Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्य शासनाचा निर्णय! नंदुरबार जिल्ह्यातील सर्व गावांना पारंपरिक पद्धतीने वीजपुरवठा

राज्य शासनाने नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागांमध्ये पुढील दीड ते दोन वर्षांत पारंपरिक वीजपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे नागरिकांना अखंडित वीज मिळेल, तसेच शेती, उद्योग आणि शिक्षण क्षेत्राला चालना मिळेल.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 11, 2025 | 07:58 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागातील गावे, वाडी आणि पाड्यांना पारंपरिक पद्धतीने वीजपुरवठा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. आतापर्यंत या भागांमध्ये अपारंपरिक पद्धतीने वीजपुरवठा केला जात होता. विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यातील अनेक गावे आणि वाड्यांना अद्यापही पूर्णतः वीज मिळालेली नाही. यासंदर्भात सदस्य आमश्या पाडवी यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, नंदुरबार जिल्ह्यातील अपारंपरिक वीजपुरवठा होत असलेल्या ३१ गावे व ८५ वाडी-पाडे (धडगाव तालुका) आणि ५ गावे व २३० वाडी-पाडे (अक्कलकुवा तालुका) यांना लवकरच पारंपरिक वीज जोडणी दिली जाईल.

Devendra Fadnavis: “… ते पुढच्या काळात दिसून येईल”; मशिदीवरील भोंग्यांबाबत फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका

त्याचबरोबर, नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागात वीजप्रणाली मजबूत करण्यासाठी व्यापक पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. सध्या अक्कलकुवा तालुक्यातील १८५ गावे आणि ७४९ वाडी-पाडे तसेच धडगाव तालुक्यातील १३१ गावे आणि ९१६ वाडी-पाडे पारंपरिक वीजप्रणालीद्वारे जोडण्यात आले आहेत. उर्वरित भागांमध्ये लवकरच वीज जोडणी केली जाईल. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागात पारंपरिक वीज पोहोचवण्यासाठी राज्य शासनाने प्रस्ताव सादर केला आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र शासनाच्या ‘प्रधानमंत्री जन मन योजना’ अंतर्गत निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्यामुळे वीज जोडणीचा वेग वाढेल आणि दुर्गम भागातील लोकांना अखंडित वीज मिळू शकेल.

नंदुरबार जिल्ह्यातील अनेक दुर्गम आणि आदिवासी भागांमध्ये अद्यापही पारंपरिक वीज उपलब्ध नाही, त्यामुळे येथील नागरिक, शेतकरी आणि विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. राज्य शासनाने ही परिस्थिती लक्षात घेऊन पुढील दीड ते दोन वर्षांत सर्व गावे, वाड्या आणि पाड्यांना पारंपरिक वीजपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.

Vidhan Parishad : मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी भाजपची तीन नावं ठरली, दिल्लीलाही पाठवली?

या निर्णयामुळे नागरिकांना अखंडित वीज मिळेल, शेती आणि लघुउद्योगांना चालना मिळेल, तसेच विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अधिक चांगल्या सुविधा मिळतील. वीजवाहिन्या विस्तार, नवीन ट्रान्सफॉर्मर आणि उपकेंद्रे बसवण्याचे काम वेगाने करण्यात येणार असून, संबंधित विभागांना तातडीने अंमलबजावणीचे निर्देश देण्यात आले आहेत. हा निर्णय ग्रामीण भागाच्या विकासासाठी मोठे पाऊल ठरणार आहे.

Web Title: Electricity supply to all villages in nandurbar district through traditional method

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2025 | 07:58 PM

Topics:  

  • electricity
  • maharashtra news

संबंधित बातम्या

Anjangav Rada : शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद चिघळला; अंजनगावात परिस्थिती हाताबाहेर?
1

Anjangav Rada : शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद चिघळला; अंजनगावात परिस्थिती हाताबाहेर?

Satara News : साखर कारखान्यांनी दोन मल्ल दत्तक घेतले पाहिजेत; खासदार शरद पवार यांनी व्यक्त केली अपेक्षा
2

Satara News : साखर कारखान्यांनी दोन मल्ल दत्तक घेतले पाहिजेत; खासदार शरद पवार यांनी व्यक्त केली अपेक्षा

Ratnagiri News :  आकलेत खासगी कंपनीचे अतिक्रमण? शेतकरी संतप्त
3

Ratnagiri News : आकलेत खासगी कंपनीचे अतिक्रमण? शेतकरी संतप्त

Satara News : वाॅटर स्पोर्ट्साठी पर्यटकांची गर्दी; मुनावळ्यातील निळ्याशार पाण्यात बोटींची राईड
4

Satara News : वाॅटर स्पोर्ट्साठी पर्यटकांची गर्दी; मुनावळ्यातील निळ्याशार पाण्यात बोटींची राईड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.