Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोणी मुलगी देता का मुलगी? नोकरी, जमीन असूनही लग्नासाठी मुलांना मिळेना मुलगी; शेतकरी असला तर…

मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण वाढले आहे. मुलगी आता स्वयंपूर्ण झाली आहे. तिला स्वतःच्या नोकरीत मिळणाऱ्या पॅकेजपेक्षा जास्तच पॅकेज मुलाकडून अपेक्षित आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 05, 2025 | 11:05 AM
प्रियकराची हत्या, प्रेयसीने मृतदेहासोबत केले लग्न

प्रियकराची हत्या, प्रेयसीने मृतदेहासोबत केले लग्न

Follow Us
Close
Follow Us:

रांजणी / रमेश जाधव : शिक्षण, पैसा, प्रॉपर्टीबाबत अवाजवी अपेक्षा वाढल्यामुळे विवाहासाठी इच्छुक असणाऱ्यांची लग्न जुळवताना प्रचंड दमछाक होत असल्याचे सध्या तरी दिसून येत आहे. घरदार, नोकरी, बँक बॅलन्स व्यवस्थित असतानाही विवाह इच्छुक मुलांनी वयाची चाळीशी गाठली आहे. शेतकरी तसेच 25 ते 30 हजार पगाराची नोकरी करणाऱ्या मुलांना लग्नासाठी मुलीच मिळत नसल्याची सध्याची खरी आणि वास्तव वस्तुस्थिती पाहायला मिळत आहे.

खरं तर मुलांची लग्न करताना अनेक कारणे समोर येत आहेत. सध्याच्या मुलींना शेतकरी मुलगा नकोच आहे, त्याचबरोबर या मुलींना मुलाचे आई-वडील नको, मुलींना मुलाची नोकरी आणि निवासस्थान देखील एकाच शहरात नको. बऱ्याच मुलींना मुलाचे आई-वडील नको असं अनेकदा लग्न जमवतेवेळी अनुभवायला मिळत आहे. सामान्य घरातील 15 ते 20 हजार रुपये महिन्याला कमविणाऱ्या मुलाशी लग्न करायला मुलींची मानसिकता नसल्याचे दिसून येते.

हेदेखील वाचा : Anandacha Shidha: यंदा आनंदाचा शीधा’ नाही, शिवभोजन थाळीत काटकसर; लाडकी बहीण योजनेचा मोठा फटका

मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण वाढले आहे. मुलगी आता स्वयंपूर्ण झाली आहे. तिला स्वतःच्या नोकरीत मिळणाऱ्या पॅकेजपेक्षा जास्तच पॅकेज मुलाकडून अपेक्षित आहे. पदवीपर्यंत शिक्षण असलेल्या मुलीही आता मुलाच्या किमान पगाराची अपेक्षा 50 हजारापर्यंत आहे. शहरातील विवाह संस्थांकडे नोंदणी होत असलेल्या एकाही मुलीला शेतकरी मुलगा नकोच आहे. एवढेच काय तर शेतकऱ्याच्या मुलीलाही शेतकरी नवरा नको आहे. शेती भरपूर असली तरी शेतीवर अवलंबून असलेल्या मुलाला पसंत करायला मुली तयारच होत नाहीत ही सध्याची खरी वस्तुस्थिती आहे.

अपेक्षा ठेवल्याने वाढत जातंय वय

मुलांचे शिक्षण झाल्यानंतर नोकरी मिळवून स्थिरस्थावर होईपर्यंत साधारणतः वयाची तीस वर्षे होतात, त्यानंतर मुलीचा शोध सुरू होतो. सुरुवातीला अपेक्षा जास्त असतात. त्यातच वयाची 35 ओलांडून जाते. पुढे अपेक्षांची तडजोड न केल्यास मुलांचे लग्न रखडते. या सर्व बाबी पाहता मुलाची चाळीशी ओलांडून जाते. तरी देखील त्याचे लग्न जमत नाही ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही.

मुलींना शेतकरी मुलगा नको

शहरातील विवाह संस्थांकडे नोंदणी होत असलेल्या एकाही मुलीला शेतकरी मुलगा नको असल्याचे दिसून येते. तसेच ग्रामीण भागात देखील आता विवाह संस्था सुरू झाल्या असून, या विवाह संस्थांमध्ये देखील ग्रामीण मुलींना शेतकरी नवरा नको असल्याचे दिसून आले आहे.

Web Title: Many youth not getting girl for marriage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2025 | 11:04 AM

Topics:  

  • Hindu Marriage
  • maharashtra news

संबंधित बातम्या

देशातील पहिला Indoor Live एंटरटेनमेंट अरेना नवी मुंबईत, सिडकोतर्फे प्रकल्प उभारण्याच्या प्रक्रियेला सुरुवात
1

देशातील पहिला Indoor Live एंटरटेनमेंट अरेना नवी मुंबईत, सिडकोतर्फे प्रकल्प उभारण्याच्या प्रक्रियेला सुरुवात

Yashomati Thakur : वर्षभरात जनता आणि राज्याला काय दिले, यशोमती ठाकुरांचा सरकारला सवाल
2

Yashomati Thakur : वर्षभरात जनता आणि राज्याला काय दिले, यशोमती ठाकुरांचा सरकारला सवाल

Ahilyanagar News: शिक्षकांचा ‘टीईटी’ सक्तीला जोरदार विरोध! शाळा बंद आंदोलन करण्याचा इशारा
3

Ahilyanagar News: शिक्षकांचा ‘टीईटी’ सक्तीला जोरदार विरोध! शाळा बंद आंदोलन करण्याचा इशारा

पुण्यात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळासंदर्भात घडामोडींना वेग; सोमवारी महत्त्वपूर्ण बैठक
4

पुण्यात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळासंदर्भात घडामोडींना वेग; सोमवारी महत्त्वपूर्ण बैठक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.