Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

AI Technology : प्रयोगशाळांमध्ये ठरणार युद्धांचे भविष्य; लष्करी-नागरी समन्वयावर तज्ज्ञांचा भर

संरक्षण क्षेत्रात लष्करी-नागरी समन्वय मजबूत करणे, स्टार्टअप्सना आर्थिक पाठबळ देणे आणि खरेदी प्रक्रियेत गती आणणे अत्यावश्यक असल्याचे मत लष्करी आणि औद्योगिक क्षेत्रातील तज्ञांनी व्यक्त केले. 

  • By प्रीति माने
Updated On: Feb 16, 2026 | 07:10 PM
Attempts to rapidly change the nature of wars using AI technology

Attempts to rapidly change the nature of wars using AI technology

Follow Us
Close
Follow Us:

पुणे शहर प्रतिनिधी : आधुनिक तंत्रज्ञानाच्या वेगवान प्रगतीमुळे भविष्यातील युद्धांचे स्वरूप झपाट्याने बदलत असून कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स आणि सायबर क्षमतांवर प्रभुत्व मिळवणारी राष्ट्रेच जागतिक पातळीवर प्रभावी ठरणार आहेत. त्यामुळे संरक्षण क्षेत्रात लष्करी-नागरी समन्वय मजबूत करणे, स्टार्टअप्सना आर्थिक पाठबळ देणे आणि खरेदी प्रक्रियेत गती आणणे अत्यावश्यक असल्याचे मत लष्करी आणि औद्योगिक क्षेत्रातील तज्ञांनी व्यक्त केले.

लष्कराच्या दक्षिण मुख्यालयातर्फे ‘जय से विजय’ (संयुक्तता, आत्मनिर्भरता आणि नवोन्मेष) या संकल्पनेवर आधारित दोन दिवसीय चर्चासत्राचा समारोप पुणे येथील बिपिन रावत सभागृहमध्ये झाला. ‘लष्करी–नागरी संलयन: संरक्षण नवोन्मेष आणि आत्मनिर्भरता’ या विषयावरील परिसंवादात लष्करी अधिकारी, उद्योजक आणि संशोधकांनी देशाच्या संरक्षण सिद्धतेवर सखोल चर्चा केली. सत्राचे संचालन राज शुक्ला यांनी केले. यामध्ये आर्मी डिझाइन ब्युरोचे अतिरिक्त महासंचालक सी. एस. मान, कल्याणी ग्रुपच्या डिफेन्स बिझनेसचे अध्यक्ष आर. एस. भाटिया तसेच मॉन्टी खन्ना सहभागी झाले होते.

हे देखील वाचा : IMD Alert: ऐन उन्हाळ्यात छत्र्या, स्वेटर घेण्याची वेळ येणार? कुठे पाऊस तर कुठे…; धावपळ होणार

मेजर जनरल सी. एस. मान म्हणाले की, कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स आणि सायबर तंत्रज्ञान या आता केवळ संकल्पना राहिलेल्या नसून आधुनिक युद्धाचा कणा बनल्या आहेत. युक्रेनमधील युद्ध तसेच अलीकडील जागतिक सायबर हल्ल्यांमधून हे स्पष्ट झाले आहे. सध्या भारतात १३ हजारांहून अधिक स्टार्टअप्स या क्षेत्रात कार्यरत असले तरी निधी आणि संधींचा अभाव- ‘व्हॅली ऑफ डेथ’ – हे मोठे आव्हान आहे. संशोधनात अपयश येणे स्वाभाविक असले तरी त्याच्या भीतीमुळे जोखीम घेतली जात नाही. त्यामुळे स्टार्टअप्सना सक्षम बनवण्यासाठी ‘फेल फास्ट’ धोरण स्वीकारणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

आर. एस. भाटिया यांनी सांगितले की, देशात स्टार्टअप्सची संख्या मोठी असली तरी अपयशाची जोखीम पेलण्यासाठी त्यांना सरकारी स्तरावर ठोस पाठबळ आवश्यक आहे. २०१२ मध्ये सुरू झालेल्या ‘ॲडव्हान्स्ड टोव्ड आर्टिलरी गन सिस्टीम’ (एटीएजीएस) प्रकल्पाला २०२५ मध्ये ऑर्डर मिळेपर्यंत लागलेला कालावधी तंत्रज्ञानाच्या जगात खूप मोठा आहे. त्यामुळे संरक्षण क्षेत्रातील खरेदी प्रक्रिया तंत्रज्ञान विकासाच्या वेगाशी सुसंगत असणे अत्यावश्यक आहे.

हे देखील वाचा : केमिकल फॅक्टरीला भीषण आग: सात कामगारांचा जळून दुर्दैवी मृत्यू

“२०१४ मध्ये आम्ही पहिली तोफ तयार केली तेव्हा साशंकता होती; मात्र आज आम्ही जगातील सर्वात मोठ्या आर्टिलरी उत्पादकांपैकी एक आहोत. दररोज १५०० ते २००० तोफगोळ्यांची निर्मिती होत असून जागतिक संरक्षण बाजारपेठेत भारताचा सध्याचा ३.५ टक्के वाटा २०४७ पर्यंत १६ टक्क्यांवर पोहोचेल,” अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

परिसंवादात संयुक्त लष्करी क्षमता बळकट करणे, स्वदेशी तंत्रज्ञानाचा व्यापक स्वीकार करणे आणि लष्करी-नागरी भागीदारी वाढवणे यावर एकमत झाले. आत्मनिर्भरतेच्या दिशेने वाटचाल अधिक वेगवान करण्यासाठी उद्योग, संशोधन संस्था आणि लष्कर यांच्यातील समन्वय मजबूत करणे ही काळाची गरज असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले

Web Title: Attempts to rapidly change the nature of wars using ai technology

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2026 | 07:10 PM

Topics:  

  • AI technology
  • daily news
  • technology news

संबंधित बातम्या

AI Summit : ‘भारत जगातील सर्वात यशस्वी उदयोन्मुख अर्थव्यवस्था’ ; AI Summit पूर्वी UN प्रमुखांकडून भारताचे तोंडभरुन कौतुक
1

AI Summit : ‘भारत जगातील सर्वात यशस्वी उदयोन्मुख अर्थव्यवस्था’ ; AI Summit पूर्वी UN प्रमुखांकडून भारताचे तोंडभरुन कौतुक

महाराष्ट्र जमीन धोरणामध्ये मोठा बदल! NA घेण्याची आवश्यकता नाही; कृषी क्षेत्रावर होणार विपरित परिणाम?
2

महाराष्ट्र जमीन धोरणामध्ये मोठा बदल! NA घेण्याची आवश्यकता नाही; कृषी क्षेत्रावर होणार विपरित परिणाम?

Nanded News : जिंतूर-जालना महामार्गावर भीषण अपघात; चार जण ठार तर एक जखमी
3

Nanded News : जिंतूर-जालना महामार्गावर भीषण अपघात; चार जण ठार तर एक जखमी

AI Impact Summit New Delhi: दिल्लीतील AI Impact Summit होणार!  एआयमुळे नोकऱ्या जातील की वाढतील? जागतिक नेत्यांची चर्चा
4

AI Impact Summit New Delhi: दिल्लीतील AI Impact Summit होणार!  एआयमुळे नोकऱ्या जातील की वाढतील? जागतिक नेत्यांची चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.