रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात सलग सहा दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जगबुडी नदीने ७.७० मीटरची धोक्याची पातळी ओलांडली आहे. शहरातील मटण-मच्छी मार्केटपर्यंत पुराचे पाणी पोहोचले असून खेड बाजारपेठेवर पुन्हा पुराचे…
सातारा शहरातील सांबरवाडी परिसरात झालेल्या भूस्खलनामुळे मुख्य जलवाहिनीला तीन ठिकाणी तडे गेल्याने शहराच्या पश्चिम भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. मुसळधार पावसामुळे दुरुस्तीचे काम आव्हानात्मक ठरत असून पुण्यातील तज्ज्ञ अभियंत्यांच्या पथकाकडून…
मुंबईतील मुसळधार पावसाचा फटका अभिनेत्री मीरा जगन्नाथलाही बसला आहे. नव्या घरात पाणी शिरल्याने ती स्वतः हातात मॉप घेऊन घरातील साचलेलं पाणी काढताना दिसली. हा त्रासदायक अनुभव तिने सोशल मीडियावर व्हिडीओद्वारे…
राज्यात १ जूनपासून आतापर्यंत पावसाच्या विविध दुर्घटनांमध्ये ६२ जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे, पालघर आणि मुंबईत अतिवृष्टी झाली असून संपूर्ण महाराष्ट्र किनारपट्टीला 'रेड अलर्ट' जारी करण्यात आला आहे.
खेड तालुक्यात सर्वाधिक ७२.३० मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ चिपळूण तालुक्यात ५३.८० मिमी आणि दापोली तालुक्यात ५३.१० मिमी पाऊस झाला आहे. जिल्ह्याच्या इतर भागांतही पावसाची नोंद सुरू आहे.
मूठा नदीपात्रात सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे पुण्यातील प्रसिद्ध असलेला भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. मुठा नदीचे विशाल रूप पुणेकरांना पाहायला मिळत आहे.
2027 मध्ये नाशिक, त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भीमाशंकर येथे मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून मंदिर परिसरात विविध विकासकामे युद्ध पातळीवर सुरू आहे.
Dhanashri Kadgaonkar stuck on Mumbai Pune Expressway: मुसळधार पावसामुळे पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर ९ तास ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या धनश्री काडगांवकर ने मासिक पाळी, वॉशरूम आणि शूटिंगबाबतचा धक्कादायक अनुभव शेअर केला.
मध्य प्रदेशात गेल्या २४ तासांत ३५ हून अधिक जिल्ह्यांमध्ये पाऊस झाला. खजुराहोमध्ये सर्वाधिक ४.४ इंच पावसाची नोंद झाली. बालाघाटमध्ये बाग नदीला पूर आल्याने, पूल बांधकामातील एक कार, एक जेसीबी आणि…
केरळच्या वायनाडमध्ये २४ तासांत २६५ मिमी झालेल्या मुसळधार पावसामुळे भीषण भूस्खलन झाले असून दोघांचा मृत्यू झाला आहे. टनेल रोड प्रकल्पाच्या मलब्याखाली अनेक जण अडकल्याची भीती असून NDRF कडून बचावकार्य सुरू…
खडकवासला धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे खडकवासला धरण 81 टक्के भरले आहे. कालपर्यन्त धरण 32 टक्के भरले होते. मात्र रात्रभर झालेल्या पावसामुळे धरणाच्या पाणीसाठयात वाढ झाली आहे.
देवगड तालुक्यात सुमारे १०६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, यंदाच्या हंगामात आतापर्यंत १०५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागाने आणखी मुसळधार पावसाचा इशारा दिला.
भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) पुणे जिल्ह्यासाठी मंगळवारी (ता. ७) रेड अलर्ट जारी केल्याच्या पार्श्वभूमीवर सिंहगड घाट परिसर पर्यटकांसाठी तात्पुरता बंद ठेवण्याचा निर्णय पुणे वनविभागाने घेतला आहे.
मुंबईतील मुसळधार पावसामुळे झालेल्या १२ नागरिकांच्या मृत्यूवर शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दुःख व्यक्त केले असून आपत्तीग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. त्यांनी राम मंदिर विवादावरही आपली…
खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्रातील मुसळधार पाऊस, पूर आणि मुंबई-पुणे मार्ग बंद झाल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्यात आणीबाणी जाहीर करण्याची मागणी केली आहे.
पावसाचा जोर अशाच पद्धतीने राहिल्यास धरण 80 टक्के भरले जाऊ शकते. त्यामुळे तसे झाल्यास धरणातून पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Heavy Rain Updates: राज्यभरात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे आता महाराष्ट्रातील अनेक भाग प्रभावित झाले आहे. कुठे दरड कोसळल्याची घटना घडली आहे तर कुठे पूर आला आहे. तर…
Mumbai Rain: महाराष्ट्रात पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली असून मुंबई, पुणे, ठाणे, रायगड आणि पालघरमध्ये मुसळधार पावसाचा तडाखा बसत आहे. रेल्वे, रस्ते वाहतूक आणि दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम झाला…
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील जगबुडी नदीने ७.३० मीटरवर वाहत धोक्याची पातळी ओलांडली आहे. खेड शहरात पूर येण्यास सुरुवात झाली असून पुढील ४८ तास रत्नागिरीसाठी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
कर्जत तालुक्यात २४ तासांत २९१ मिमी विक्रमी पावसाची नोंद झाली असून उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. दहिवली पूल पाण्याखाली गेल्याने ३० गावांचा संपर्क तुटला असून नेरळ-कळंब रस्ता बंद करण्यात…