Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 19 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिलासादायक ! आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच मदत मिळणार; 5 ऑक्टोबरपर्यंत पंचनामे पूर्ण करण्याच्या सूचना

जून ते ऑगस्टपर्यंतचे नुकसानीसाठीचा मदतनिधी मंजूर झाला असून, निधीचे डीबीटी प्रणालीद्वारे संबंधित बाधित शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणार आहे. बाधित शेतकऱ्यांनी ई-केवायसी करुन घ्यावे, असे आवाहन करण्यात आले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 01, 2025 | 07:58 AM
आता अतिवृष्टी पंचनामे पुन्हा सुरू

आता अतिवृष्टी पंचनामे पुन्हा सुरू

Follow Us
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर : अतिवृष्टी, पुरामुळे मराठवाड्‌यात 32 लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. पंचनाम्याचे काम 80 टक्के पूर्ण झाले आहे. मात्र, अतिवृष्टीमुळे पंचनामे करण्यात अडसर येत असल्याने ते थांबले होते. दरम्यान, आता पाऊस ओसरल्याने पंचनाम्यांना पुन्हा गती देण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले आहेत. येत्या 5 ऑक्टोबरपर्यंत पंचनाम्यांचे काम पूर्ण करा, अशा सूचना त्यांनी यंत्रणेला केल्या आहेत.

जून ते ऑगस्टपर्यंतचे नुकसानीसाठीचा मदतनिधी मंजूर झाला असून, निधीचे डीबीटी प्रणालीद्वारे संबंधित बाधित शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणार आहे. बाधित शेतकऱ्यांनी ई-केवायसी करुन घ्यावे, असे आवाहन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून केले. अतिवृष्टी व पूर यामुळे मराठवाड्‌यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पुरात अडकलेल्या लोकांना वेळेत मदत व्हावी, जीवितहानी होऊ नये, यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वय साधत कसोशीने प्रयत्न केले. हजारो लोकांना स्थलांतरीत करावे लागले. आता पाऊस थांबला असून, पचनाम्यांना पुन्हा गती देण्यात आल्याचे पापळकर म्हणाले.

विभागात 80 टक्के पंचनामे पूर्ण

विभागात 31 लाख 98 हजार हेक्टरवरील पिके बाधित झाली असून, पंचनामे जवळपास 80 टक्के पूर्ण झाले आहे. गेल्या तीन से चार दिवसात अतिवृष्टीमुळे पंचनाम्यांच्या कामाला काहीसा ब्रेक लागला होता. नुकसानीचे पंचनामे 5 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

थकीत कर्जाबाबत बँकांना अर्ज करा

शासनाकडून जून ते ऑगस्ट या कालावधीतील नुकसानीबाबत मागणीनुसार निधी प्राप्त झाला आहे. निधी डीबीटी प्रणालीद्वारे संबंधित बाधित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी याद्या प्रसिद्ध होताच त्वरित ई-केवायसी करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. ही आपत्तीची मदत असल्याने बँकांनी शेतकऱ्यांच्या कर्जाचे पैसे यातून काढून घेऊ नये. काही बँकेत थेट कपातीबाबत यंत्रणा असते. त्यामुळे शेतकऱ्यांनीदेखील प्राप्त नुकसानभरपाई रक्केमतून कर्जाची रक्कम कपात करु नये, यासाठी बँकांना अर्ज करावे, असेही त्यांनी नमूद केले.

हेदेखील वाचा : Devendra Fadnavis: “अजूनही काही भागात पूरस्थिती, त्यामुळे…” मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय

Web Title: Farmers will get help soon instructions to complete panchnama by october 5

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2025 | 07:58 AM

Topics:  

  • Heavy Rain
  • maharashtra news
  • Rain in Maharashtra

संबंधित बातम्या

Wardha News : गॅस, वीज आणि महागाईचा वाढता भार; महिला शेतमजुरांचे आर्थिक गणित बिघडले
1

Wardha News : गॅस, वीज आणि महागाईचा वाढता भार; महिला शेतमजुरांचे आर्थिक गणित बिघडले

Mumbai News: जुहू चौपाटीवर कचऱ्याचा डोंगर! ६ तासांत ८६ टन कचरा हटवला
2

Mumbai News: जुहू चौपाटीवर कचऱ्याचा डोंगर! ६ तासांत ८६ टन कचरा हटवला

Jalgaon News: ग्रामसभेत प्रश्नांचा भडिमार अन् अचानक घडला अनर्थ! ग्रामसेवकाला जीव गमवावा लागला, नेमकं काय घडलं?
3

Jalgaon News: ग्रामसभेत प्रश्नांचा भडिमार अन् अचानक घडला अनर्थ! ग्रामसेवकाला जीव गमवावा लागला, नेमकं काय घडलं?

Weather Update : महाराष्ट्र, आसाम, केरळसह देशातील 21 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागने म्हटले…
4

Weather Update : महाराष्ट्र, आसाम, केरळसह देशातील 21 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागने म्हटले…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.