Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शासकीय कर्मचाऱ्यांनो, कार्यालयात ओळखपत्र लावूनच फिरा; अन्यथा होणार कारवाई

शासकीय कार्यालयात गेल्यावर अनेकदा कोणती व्यक्ती, कोणत्या पदावर कार्यरत आहे हे कळत नाही. त्यामुळे वादंग झाल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. त्यानंतर आता याबाबत महत्त्वपूर्ण पावले उचलण्यात आली आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 13, 2025 | 01:25 PM
शासकीय कर्मचाऱ्यांनो, कार्यालयात ओळखपत्र लावूनच फिरा; अन्यथा होणार कारवाई

शासकीय कर्मचाऱ्यांनो, कार्यालयात ओळखपत्र लावूनच फिरा; अन्यथा होणार कारवाई

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : महाराष्ट्र सरकारकडून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, राज्यातील सर्व शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना ओळखपत्र लावणे अनिवार्य केले आहे. शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेत आपल्या पदाचे ओळखपत्र शरीराच्या दर्शनी भागावर लावणे बंधनकारक केले आहे. ते समोरून येणाऱ्या व्यक्तीला स्पष्टपणे दिसेल, असे आदेश देण्यात आले आहेत.

शासकीय कार्यालयात गेल्यावर अनेकदा कोणती व्यक्ती, कोणत्या पदावर कार्यरत आहे हे कळत नाही. त्यामुळे वादंग झाल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. त्यानंतर आता याबाबत महत्त्वपूर्ण पावले उचलण्यात आली आहेत. शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेत आपल्या पदाचे ओळखपत्र बंधनकारक केले गेले आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कार्यालयीन प्रमुखांकडून शिस्तभंगाची कारवाई शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

हेदेखील वाचा : स्थानिक स्वराज्य निवडणुकींचे बिगूल वाजले; अजित पवार स्वतः ऐकून घेणार नागरिकांच्या तक्रारी

दरम्यान, यापूर्वीही शासनाने 7 मे 2014 रोजी सर्व शासकीय-कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत ओळखपत्र दर्शनी भागावर लावावे, अशा सूचना दिल्या होत्या. मात्र, प्रत्यक्षात या नियमाचे पालन होत नसल्यामुळे अनेक तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. नागरिकांना शासकीय कार्यालयात अधिकारी किंवा कर्मचारी ओळखणे कठीण जात होते. त्यामुळे कामकाजात अडथळे निर्माण होत होते.

नागरिकांना होणार मोठा फायदा…

नागरिक जेव्हा शासकीय कार्यालयात आपल्या कामासाठी जातात, तेव्हा त्यांना संबंधित अधिकारी किवा कर्मचाऱ्यांची ओळख सहज पटावी, यासाठी ही अट घालण्यात आली आहे. आतापर्यंत ओळखपत्र न लावल्यामुळे अनेकदा कर्मचारी स्वतःची ओळख न सांगता टाळाटाळ करत होते. परिणामी, नागरिकांना कामाविना परत जावे लागे किंवा अनावश्यक त्रास सहन करावा लागत होता.

कामात येईल पारदर्शकता

या नियमामुळे आता मात्र प्रत्येक शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना आपले नाव आणि पदनाम असलेले ओळखपत्र समोर लावणे सक्तीचे झाल्याने नागरिकांच्या कामकाजात पारदर्शकता वाढेल, नियम न पाळणाऱ्या कर्मचाऱ्यांवर प्रभावी नियंत्रण येणार आहे.

नव्या निर्णयातील तरतुदी…

नव्या शासन निर्णयानुसार प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांनी कार्यालयात प्रवेश करताना तसेच कार्यालयात असताना ओळखपत्र दर्शनी भागावर लावणे बंधनकारक असेल. नियमभंग केल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. या नियमाची काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित कार्यालय प्रमुख आणि विभाग प्रमुख यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

Web Title: Identity cards mandatory for government employees in office hours

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2025 | 01:25 PM

Topics:  

  • Government Employees
  • Maharashtra Government
  • Mumbai News

संबंधित बातम्या

राज्यातील तब्बल 67 लाख लाडक्या बहिणींना धक्का; अनुदानाची रक्कम अद्याप नाहीच
1

राज्यातील तब्बल 67 लाख लाडक्या बहिणींना धक्का; अनुदानाची रक्कम अद्याप नाहीच

Mumbai : “स्थानिकांना डावलणाऱ्या रावणाचे दहन करणार” मनसेची मीरा भाईंदरमध्ये बॅनरबाजी
2

Mumbai : “स्थानिकांना डावलणाऱ्या रावणाचे दहन करणार” मनसेची मीरा भाईंदरमध्ये बॅनरबाजी

Mumbai News : पश्चिम मुंबईसाठी २००० मीटर लांबीचा विशेष आराखडा, कसा असेल प्रकल्प? जाणून घ्या…
3

Mumbai News : पश्चिम मुंबईसाठी २००० मीटर लांबीचा विशेष आराखडा, कसा असेल प्रकल्प? जाणून घ्या…

भांडुपमध्ये भीषण अपघात; भरधाव ‘बेस्ट’ने अनेकांना चिरडले, चौघांचा मृत्यू तर 9 जण जखमी
4

भांडुपमध्ये भीषण अपघात; भरधाव ‘बेस्ट’ने अनेकांना चिरडले, चौघांचा मृत्यू तर 9 जण जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.