राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा दुर्घटनेवर असं का म्हणाले मुख्यमंत्री? (फोटो सौजन्य-X )
सिंधुदुर्गात शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणं ही फार दुर्देवी आणि मनाला मनाला दु:ख देणारी आहे. तसेच एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना आवाहन करत छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय राजकारणासाठी नसल्याचे सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत आहेत. मी त्याच्या चरणी 10 वेळा नाही तर 100 वेळा नतमस्तक होऊन माफी मागेन.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, “त्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नौदलाचे अधिकारी होती. त्या बैठकीत दोन समित्या केल्या आहेत. एक समिती पुतळा दुर्घटना प्रकरणी चौकशी आणि कारवाई, तसंच दुसरी समिती ज्यामध्ये तज्ज्ञ असतील ज्यांना महाराजांचा पुतळा बनवण्याचा अनुभव आहे. याशिवाय शिल्पकार, इंजिनिअर, नेव्हीचे अधिकारी असतील”. तेथील वारे, पर्यावरण आणि एकूण परिस्थितीचा आढावा घेऊन महाराजांचा नवा भक्कम पुतळा बसवला जाईल. विरोधकांनी याचे राजकारण करणे योग्य नाही. कारण मी महाराष्ट्राच्या आराध्य देव महाराजांच्या चरणी एकदा नाही तर 100 वेळा नतमस्तक होण्यास तयार आहे. अजित पवारांनीही माफी मागितली आहे. शिवाजी महाराज हा आमच्यासाठी राजकारणाचा विषय नाही. विरोधकांनीही यावर राजकारण करू नये. नौदलाने अपघातस्थळाची पाहणी केली आहे.
# Live📡| 29-08-2024 📍मुंबई 🎥| पत्रकारांशी संवाद https://t.co/HGjkv8XtQK
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) August 29, 2024
काल रात्री महत्त्वाची बैठक झाल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. या बैठकीत सिंधुदुर्गात घडलेल्या पुतळा दुर्घटनेबाबत चर्चा झाली. ही खरोखरच खूप वेदनादायी घटना आहे. काल झालेल्या बैठकीला सरकारी मंत्र्यांसह नौदल आणि पोलिस अधिकारीही उपस्थित होते. बैठकीनंतर एक समिती स्थापन करण्यात आली असून या समितीमध्ये नौदल अधिकारी, तज्ज्ञ वास्तुविशारद आणि इतर विषयांतील तज्ज्ञांचा समावेश आहे. ही समिती लवकरात लवकर कामाला सुरुवात करणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
कोकण किनारपट्टीवरील मालवण येथील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची कारणे शोधण्यासाठी महाराष्ट्र सरकारने अभियंते, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) तज्ञ आणि नौदल अधिकारी यांचा समावेश असलेली तांत्रिक समिती स्थापन केली आहे. एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. बुधवारी रात्री मुख्यमंत्री कार्यालयाने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, भव्य पुतळा तयार करण्यासाठी सरकारने एक समिती देखील स्थापन केली आहे.