Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Aurangzeb Tomb : औरंगजेबाच्या कबरीवर महंत रामगिरी महाराजांची प्रतिक्रिया; म्हणाले, ‘अशा लोकांच्या कबरी…’

Aurangzeb Kabar : औरंगजेबाच्या कबरीवरुन राज्यामध्ये वादंग निर्माण झाला आहे. यामुळे विरोधी आणि सत्ताधारी नेते आक्रमक झाले आहे. यावर आता रामगिरी महाराजांनी प्रतिक्रिया दिली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 21, 2025 | 01:19 PM
Mahant Ramgiri Maharaj's reaction to the Aurangzeb tomb controversy

Mahant Ramgiri Maharaj's reaction to the Aurangzeb tomb controversy

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राज्यामध्ये मागील दोन आठवड्यापासून औरंगजेबाच्या कबरीचा वाद वाढला आहे. यावरुन सत्ताधारी आणि विरोधी नेत्यांमध्ये जोरदार वादंग देखील निर्माण झाला आहे. यामुळे नागपूरमध्ये देखील दंगल झाली. राज्याचे सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन देखील सुरु आहे. यामध्ये देखील औरंगजेबाची कबर उखडून टाकण्यावरुन वाद विवाद झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आक्रमक भूमिका घेतली होती. यानंतर आता औरंगजेब कबर या प्रकरणावर प्रसिद्ध महंत रामगिरी महाराज यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

महंत रामगिरी महाराज यांनी अशा पद्धतीच्या कबरी महाराष्ट्रामध्ये नकोय असे म्हटलं आहे. ते म्हणाले की, “औरंगजेब आक्रांत होता, तो काही भारतीय नव्हता, अशा प्रकारच्या आक्रांत लोकांना आदर्श मानून आराजकता पसरवण्याचे कामे होतात, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

पुढे रामगिरी महाराजांनी अमेरिकेचे देखील उदाहरण दिले. ते म्हणाले की, “ओसामा बिन लादेनला पाकिस्तानमध्ये घुसून अमेरिकेने ठार मारले. पण त्याच्या कबरीला जागा मिळू दिली नाही. असे आक्रांत लोक कबरीत गेले तर लोक त्याला आदर्श मानतात आणि अराजकता माजवतात त्यामुळे अशा लोकांच्या कबरी नकोत” असं महंत रामगिरी महाराज यांनी म्हटले आहे.

नागपूरमध्ये एवढे दगड आले कुठून?

पुढे रामगिरी महाराज म्हणाले की, “औरंगजेबाची कबर काढणं न काढणं हा सरकारचा विषय आहे. ज्या नावाने जेव्हा अराजकता वाढते, त्यावेळी असे प्रश्न निर्माण होतात, म्हणून हिंदुत्ववादी संघटनेने हा प्रश्न उपस्थित केला आहे. त्याला काही कारण आहे, जसं नागपूरमध्ये दंगल झाली ती अराजक तत्त्वाने केली आहे. हे ठरवून झालेलं आहे. नागपूरमध्ये एवढे दगड आले कुठून? अराजक लोकांना आदर्श मानून काही लोक असे प्रकार करतात आणि दंगली घडतात,” असे स्पष्ट मत रामगिरी महाराजांनी व्यक्त केले आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

प्रत्येक धर्मात चांगले वाईट लोक असतात

भाजप नेते व मंत्री नितेश राणे हे अनेकदा टोकाची भूमिका घेत मुस्लिम धर्माविरोधात वादग्रस्त विधाने करतातय याबाबत महंत रामगिरी महाराज म्हणाले की, “कुणी कुणाच्या धर्माविषयी बोलणं हा विषय वेगळा आहे. धर्माबद्दल बोलण्याऐवजी त्या धर्मामध्ये जी अराजक तत्व असतात, त्यांच्याविषयी बोलणं महत्त्वाचं असतं. प्रत्येक धर्मात चांगले वाईट लोक असतात. पण धर्माच्या नावाखाली कोणी अराजकता निर्माण करत असेल तर त्याला विरोध करणं गरजेचंच असत” असे स्पष्ट मत महंत रामगिरी महाराज यांनी व्यक्त केले आहे.

 

 

Web Title: Mahant ramgiri maharajs reaction to the aurangzeb tomb controversy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2025 | 01:19 PM

Topics:  

  • Aurangzeb Kabar
  • CM Devendra Fadnavis
  • ramgiri maharaj

संबंधित बातम्या

CM Relief Fund: रुग्णांसाठी सरकारचा ‘हा’ विभाग ठरतोय मदतशीर; अमरावती विभागात तब्बल १०.६१ कोटींची मदत
1

CM Relief Fund: रुग्णांसाठी सरकारचा ‘हा’ विभाग ठरतोय मदतशीर; अमरावती विभागात तब्बल १०.६१ कोटींची मदत

Devendra Fadnavis: ‘अंधत्व मुक्त महाराष्ट्र’च्या मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेला ‘दृष्टी यज्ञ’च्या माध्यमातून बळ
2

Devendra Fadnavis: ‘अंधत्व मुक्त महाराष्ट्र’च्या मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेला ‘दृष्टी यज्ञ’च्या माध्यमातून बळ

Devendra Fadnavis: मुंबईकरांचे पोट भरणाऱ्यांना मिळणार हक्काची घरे; मुख्यमंत्री फडणवीसांनी केली ‘ही’ घोषणा
3

Devendra Fadnavis: मुंबईकरांचे पोट भरणाऱ्यांना मिळणार हक्काची घरे; मुख्यमंत्री फडणवीसांनी केली ‘ही’ घोषणा

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरावर सुवर्ण कलशारोहण; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “पसायदानाद्वारे अखिल…”;
4

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरावर सुवर्ण कलशारोहण; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “पसायदानाद्वारे अखिल…”;

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.