Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कडक उन्हाचा शेतीला देखील फटका; तीव्र झळांमुळे केळी बागा होरपळल्या, शेतकरी चिंतेत

यंदाचा उन्हाळा कडक असल्यामुळे याचा परिणाम मनुष्य आणि प्राण्यांसह शेतीवर देखील होेऊ लागला आहे. संपूर्ण राज्यासह जुन्नर तालुक्यात सध्या उन्हाचा पारा चढला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: May 08, 2024 | 05:49 PM
कडक उन्हाचा शेतीला देखील फटका; तीव्र झळांमुळे केळी बागा होरपळल्या, शेतकरी चिंतेत
Follow Us
Close
Follow Us:
जुन्नर : सध्या राज्यभरामध्ये उन्हाचा तडाखा वाढला आहे. यंदाचा उन्हाळा कडक असल्यामुळे याचा परिणाम मनुष्य आणि प्राण्यांसह शेतीवर देखील होेऊ लागला आहे. संपूर्ण राज्यासह जुन्नर तालुक्यात सध्या उन्हाचा पारा चढला आहे. याचा परिणाम शेती आणि केळीच्या बागावर दिसून येत आहे़. वाढत्या तापमानामुळे केळीचे झाडे करपण्यास सुरुवात झाली़ आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये वाढ झाली आहे.
उन्हाच्या तीव्रतेमुळे केळीची झाडे अर्ध्यातून मोडून बागांचे मोठे नुकसान होत आहे. यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत़. मागील १५ दिवसांपासून तापमान 38 ते 40  अंशापर्यंत गेल्याने केळीच्या बागांना तापमानाचा फटका बसला असल्याचे ओतूर येथील केळी उत्पादक शेतकरी धनंजय डुंबरे यांनी सांगितले . त्याचबरोबर वीजपुरवठा खंडित असल्याने आणि वीजपुरवठा कमी दाबाने होत असल्याने विहीर व बोअरवरील वीजपंप चालत नाहीत. त्याचाही परिणाम केळीच्या बागावर होत असल्याचे सांगण्यात येत आहे़. केळी पिकाला पाणी मिळत नसल्याने झाडे अर्ध्यातून मोडून पडत आहेत़. योग्य काढणीच्या वेळी तापमानात वाढ झाल्याने केळीच्या झाडाचे वजन कमी भरत असल्याने शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे़. सध्या तापमानाचा पारा 38 अंशांपर्यंत पोहोचला आहे. मोठ्या मेहनतीने जोपासलेली केळी काढणीच्या वेळी तापमानात वाढ झाल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. गतवर्षी केळीचे मोठे नुकसान झाले होते. अनेक संकटांतून सावरलेल्या केळीच्या बागा मात्र उन्हाच्या तीव्रतेमुळे पुन्हा एकदा संकटात सापडलेल्या असल्याचे चित्र सध्या अणे माळशेज पट्ट्यात दिसून येत आहे़.
उन्हाचा पारा चढला असून हवेत देखील प्रचंड उष्णतेची लाट निर्माण झाली आहे.वाऱ्यामुळे केळीची पाने पूर्णतः फाटत आहेत. उष्णतेमुळे संपूर्ण केळीबागा जळताना दिसत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. चढत्या तापमानामुळे नागरिकांचे घराबाहेर निघणे दुरापास्त झाले असून, वाढत्या उष्ण झळांचा फटका शेती पिकांनाही बसू लागला आहे. जुन्नर तालुक्यातील अणे-माळशेज परिसरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या तापमानामुळे केळी पिकांची वाताहत झाली असून, केळीबागा करपू लागल्या आहेत.

Web Title: Harsh heat also hits agriculture due to intense heat the banana plantations were damaged the farmers were worried in maharashtra nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2024 | 05:49 PM

Topics:  

  • Agriculture News
  • daily news
  • maharashtra news
  • weather updates

संबंधित बातम्या

दिवाळीच्या सुट्टीत चाकरमान्यांनी साधला पर्यटनाचा योग; अनेक सरकारी कार्यालयांमध्ये शुकशुकाट
1

दिवाळीच्या सुट्टीत चाकरमान्यांनी साधला पर्यटनाचा योग; अनेक सरकारी कार्यालयांमध्ये शुकशुकाट

Matheran News : सरत्या पावसाने माथेरानला झोडपलं! सुट्टीची मज्जा घेण्यासाठी आलेल्या पर्यटकांची तारांबळ
2

Matheran News : सरत्या पावसाने माथेरानला झोडपलं! सुट्टीची मज्जा घेण्यासाठी आलेल्या पर्यटकांची तारांबळ

देव तारी त्याला…! दुचाकीवरून महिला पडली; मागून कार येत असतानाच अचानक ब्रेक दाबला अन्…
3

देव तारी त्याला…! दुचाकीवरून महिला पडली; मागून कार येत असतानाच अचानक ब्रेक दाबला अन्…

‘मला शोधू नको, आईची काळजी घे’; चिठ्ठी लिहून तरुण झाला बेपत्ता
4

‘मला शोधू नको, आईची काळजी घे’; चिठ्ठी लिहून तरुण झाला बेपत्ता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.