Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सोमवारी अहमदनगरमध्ये मनोज जरांगेंची शांतता रॅली, शाळांना सुट्टी जाहीर

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी 7 ऑगस्टपासून शांतता रॅली सुरु केली आहे. या रॅलीमध्ये लाखो मराठा बांधव सहभागी होत आहेत. सोमवारी अहमदनगर शहरात शांतता रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. याच पार्श्वभुमीवर अहमदनगरमधील सर्व शाळांना 12 ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 10, 2024 | 02:28 PM
सोमवारी अहमदनगरमध्ये मनोज जरांगेंची शांतता रॅली (फोटो सौजन्य - pinterest)

सोमवारी अहमदनगरमध्ये मनोज जरांगेंची शांतता रॅली (फोटो सौजन्य - pinterest)

Follow Us
Close
Follow Us:

मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेली शांतता रॅली सोमवारी 12 ऑगस्ट रोजी अहमदनगरमध्ये धडकणार आहे. राज्यात मराठा आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत आहे. तसेच मनोज जरांगे यांनी सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी सरकारला 13 ऑगस्टपर्यंतचा वेळ दिला आहे. मनोज जरांगेनी सरकारला दिलेल्या अल्टिमेटमच्या आदल्या दिवशी अहमदनगरमध्ये शांतता रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे या रॅलीला मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. हीच शक्यता लक्षात घेता, जिल्हा प्रशासनाने अहमदनगरमधील सर्व शाळांना 12 ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर केली आहे.

हेदेखील वाचा- मावळ लोकसभा निवडणूक निकालाला आव्हान देणारी याचिका फेटाळली; बारणेंसह पराभूत उमेदवारांच्या विरोधात सुधारित याचिका दाखल

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण, सगेसोयरे अधिसूचनेची तातडीने अंमलबजावणी करावी आणि मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी शांतता रॅली सुरु केली आहे. पश्चिम महाराष्ट्रातून जरांगेंनी शांतता रॅलीला सुरुवात केली आहे. या रॅलीमध्ये लाखो मराठा बांधव सहभागी होत आहेत. या रॅलीच्या माध्यमातून मराठा समाजाचे भव्य शक्तिप्रदर्शन केलं जात आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेली ही रॅली सोमवारी 12 ऑगस्ट रोजी अहमदनगरमध्ये दाखल होणार आहे. या रॅलीला मराठा बांधवांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभमीवर जिल्हा प्रशासनाने अहमदनगरमधील सर्व शाळांना 12 ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर केली आहे. याबाबत एक पत्रक देखील प्रसिध्द करण्यात आलं आहे.

पत्रकात म्हटलं आहे की, सोमवारी 12 ऑगस्ट रोजी अहमदनगर शहरात मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मराठा आरक्षण जनजागृती व महाविराट शांतता रॅलीचं आयोजन केलं आहे. यावेळी अहमदनगर जिल्ह्यातील मराठा समाज मोठ्या प्रमाणात एकत्रित होणार आहे. सदर गर्दीचा विचार करून शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून अहमदनगर शहर व उपनगरातील सर्व माध्यमांच्या, सर्व व्यनस्थापनाच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांना सोमवार 12 ऑगस्ट रोजी सुट्टी देण्यात येणार असून विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी सदर तासिका इतर दिवशी भरून काढाव्यात.

हेदेखील वाचा- नंदीग्राम एक्सप्रेसच्या स्वच्छतागृहात एकाची गळफास घेऊन आत्महत्या; दादर रेल्वे स्टेशनवरील घटना

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण, सगेसोयरे अधिसूचनेची तातडीने अंमलबजावणी करावी आणि मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी शांतता रॅली सुरु केली आहे. 7 ऑगस्टपासून पश्चिम महाराष्ट्रातून मनोज जरांगेंच्या रॅलीला सुरुवात झाली आहे. सोलापूर, सांगली, कोल्हापूरमध्ये मनोज जरांगेंच्या रॅलीचे भव्य स्वागत करण्यात आले. या रॅलीत मोठ्या संख्येने मराठा बांधव सहभागी झाले आहेत. या रॅलीदरम्यान जरांगेनी मंत्री छगन भुजबळ आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजाणी करण्यासाठी जरांगेंनी सरकारला 13 ऑगस्टपर्यंतचा वेळ दिला आहे. 13 ऑगस्टपर्यंत मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही तर विधानसभेत उतरत सर्व जागा लढण्याचा इशारा जरांगेंनी सरकारला दिला आहे. त्यामुळे आता आरक्षण दिलं नाही तर जरांगे कोणते उमेदवार विधानसभेच्या मैदानात उतरवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Web Title: Maratha reservation monday announced a holiday for schools in nagar over manoj jaranges peace rally

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2024 | 02:27 PM

Topics:  

  • Manoj Jarange
  • Maratha Reservation
  • Nagar News

संबंधित बातम्या

देवेंद्र फडणवीसांनी ओबीसी आरक्षण नाकारलं; राष्ट्रवादीचे ओबीसी नेते राज राजापूरकर यांचा आरोप
1

देवेंद्र फडणवीसांनी ओबीसी आरक्षण नाकारलं; राष्ट्रवादीचे ओबीसी नेते राज राजापूरकर यांचा आरोप

सरकारचं टेन्शन वाढणार! हातकणंगलेतून 25 हजार मराठा बांधव मुंबईला जाणार
2

सरकारचं टेन्शन वाढणार! हातकणंगलेतून 25 हजार मराठा बांधव मुंबईला जाणार

Latur : प्रताप सरनाईकांनी घेतली जरांगे पाटलांची भेट; सरनाईक म्हणाले की…
3

Latur : प्रताप सरनाईकांनी घेतली जरांगे पाटलांची भेट; सरनाईक म्हणाले की…

‘कोणीही आडवा आला, माझा जीव गेला तरी…’; मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला इशारा
4

‘कोणीही आडवा आला, माझा जीव गेला तरी…’; मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.