
जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले, नॉन-क्रिमिलेयर आणि इतर आवश्यक प्रशासकीय कागदपत्रांसाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर अर्ज सादर केले. विविध शासकीय विभागांच्या वतीने राबवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती देणारे स्टॉल्स या ठिकाणी लावण्यात आले होते. संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना आणि कृषी विभागाच्या योजनांसाठी अनेक लाभार्थ्यांनी नोंदणी केली. विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने नागरिकांना त्यांच्या कायदेशीर हक्कांची आणि मोफत कायदेशीर सल्ल्याची माहिती देण्यात आली.
Rajya Sabha Election: भाजपचा हुकुमाचा इक्का…!उमेदवारी जाहीर होताच तावडेंची पहिली प्रतिक्रीया
संतोष पाटील जिल्हाधिकारी सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ योगेश खरमाटे उपविभागीय अधिकारी आणि सोनाली मेटकरी यांच्या उपस्थितीत महाशिबिराच्या माध्यमातून उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि तहसिल कार्यालय वाई यांचेमार्फत डोमेसाईल दाखले – २५, डोंगरी दाखले – २५, तसेच उत्पन्न दाखले – २७ अर्ज प्राप्त झाले. यासोबतच कुणबी दाखले – १२, ७/१२ उताऱ्यांचे वाटप – ८३ इतक्या संख्येने करण्यात आले. तसेच शिधापत्रिकेमधील नाव कमी-जास्त करणे – २३, आधार कार्ड नोंदणी – १९, निराधार योजनेसाठी अर्ज – १३ इतक्या सेवा नागरिकांना देण्यात आल्या.
शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याऐवजी गावातच सर्व सोयी उपलब्ध झाल्याने महिला, ज्येष्ठ नागरिक आणि शेतकऱ्यांनी या उपक्रमाचे स्वागत केले. महसूल विभाग, पंचायत समिती आणि विधी सेवा प्राधिकरणाच्या समन्वयित प्रयत्नांमुळे हे शिबिर यशस्वी झाले. याशिवाय, विविध इतर शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी तहसील कार्यालय, वाई यांच्या नावे एकूण १०० अर्ज दाखल करण्यात आले. या महाशिबिरामुळे नागरिकांना एका ठिकाणी अनेक सेवा उपलब्ध झाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले.
महाशिबिराच्या यशस्वी आयोजनामुळे सामान्य नागरिकांना शासकीय कामकाज सुलभपणे करता आले असून, प्रशासनाच्या लोकाभिमुख उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे तहसीलदार सोनाली मेटकरी नायब तहसीलदार भाऊसाहेब जगदाळे यांच्या अध्यक्षतेखाली सदर कार्यक्रम व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी श्रीकांत धनावडे मंडळ अधिकारी धोम, शितल वाघ ग्राम महसुल अधिकारी धोम आणि पश्चिम भागातील सामाजिक कार्यकर्ते यांनी कष्ट घेतले.