Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हिंजवडीतील आयटी कंपनीकडून 400 उमेदवारांची कोट्यवधींची फसवणूक; चार महिन्यांपासून थकला पगार

कंपनीचे कार्यालय बहुतेक वेळा बंद असल्याची माहितीही पीडित कर्मचाऱ्यांनी दिली. चौकशीसाठी कंपनीच्या मनुष्यबळ विभागाशी संपर्क साधल्यावर संबंधित अधिकाऱ्यांनी उलट पोलिसांना बोलावल्याचा आरोपही कर्मचाऱ्यांनी केला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 16, 2025 | 12:05 PM
हिंजवडीतील आयटी कंपनीकडून ४०० उमेदवारांची कोट्यवधींची फसवणूक

हिंजवडीतील आयटी कंपनीकडून ४०० उमेदवारांची कोट्यवधींची फसवणूक

Follow Us
Close
Follow Us:

पिंपरी : हिंजवडीतील राजीव गांधी आयटी पार्कमधील एका आयटी सल्लागार कंपनीने तब्बल ४०० उमेदवारांना सशुल्क प्रशिक्षण व हमखास नोकरीचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या फसवणुकीमुळे शेकडो आयटी कर्मचारी बेकार होण्याच्या मार्गावर असून, आयटी क्षेत्रात नोकरी शोधणाऱ्या नवोदितांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

कंपनीने उमेदवारांकडून दोन महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी प्रत्येकी १ ते ३ लाख रुपये आकारले होते. त्यानंतर पुढील दोन महिन्यांसाठी १५ हजार रुपये मानधन आणि प्रशिक्षणानंतर ३ ते ४ लाख रुपये वार्षिक पगाराचे आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्षात प्रशिक्षण व मानधनाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर सलग चार महिन्यांपासून पगारच देण्यात आलेला नाही. अनेक कर्मचारी प्रोजेक्टवर काम करत असूनही वेतन थकल्याचे समोर आले आहे.

याशिवाय, कंपनीचे कार्यालय बहुतेक वेळा बंद असल्याची माहितीही पीडित कर्मचाऱ्यांनी दिली. चौकशीसाठी कंपनीच्या मनुष्यबळ विभागाशी संपर्क साधल्यावर संबंधित अधिकाऱ्यांनी उलट पोलिसांना बोलावल्याचा आरोपही कर्मचाऱ्यांनी केला आहे.

दरम्यान, आयटी क्षेत्रात मंदीचे वारे सुरू आहेत. नुकतीच टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) ने तब्बल १२ हजार कर्मचाऱ्यांची कपात जाहीर केली होती. त्यामुळे रोजगार कपातीसोबतच अशा फसवणुकीच्या घटना वाढल्याने आयटी क्षेत्रातील रोजगाराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

‘फोरम फॉर आयटी एम्पलॉइज’कडे धाव

फसवणुकीच्या या प्रकरणात पीडित उमेदवारांनी फोरम फॉर आयटी एम्पलॉइज (एफआयटीई) या संघटनेकडे धाव घेतली आहे. हा प्रकार केवळ कामगार वाद नसून गंभीर फौजदारी गुन्हा असल्याचे फोरमने स्पष्ट केले आहे. संघटनेने हा मुद्दा कामगार आयुक्तांकडे नेण्याचा निर्णय घेतला आहे.

फोरमचा इशारा; पेड प्लेसमेंटपासून सावध!

– पेड प्लेसमेंटच्या जाळ्यात अडकू नका.
– मोठी रक्कम भरण्यापूर्वी कंपनीचा इतिहास, रिव्ह्यू व आर्थिक स्थिती तपासा.
– पगार न देता कंपनी बंद करणे हा थेट फसवणुकीचा गुन्हा आहे.

दरम्यान, आयटी क्षेत्रात मंदीचे वारे सुरू आहेत. नुकतीच टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) ने तब्बल १२ हजार कर्मचाऱ्यांची कपात जाहीर केली होती. त्यामुळे रोजगार कपातीसोबतच अशा फसवणुकीच्या घटना वाढल्याने आयटी क्षेत्रातील रोजगाराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Web Title: It company in hinjewadi cheats 400 candidates of crores

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2025 | 12:05 PM

Topics:  

  • Fraud Case
  • maharashtra news
  • Pimpri News

संबंधित बातम्या

Maharashtra Rain Update: महाराष्ट्र पावसाचा कहर! समुद्र खवळला, नद्यांची पातळीही ओलांडली
1

Maharashtra Rain Update: महाराष्ट्र पावसाचा कहर! समुद्र खवळला, नद्यांची पातळीही ओलांडली

Maharashtra 1st Conclave 2025: महाराष्ट्राचे स्वप्न साकार करणारे व्यासपीठ…
2

Maharashtra 1st Conclave 2025: महाराष्ट्राचे स्वप्न साकार करणारे व्यासपीठ…

परभणीच्या येलदरी धरणासाठी पाऊस ठरला फायद्याचा; धरणात तब्बल 95 टक्के जलसाठा
3

परभणीच्या येलदरी धरणासाठी पाऊस ठरला फायद्याचा; धरणात तब्बल 95 टक्के जलसाठा

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात सक्रिय सहभाग घेऊन गावे आत्मनिर्भर करावीत : पालकमंत्री जयकुमार गोरे
4

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात सक्रिय सहभाग घेऊन गावे आत्मनिर्भर करावीत : पालकमंत्री जयकुमार गोरे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.