Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News: ‘या’ रेल्वे प्रकल्पाला शेतकऱ्यांचा कडाडून विरोध! नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या

राहुरी-शिंगणापूर-सोनई रेल्वे प्रकल्पाला राहुरी आणि नेवासा शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. या प्रकल्पामुळे सुपीक व बागायती जमीन बाधित होणार असा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात आला आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 15, 2026 | 08:58 PM
फोटो सौजन्य:Gemini

फोटो सौजन्य:Gemini

Follow Us
Close
Follow Us:
  • राहुरी-शिंगणापूर-सोनई रेल्वे प्रकल्पाला विरोध
  • राहुरी आणि नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांचा विरोध
  • जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
राहुरी–शिंगणापूर–सोनई या प्रस्तावित रेल्वे प्रकल्पामुळे सुपीक आणि बागायती शेतजमिनी बाधित होणार असल्याचा आरोप करत राहुरी आणि नेवासा तालुक्यातील शेतकरी वर्गाने तीव्र विरोध दर्शविला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची जमीन हिरावून घेण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा माझी जिल्हा परिषद सदस्य सुनील गडाख यांनी केला आहे.

सुनील गडाख यांनी सांगितले की, प्रस्तावित रेल्वे मार्ग प्रामुख्याने सुपीक शेती व बागायती क्षेत्रातून जाणार असून, त्यामुळे पिढ्यानपिढ्या शेती करणारे अल्पभूधारक व कर्जबाजारी शेतकरी विस्थापित होण्याची भीती आहे. शेतमालाला हमीभाव नाही, वीज व पाण्याच्या समस्या कायम आहेत आणि कर्जमाफीचा प्रश्न प्रलंबित असताना जमीन अधिग्रहणाचा निर्णय शेतकऱ्यांवर अन्याय करणारा असल्याचे त्यांनी नमूद केले. धार्मिक पर्यटन वाढविण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने राहुरी ते शनि शिंगणापूर या नव्या रेल्वे मार्गाला मंजुरी दिल्याचेही त्यांनी सांगितले.

BMC Exit Polls 2026: फडणवीस-शिंदे की ठाकरे… मुंबईवर कोणाचे राज्य? अ‍ॅक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल काय सांगतो?

प्रकल्पाचा फेरविचार करून शेतकऱ्यांशी चर्चा करावी

शेतकरी संदीप दरंदले यांनी सांगितले की, नेवासा तालुक्यातील तलाठी व महसूल कार्यालयांकडे या रेल्वे मार्गासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही. राहुरी तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली असली, तरी नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी हरकती नोंदविण्याबाबत कोणतीही अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. त्यामुळे वर्तमानपत्रे व नोटीसांच्या माध्यमातून माहिती देऊन शेतकऱ्यांना हरकतीसाठी किमान ३० दिवसांची मुदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. सरकारने तात्काळ या प्रकल्पाचा फेरविचार करून शेतकऱ्यांशी थेट चर्चा करावी, अन्यथा ‘रस्ता रोको’ आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

बाधित शेतकऱ्यांना हरकती दाखल करण्याचे आवाहन

रेल्वे मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार बाधित शेतकऱ्यांनी श्रीरामपूर येथील उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकाऱ्यांकडे ३० दिवसांत लेखी हरकती सादर कराव्यात, असे नमूद करण्यात आले होते. मात्र ही मुदत संपली असून, नेवासा तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांचा अधिसूचनेत उल्लेख नसल्याने ते अंधारात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. याबाबत बाबासाहेब निमसे यांनी सांगितले की, धार्मिक पर्यटनाच्या विकासाला शेतकऱ्यांचा विरोध नाही, मात्र त्यासाठी शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त होता कामा नयेत. बागायती जमीन गेल्यास तीन ते चार पिढ्यांचे मोठे नुकसान होईल. सरकारने याबाबत स्पष्ट भूमिका घ्यावी, अन्यथा हरकती, निवेदने आणि उपोषणाच्या मार्गाने तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

BMC सह २९ महापालिकांसाठी मतदान संपले! उद्या निकाल, कोणाचं पारडं जड? ‘एक्झिट पोल्स’नी वाढवली उमेदवारांची धाकधूक

देवस्थानांच्या विकासासाठी रेल्वे प्रकल्प : गडाख

रेल्वे मंत्रालयाने १० डिसेंबर रोजी या संदर्भात राजपत्र प्रसिद्ध केले असून, प्रस्तावित रेल्वे मार्गाची लांबी २१.८४ किलोमीटर आहे. ऑक्टोबर २०२३ मध्ये या मार्गाचे सर्वेक्षण करण्यात आले होते. मात्र, शेतकऱ्यांच्या जमिनीचे भूसंपादन होणार असतानाही योग्य मोबदला, पुनर्वसनाचा ठोस आराखडा किंवा पर्यायी रोजगाराबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता देण्यात आलेली नसल्याचा आरोप शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे. देवस्थानांच्या विकासासाठी हा रेल्वे प्रकल्प राबवला जात असल्याची भावना व्यक्त होत असून, शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण होणे आवश्यक असल्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Web Title: Farmers from nevasa and rahuri opposed to rahuri shingnapur sonai railway project

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 15, 2026 | 08:58 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Marathi News
  • railway

संबंधित बातम्या

“सनई चौघडे” मध्ये राज हंचनाळेची दमदार एन्ट्री; ‘जय खानोलकर’च्या भूमिकेत घालणार धुमाकूळ
1

“सनई चौघडे” मध्ये राज हंचनाळेची दमदार एन्ट्री; ‘जय खानोलकर’च्या भूमिकेत घालणार धुमाकूळ

Thane News : वाहतुक नियमांचा भंग करणाऱ्यांचा उतरवला रंग ; धिंगाणा घालणाऱ्या तळीरामांवर पोलीसांची कारवाई
2

Thane News : वाहतुक नियमांचा भंग करणाऱ्यांचा उतरवला रंग ; धिंगाणा घालणाऱ्या तळीरामांवर पोलीसांची कारवाई

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु
3

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Mumbai Local: मुंबईकरांनो, लक्ष द्या! आता लोकल तिकीटासाठी ‘Railone’ ची सुविधा ऑन, मग आधीच्या वॉलेटमधील पैशांचे काय?
4

Mumbai Local: मुंबईकरांनो, लक्ष द्या! आता लोकल तिकीटासाठी ‘Railone’ ची सुविधा ऑन, मग आधीच्या वॉलेटमधील पैशांचे काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.