महाराष्ट्रातील मुंबई महानगर प्रदेश (MMR) परिसरातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी तब्बल 22,611 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. यात घोडबंदर-भाईंदर बोगदा, वसई क्रीक एलिव्हेटेड रोड तसेच नवी मुंबई मेट्रो…
भाईंदर पूर्वेतील आझादनगर परिसरातील महापालिकेच्या आरक्षित भूखंडावरील वादग्रस्त अनधिकृत धार्मिक स्थळावर सोमवारी पहाटे मोठ्या पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्यात आली. जवळपास दोन दशकांपासून अस्तित्वात असलेल्या या अतिक्रमणामुळे रखडलेल्या बाळासाहेब ठाकरे कलादालन…
Mira-Bhayandar मधील भाईंदर परिसरात घडलेल्या बिबट्या शिरकावाच्या घटनेनंतर बचावकार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. महापौर डिंपल मेहता यांच्या हस्ते अग्निशमन दल आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला.
मिरा रोड परिसरात कार्यरत असलेल्या एका महिला वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याकडे दरमहा ठराविक रक्कम (हप्ता) देण्याची मागणी केल्याप्रकरणीवरिष्ठ पोलीस निरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिरा-भाईंदर महानगरपालिका महापौर पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापले असतानाच, मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांच्या भूमिकेवर शिवसेना (शिंदे गट) आक्रमक झाली आहे.
शहराच्या माजी आमदार आणि माजी महापौर गीता जैन यांच्या विरोधात ठाणे न्यायालयाने सरकारी कामात अडथळा आणणे आणि मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले आहेत.
भाईंदर पश्चिमेतील जागृत देवस्थान म्हणून धारावी देवी मंदिराची ख्याती आहे. नवरात्रोत्सवात मोठ्या श्रद्धेने, आणि भक्ती भावाने भाविक देवीच्या दर्शनाला येतात.
मोदी पटेल सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे यंदाचे पन्नासावे वर्ष असल्याने उत्सव मोठ्या उत्साहात आणि धामधुमीत साजरा करण्यात आला. मिरवणुकीदरम्यान रस्त्याच्या नाक्यावर झाडावर बांधलेल्या विद्युत तारेला हात लागून मृत्यू झाला.
भाईंदरमधील मच्छीमारांच्या म्हणण्यानुसार बाजारात ओल्या बोंबिलांना मागणी जास्त होती. ओल्या बोंबीलची अधिक विक्री झाल्याने सुक्या मासळीकडे दुर्लक्ष झालं आहे.
भाईंदर पूर्वमधील इंद्रलोक परिसरात आज दुपारी एक गंभीर घटना घडली. तपोवन शाळेच्या मागील भागात एका खाजगी बिल्डरकडून सुरू असलेल्या पायलिंगच्या कामादरम्यान अचानक जमीन खचली आणि संपूर्ण रस्ता ढासळला.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने उभारलेला भाईंदर पाडा उड्डाण पुल वाहतूकीसाठी खुला करण्यात आला असून या पुलामुळे घोडबंदर मार्गावरील प्रवास काहीसा वेगवान झाला आहे.