Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक! अजूनही ५० कुटुंब ‘या’ अतिधोकादायक इमारतीत वास्तव्याला

कल्याणमध्ये अतिधोकादायक इमारतीत राहत आहेत ५० कुटुंब, केडीएमसी सुरक्षा रक्षकांकडून दाद मागणाऱ्यांना फेटाळून लावले.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jun 24, 2024 | 06:16 PM
धक्कादायक! अजूनही ५० कुटुंब ‘या’ अतिधोकादायक इमारतीत वास्तव्याला
Follow Us
Close
Follow Us:

कल्याण : कल्याणमधील अतिधोकादायक असलेल्या एका इमारतीचा काही भाग कोसळला होता. या इमारतीमधील १०० कुुटुंबियांना त्वरीत इमारत खाली करण्याचे सांगण्यात आले. काही जणांनी घरे खाली केली. मात्र केडीएमसीकडून भोगवटा प्रमाण पत्र भाडेकरांना न दिले गेल्याने ५० हून अधिक कुटुंब जीव मुठीत धरुन त्या अतिधोकादायक इमारतींमध्ये राहत आहेत. या कुटूंबियांनी केडीएमसीत अधिकाऱ्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. केडीएमसी सुरक्षा रक्षकांनी त्यांना पिटाळून लावले. या कुटुंबियांसोबत काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णीही होत्या. कोणतीही अप्रिय आणि अनुचित घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.

शहराच्या पश्चिम भागातील वस्तीतील मौलवी कपाऊंड येथील अतिधोकादायक इमारतीचा सज्जाचा काही भाग कोसळल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. या घटनेत एक मुलगी आणि तिची आई जखमी झाली आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. घटनेची माहिती मिळताच महापालिका, अग्नीशमन दल आणि पोलिस यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. या धोकादायक इमारतील नागरिकांचे अन्य ठिकाणी स्थलांतर केले जाणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

मौलवी कंपाऊंड ही धोकादायक इमारत आहे. या इमारतीला महापालिकेने यापूर्वीच नोटीस दिली आहे. एक इमारत तळ अधिक चार मजली आहे. तर दुसरी इमारत तळ अधिक एक या स्वरुपाची आहे. या इमारतीत ७५ घरे आहेत. या ठिकाणी बहुतांश लोक भाडेकरु आहेत. या इमारतीची देखभाल दुरुस्ती करण्यात आलेली नाही. तळ अधिक चार मजली असलेल्या धोकादायक इमारतीच्या चौथ्या मजल्यावरचा सज्जा कोसळला. इमारतीच्या खालून जात असलेल्या मेहरुनिसा आणि त्यांची मुलगी तस्मीया या जखमी झाल्या होत्या. या घटनेची दखल घेत उपायुक्त धैर्यशील जाधव यांनी या कुटुंबियांना अन्यत्र स्थलांतरीत केले जाईल. त्यांना भोगवटा दिले जाईल असे सांगितले होते. त्यांच्या या आश्वासनाचा पश्चात ४१ कुटुंबियांनी त्यांचे घर खाली केले. त्यांना भोगवटा प्रमाणपत्र दिले गेले नाही. ते पाहून अन्य कुटुंबियांनी त्यांची घरे खाली केली नाहीत. इमारत अतिधोकादायक असल्याने त्या ठिकाणी कुटुंबिय जीव मुठीत धरुन राहत आहे. भोगवटा प्रमाणपत्र मिळावे यासाठी काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी यांच्या नेतृत्वात भेट घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सुरक्षकांनी त्यांना पिटाळून लावले आहे. या आधी एक वर्षापूर्वी अशाच एका इमारतील घरे खाली केली गेली. त्यांनाही भोगवटा प्रमाण पत्र दिले नाही. त्यामुळे लोक घरे खाली करीत नाहीत .

यासंदर्भात महापालिकेचे सहाय्यक आयुक्त तुषार सोनवणे यांनी सांगितले की, ही इमारत अतिधोकादायक आहे. या इमारतीत राहणाऱ्यांना नोटिसा बजावल्या होत्या. जोपर्यंत नागरिक घरे खाली करीत नाही. तोपर्यंत भोगवटा प्रमाणपत्र देता येत नाही.

Web Title: Kalyan shocking 50 families still live in this dangerous building

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2024 | 06:16 PM

Topics:  

  • Dangerous Building
  • kalyan
  • Maharashtra Government
  • thane

संबंधित बातम्या

Mahayuti Government: बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध युद्धाची हाक! फडणवीस सरकारकडून लाखो प्रमाणपत्रे रद्द
1

Mahayuti Government: बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध युद्धाची हाक! फडणवीस सरकारकडून लाखो प्रमाणपत्रे रद्द

मुंबईत भरलेत मकरसंक्रांत स्पेशल Exhibition! साड्या, ब्लाऊजचे सुंदर आणि हटके पर्याय उपलब्ध
2

मुंबईत भरलेत मकरसंक्रांत स्पेशल Exhibition! साड्या, ब्लाऊजचे सुंदर आणि हटके पर्याय उपलब्ध

Navi Mumbai Kalyan Connectivity: नवी मुंबई–कल्याण प्रवास लवकरच सुलभ; ऐरोली–कटाई उन्नत मार्ग अंतिम टप्प्यात
3

Navi Mumbai Kalyan Connectivity: नवी मुंबई–कल्याण प्रवास लवकरच सुलभ; ऐरोली–कटाई उन्नत मार्ग अंतिम टप्प्यात

Thane : मयूर पाटील यांची प्रभाग ४ ब मध्ये प्रचारात आघाडी
4

Thane : मयूर पाटील यांची प्रभाग ४ ब मध्ये प्रचारात आघाडी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.