Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur News : शाहूवाडीत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण; गव्यांनी रोखला शालेय विद्यार्थ्यांचा रस्ता

भोगावती, कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यात असलेल्या दाजीपूर अभयारण्यालगतच्या गावांमध्ये जंगली प्राण्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jan 18, 2026 | 06:22 PM
Kolhapur News : शाहूवाडीत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण; गव्यांनी रोखला शालेय विद्यार्थ्यांचा रस्ता
Follow Us
Close
Follow Us:
  • शाहूवाडीत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
  • गव्यांनी रोखला शालेय विद्यार्थ्यांचा रस्ता
कोल्हापूर : भोगावती, कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यात असलेल्या दाजीपूर अभयारण्यालगतच्या गावांमध्ये जंगली प्राण्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. यामुळे  शेतकरी अक्षरशः हतबल झाले आहेत. अभयारण्यात असणारे रानगवे (गवा रेडा) व जंगली डुक्कर म्हासूर्ली परिसर, राधानगरी परिसर, काळमावाडी, शिरगाव, धामोड आदी भागांतील गावांच्या शेतात कळपाने घुसून ऊसासह मका, गहू, ज्वारी व भाजीपाला पिकांवर ताव मारत आहे. दरवर्षी डिसेंबर महिन्यापासून जंगलातील जंगली प्राणी आपले अन्न, चारा, पाणी शोधण्यासाठी बागायती शेतीकडे मोर्चा वळवतात. रानगवे, डुक्कर असे प्राणी डिसेंम्बरपासून जून महिन्यापर्यंत बागायती पिके खात असतात. रात्रंदिवस शेतात घुसून कोवळी पिके फस्त केल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे. शेतीसाठी केलेले कष्ट, खतासाठी, पाण्यासाठी आणि मशागतीसाठी केलेला खर्च वाया जात असल्याची व्यथा शेतकरी मांडत आहेत.

पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसायाकडे वळण्यासाठी अनेक युवकांनी गोठे बांधून दूध उत्पादन उद्योग सुरू केला आहे. मात्र, जनावरांसाठी पिकवलेली ओली वैरणदेखील जंगली प्राणी खाऊन टाकत असल्याने बागायती शेतकरी अधिकच हैराण झाले आहेत. वैरण नष्ट झाल्याने दूध उत्पादनावरही परिणाम होत असून दुग्धव्यवसाय संकटात सापडला आहे. शिरगाव व धामोड परिसरात रानगव्यांचे मोठे कळप शेतात शिरून कोवळी पिके पूर्णपणे नष्ट करत आहेत. काही शेतकऱ्यांनी विद्युत कुंपण, आवाज करणारी साधने, रात्री पहारा, प्रकाशयोजना अशा विविध क्लुप्त्या वापरून पिके वाचवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, या उपाययोजनांनाही जंगली प्राणी न जुमानता शेतीचे मोठे नुकसान होत असल्याचे चित्र आहे. जर वेळीच ठोस पावले उचलली नाहीत, तर दाजीपूर अभयारण्यालगतच्या भागातील शेती आणि पशुसंवर्धन व्यवसाय गंभीर संकटात सापडण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Satara Political News : युती झाली नाही तर प्रत्येकाला लढायचा मार्ग मोकळा! मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे स्पष्ट संकेत

शाहूवाडी तालुक्याच्या उत्तर भागातील शिराळे वारूण ते शित्तूर वारूण दरम्यानच्या रस्त्यावर गव्यांनी शाळेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा काही काळ रस्ता अडविल्याचे चित्र पाहायला मिळाले. शित्तूर वारूण परिसरामध्ये रोज नित्याने नागरिकांना गव्यांच्या कळपाचे दर्शन होते. शनिवारी सकाळची शाळा असल्याने शिराळे वारूण येथील आठवी ते दहावीमध्ये शिकणारे हायस्कूलचे विद्यार्थी शित्तरकडे येत होते. बाद्याच्या ओढ्यानाजीक रस्त्याच्या खालच्या बाजूला रस्ता ओलांडण्यासाठी गवा थांबला होता.
सुदैवाने रस्त्याच्या एका टोकाला असलेल्या दोन शेतकऱ्यांनी शाळेला येणाऱ्या या विद्यार्थ्यांना आहे. तिथेच थांबण्यास सांगितल्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र अगदी काही अंतरावर गव्याचे प्रत्यक्ष दर्शन झाल्याने विद्यार्थी व विद्यार्थिनी भयभीत झाले होते.

आतापर्यंत तीन जणांचा गेला बळी

मागच्या वर्षी याच ठिकाणी मयूर यादव या युवकावर गव्यांनी जोरदार हल्ला केला होता. अवघ्या वीस दिवसांपूर्वी गव्याच्या हल्यांत शिवाजी चिंचोलकर हा शेतकरी मरता मरता वाचला. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांत आतापर्यंत तीन जणांचा बळी गेला आहे. आणखी कितीजण दगावल्यानंतर वन विभागाला जाग येणार.? असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

Kolhapur ZP Election: 23 लाख कोल्हापूरकर ठरवणार उमेदवारांचे भविष्य; जिल्हा परिषद अन्…

Web Title: Kolhapur news atmosphere of fear among citizens in shahuwadi govas blocked the road of school students

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 18, 2026 | 06:22 PM

Topics:  

  • kolhapur
  • maharashtra news
  • Marathi News

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: पाण्यापासून कोणी वंचित राहणार नाही! जलसंपदा विभागातील आढावा बैठकीत आमदार खताळांचा विश्वास
1

Ahilyanagar News: पाण्यापासून कोणी वंचित राहणार नाही! जलसंपदा विभागातील आढावा बैठकीत आमदार खताळांचा विश्वास

Ahilyanagar : मनपा निवडणुकीत विजयी शिवसैनिकांचा गौरव, सत्तेत जाण्याबाबत मोठे विधान
2

Ahilyanagar : मनपा निवडणुकीत विजयी शिवसैनिकांचा गौरव, सत्तेत जाण्याबाबत मोठे विधान

Gondia : धान्याचा जिल्हा असलेल्या गोंदियात हरभरा लागवडीकडे शेतकऱ्यांचा वाढता कल
3

Gondia : धान्याचा जिल्हा असलेल्या गोंदियात हरभरा लागवडीकडे शेतकऱ्यांचा वाढता कल

Jalna News : शेतकऱ्यावर दरोडेखोरांचा सशस्त्र हल्ला, शेतात टेहळणीसाठी गेलेल्या शेतकऱ्याला मारहाण करून लूट
4

Jalna News : शेतकऱ्यावर दरोडेखोरांचा सशस्त्र हल्ला, शेतात टेहळणीसाठी गेलेल्या शेतकऱ्याला मारहाण करून लूट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.