Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लातूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस; पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान

घरांची पडझड, जनावरे दगवण्यासारखे प्रकार घडले असल्यास संबंधितांना त्वरित मदत उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करावी. मनुष्यहानी टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने हाती घ्याव्यात. नदीकाठीच्या गावांमधे विशेष खबरदारी घ्यावी, अशा ठिकाणी पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज ठेवावी, अशा सूचना पालकमंत्री महाजन यांनी दिल्या.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 03, 2024 | 02:40 PM
महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह गारपीट, आंबा-केळी-द्राक्ष बागांचे नुकसान

महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह गारपीट, आंबा-केळी-द्राक्ष बागांचे नुकसान

Follow Us
Close
Follow Us:

लातूर : जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेतला. नुकसानीचे पंचनामे तातडीने करून त्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या. तसेच नदीकाठच्या गावांमध्ये विशेष खबरदारी घेण्याच्या आणि सर्व अधिकाऱ्यांनी फिल्डवर राहून तातडीने आवश्यक कार्यवाही करावी, असे त्यांनी सांगितले.

हेदेखील वाचा : यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पाऊस; रस्त्यांवर पाणीच पाणी, पिकांचे प्रचंड नुकसान

पालकमंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रमेश जाधव यांच्याकडून नुकसानीचा आढावा घेतला. एकाच दिवशी इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे त्वरित सुरू करून नुकसानीची अचूक माहिती संकलित करावी. एकाही शेतकऱ्याचे नुकसान यामधून सुटणार नाही, याची दक्षता घ्यावी.

यासोबतच घरांची पडझड, जनावरे दगवण्यासारखे प्रकार घडले असल्यास संबंधितांना त्वरित मदत उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करावी. मनुष्यहानी टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने हाती घ्याव्यात. नदीकाठीच्या गावांमधे विशेष खबरदारी घ्यावी, अशा ठिकाणी पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज ठेवावी, अशा सूचना पालकमंत्री महाजन यांनी दिल्या.

यवतमाळमध्येही मुसळधार पाऊस

यवतमाळ जिल्ह्यातील झरी जामणी तालुक्यात मुसळधार पावसामुळे टाकळी पुलावरून पाणी वाहत होते. त्यामुळे वाहतूक बंद झाली होती. चाटवण, टाकळी, अर्जकवाकडा, सत्पल्ली, दाभा, दिग्रस, दुर्भा या गावातील व इतर गावातील शेती पाण्याखाली गेली आहे. कपाशीसह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले.

हातातोंडाशी आलेले पिके निसर्गाने घेतले हिरावून

हातातोंडाशी आलेले पिके निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यात खरीप हंगामातील सोयाबीन, मूग, उडीद, कापूस व जवळपास सर्वच लागवडीचे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.

हेदेखील वाचा : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यभर मोफत सामुदायिक आरोग्य शिबिरांना सुरुवात, 40 लाख नागरिकांच्या तपासण्यांचे ध्येय

Web Title: Heavy rains cause heavy crop damage girish mahajan reviewed nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2024 | 02:40 PM

Topics:  

  • maharashtra

संबंधित बातम्या

काळोखे हत्या प्रकरणात सुधाकर घारेंच्या विरोधात षडयंत्र, शिवसेना उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांचा महेंद्र थोरवे यांच्यावर आरोप
1

काळोखे हत्या प्रकरणात सुधाकर घारेंच्या विरोधात षडयंत्र, शिवसेना उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांचा महेंद्र थोरवे यांच्यावर आरोप

Dharashiv Airport : धाराशिव विमानतळ होणार विकासाचे ‘रीजनल हब’ , आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
2

Dharashiv Airport : धाराशिव विमानतळ होणार विकासाचे ‘रीजनल हब’ , आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

जिल्हा परिषद निवडणूक कधी? आचारसंहिता कधी लागणार? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
3

जिल्हा परिषद निवडणूक कधी? आचारसंहिता कधी लागणार? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Maharashtra Local Body Election :  ‘Gen-Z’ लादेखील राजकारणाचे आकर्षण! नोकरी सोडून राजकारणात प्रवेश
4

Maharashtra Local Body Election : ‘Gen-Z’ लादेखील राजकारणाचे आकर्षण! नोकरी सोडून राजकारणात प्रवेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.