Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tukdebandi Kayda : राज्य सरकारचा मोठा निर्णय; आता १ गुंठा भूखंड खरेदी-विक्री करता येणार

राज्यातील भूखंड विक्रीसंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पावसाळी अधिवेशनात तुकडेबंदी कायदा शिथिल करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे अल्प भूखंडांचे व्यवहार सुलभ होणार आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Jul 09, 2025 | 05:58 PM
राज्य सरकारचा मोठा निर्णय; '...आता १ गुंठा भूखंड खरेदी-विक्री होणार'

राज्य सरकारचा मोठा निर्णय; '...आता १ गुंठा भूखंड खरेदी-विक्री होणार'

Follow Us
Close
Follow Us:

राज्यातील भूखंड विक्रीसंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पावसाळी अधिवेशनात तुकडेबंदी कायदा शिथिल करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे अल्प भूखंडांचे व्यवहार सुलभ होणार असून, शहरी आणि निमशहरी भागांतील लाखो लोकांना दिलासा मिळणार आहे.

Uddhav Thackeray : गिरणी कामगारांच्या हक्कासाठी उद्धव ठाकरे मैदानात; सत्ताधाऱ्यांवर साधला निशाणा

आतापर्यंत १० गुंठ्यांपेक्षा कमी क्षेत्रफळाची जमीन खरेदी-विक्रीस बंदी होती. त्यामुळे १, २ किंवा ५ गुंठ्यांचे व्यवहार रखडले होते. मात्र आता हा अडथळा दूर केल्यामुळे अगदी १ गुंठा क्षेत्रफळाची जमीनही व्यवहारासाठी खुली होणार आहे.

१५ दिवसांत एसओपी तयार, ५० लाख लोकांना फायदा

बावनकुळे यांनी सांगितले की, या निर्णयासाठी महसूल, नगरविकास आणि जमाबंदी आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती तयार केली जाईल. ही समिती पुढील १५ दिवसांत मानक कार्यपद्धती (SOP) तयार करेल. १ जानेवारी २०२५ पर्यंत जे व्यवहार अडकल्याचे समजले जात होते, ते देखील या निर्णयामुळे मार्गी लागणार आहेत. अंदाजे ५० लाख नागरिकांना याचा थेट लाभ होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

जुना कायदा आणि वाद

महाराष्ट्रात “तुकडेबंदी कायदा” लागू असून, यामध्ये शेतजमिनीच्या खरेदी-विक्रीसाठी प्रमाणभूत क्षेत्राची अट घालण्यात आली होती. १२ जुलै २०२१ च्या परिपत्रकानुसार १, २ किंवा ३ गुंठे जमिनीत व्यवहार करण्यास बंदी होती. त्यावरून मोठा वाद निर्माण झाला आणि अनेक प्रकरणं न्यायालयात पोहोचली.

नंतर ५ मे २०२८ रोजीच्या राजपत्रानुसार जिरायत जमिनीसाठी २० गुंठे, तर बागायतसाठी १० गुंठे हे किमान व्यवहारयोग्य क्षेत्र निश्चित करण्यात आले. परंतु, यामुळे लहान प्रमाणातील विक्री किंवा विहिरी, शेतरस्ते यांसारख्या कारणांसाठी आवश्यक असलेले व्यवहार अशक्य बनले होते. आता त्या अडचणी दूर होणार आहेत.

Pune Market Scam News: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत घोटाळा;  पणन संचालकांचे चौकशीचे आदेश

अहमदनगर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत (अहमदनगर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, नेवासा, राहुरी आदी) हा कायदा लागू असून, नगरपालिका हद्दीपासून २ मैलांच्या परिसरात मात्र हा कायदा लागू होत नाही. शिवाय काही गावांमध्ये रिजनल प्लॅन लागू असतानाही, लहान भूखंड खरेदीसंदर्भात अंमलबजावणी होत नव्हती. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी वाढली होती.राज्य सरकारने आता तातडीने अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतल्यामुळे, शहरी भागातील रहिवासी तसेच लहान शेतजमिनीचे व्यवहार करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Web Title: Fadnavis government big decision tukdebandi kayda eases 1 guntha land latest marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2025 | 05:58 PM

Topics:  

  • chandrashekhar bawankule
  • Maharashtra Goverment
  • Monsoon Session

संबंधित बातम्या

आधी पार्टीत धिंगाणा घातला, पोलिस येताच मंत्री बावनकुळेंच्या नावाने दमदाटी केली; नंतर कारवाई झाली
1

आधी पार्टीत धिंगाणा घातला, पोलिस येताच मंत्री बावनकुळेंच्या नावाने दमदाटी केली; नंतर कारवाई झाली

“जनतेमध्ये आक्रोश निर्माण झाला होता त्यामुळे हा निर्णय…; माणिकराव कोकाटेंबाबत बावनकुळे स्पष्टच बोलले
2

“जनतेमध्ये आक्रोश निर्माण झाला होता त्यामुळे हा निर्णय…; माणिकराव कोकाटेंबाबत बावनकुळे स्पष्टच बोलले

पहलगाममध्ये दहशतवादी आलेच कसे? हल्ल्यानंतर पळून जाण्यास कोणी मदत केली? : गौरव गोगोईंचे संसदेत सवाल
3

पहलगाममध्ये दहशतवादी आलेच कसे? हल्ल्यानंतर पळून जाण्यास कोणी मदत केली? : गौरव गोगोईंचे संसदेत सवाल

मोठी बातमी! अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा, कारणही सांगितलं
4

मोठी बातमी! अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा, कारणही सांगितलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.