होती. त्यामुळे इतर वेळी 2 हजार रुपये प्रति टप असलेला दर यावेळी 5 हजार रुपयांवर पोहोचला आहे. त्याचबरोबर मे महिन्यात मान्सूनला सुरुवात झाल्याने वाळवणासाठी ठेवलेल्या सुक्या मासळींचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं स्थानिक मच्छीमारांनी सांगितलं आहे. त्यामुळे साठवणीसाठीच्या ओल्या बोंबिलांचं नुकसान झालं. तसंच आता होत असलेल्या ओल्या बोंबिलांच्या अतिरिक्त मागणीमुळे सुक्या मासळीकडे दुर्लक्ष झालं. याचमुळे बाजारात बाजारात सध्या सुक्या बोंबिलांचा तुटवडा होत आहे. त्यामुळे मासळी प्रेमींमध्ये ज्या प्रमाणे नाराजी निर्माण झाली आहे. तसंच स्थानिक मच्छीमारांना देखील या सगळ्याचा मोठा फटका बसला आहे. यामुळे सुक्या मासळीचा व्यवसाय करणाऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरं जावं लागत आहे.

याबाबत गेल्या काही दिवसांपूर्वी शासनाकडे मत्सव्यावसायिकांनी खंत व्यक्त केली होती. बाजारात ज्या पद्धतीने सुक्या मासळीबाबातच्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे त्याबाबत ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, यावर शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचं मासेमारी व्यावसायिकांनी सांगितलं आहे.

 

Web Title: Dry fish market bhayander shortage of dried fish in the market foodies are disappointed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2025 | 02:08 PM

Topics:  

  • Bhayander
  • Fish market
  • heavy rain update

संबंधित बातम्या

Satara News : नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य, आवश्यक तेथे तात्काळ स्थलांतरण करा; जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना
1

Satara News : नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य, आवश्यक तेथे तात्काळ स्थलांतरण करा; जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

Karjat News : मुसळधार पावसाने कर्जतला झोडपलं; शेतकऱ्यांच्या घरांचं नुकसान
2

Karjat News : मुसळधार पावसाने कर्जतला झोडपलं; शेतकऱ्यांच्या घरांचं नुकसान

Mumbai Rain Update : मिठी नदीला पूराचा धोका, NDRF दाखल, नागरिकांचंही स्थलांतर
3

Mumbai Rain Update : मिठी नदीला पूराचा धोका, NDRF दाखल, नागरिकांचंही स्थलांतर

Mumbai Rains News: मुंबईसह महाराष्ट्रात 3 जिल्ह्यात शाळा-कॉलेज बंद, पावसाने सामान्यांचे झाले हाल; तलाव भरले
4

Mumbai Rains News: मुंबईसह महाराष्ट्रात 3 जिल्ह्यात शाळा-कॉलेज बंद, पावसाने सामान्यांचे झाले हाल; तलाव भरले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.