Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इंद्रायणी नदीत पुन्हा फेसाळ पाणी, रसायनांमुळे लाखो वारकऱ्यांच्या आरोग्याला धोका

इंद्रायणी नदीवर फेस दिसत आहे. रसायनयुक्त पाण्यामुळे नदी खूप प्रदूषित झाली आहे.

  • By साधना
Updated On: Jun 08, 2023 | 05:10 PM
indrayani river polluted

indrayani river polluted

Follow Us
Close
Follow Us:

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी (Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi) प्रस्थानाला काहीच तास शिल्लक आहेत. तरी वारकऱ्यांच्या जीवाशी खेळ सुरुच आहे. इंद्रायणी नदीत आज पुन्हा एकदा फेसाळ पाणी (Polluted Water Of Indrayani River) वाहताना दिसत आहे. हे पाणी वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहे.(Indrayani River News)

कारवाईचा फार्स
पिंपरी चिंचवड हद्दीतील अनेक कंपन्या इंद्रायणी नदीत रसायनयुक्त पाणी सोडतात. त्यामुळे नदीची (Indrayani River Pollution Alandi) अवस्था दयनीय झाली आहे. यापूर्वी नदी प्रदूषित करणाऱ्या सहा कंपन्यांवर गुन्हे दाखल झाले होते. मात्र पुन्हा परिस्थिती जैसे थे असल्याने कारवाईचा हा फार्स होता असं चित्र निर्माण झालं आहे.

इंद्रायणी नदीवर फेस दिसत आहे. रसायनयुक्त पाण्यामुळे नदी खूप प्रदूषित झाली आहे. नदीची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे या सगळ्या अनाधिकृत कंपन्यांवर कारवाई करा, अशी मागणी नागरिकांनी केली होती. त्यावेळी नागरिकांच्या मागणीला यश आलं होतं आणि या कंपन्यांवर कारवाई देखील केली होती. मात्र अजूनही या नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न प्रलंबित आहे.

लोणावळा शहरातून इंद्रायणी नदीचा उगम होतो. त्या दरम्यान पिंपरी-चिंचवडमधील औद्योगिक क्षेत्र आहे. या क्षेत्रात अनधिकृत कंपन्या आहेत. या कंपन्यांमधून प्रक्रिया न केलेलं रसायनयुक्त पाणी नदीत सोडलं जातं. या प्रदूषणामुळे नदीच्या काठावर राहणाऱ्या अनेक नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

येत्या 11 जूनला आळंदीतून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे. त्यामुळे त्याआधी दोन दिवसांपासून लाखो वारकरी आळंदीत दाखल होतात. दोन दिवस लाखो वारकऱ्यांसाठी या नदीचं पाणी तीर्थासमान असतं मात्र याच नदीचं पाणी प्रदूषित झालं आहे.

नागरिकांच्या आरोग्याला धोका
लाखो नागरिक इंद्रायणीमध्ये स्नान करतात. मात्र नदीचं पाणी प्रदूषित झाल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. रसायनामुळे त्वचारोगाच्या समस्या देखील निर्माण होऊ शकतात. नागरिकांच्या जीवालाही धोका निर्माण होऊ शकतो. शासनाने या नदीकडे लक्ष देण्याची गरज आहे. प्रदूषणावर तोडगा काढण्याची आवश्यकता आहे.

Web Title: Indrayani river polluted due to chemilac released by companies nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2023 | 05:09 PM

Topics:  

  • Ashadhi Wari
  • marathi latest news

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.