
chhagan bhujbal
पंढरपूर : पंढपुरात ओबीसी समाजाकडून एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक ओबीसी नेते उपस्थित होते. यावेळी पुन्हा एकदा मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला आहे. आज अन्याय करणारे बदलेले आहेत, ज्योतिबांनी जेव्हा शाळा काढण्याचं काम हाती घेतलं त्यांच्यासोबत अनेक ब्राम्हण देखील होते. त्यांना ब्राम्हणांनी मदत केली. काहीही झालं तरी आम्ही ओबीसीतून आरक्षण घेऊ देणार नाही, असेही छगन भुजबळांनी म्हटले ओबीसींच्या एल्गार मेळाव्यात म्हटले. पंढरपुरात ओबीसी महाएल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं.
पांडुरंग सगळ्यांचा आहे
हा पांडुंरग सगळ्यांचा आहे. मी मागच्या वेळीदेखील सगळ्या संतांची नावं वाचून दाखवली होती. या सगळ्या संतांचं म्हणणं एकच आहे. सगळे एकत्र येऊ. निवडणूक आली की सगळ्या पक्षांचे नेते पांडुरंगाचं दर्शन घ्यायला जातात. तेव्हा त्यांना अडवलं जात नाही. मग आरक्षणाच्या वेळेसच का अडवलं जातं, असा सवाल भुजबळांनी यावेळी उपस्थित केला.
ओबीसीमधून आरक्षण मिळणार नाही
ओबीसी समाजातून मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही म्हणजे नाही. आरक्षण स्वतंत्र्य घ्या. ओबीसीमधून आरक्षण तुम्हाला मिळणार नाही, असं देखील भुजबळांनी म्हटलं. आमचा मराठा आरक्षणाला आणि मराठा समाजालाही विरोध नाही. पण आरक्षणाखाली जी झुंडशाही सुरु आहे, त्याला आमचा विरोध आहे, असं भुजबळांनी म्हटलं.
ती मावळ्यांची सेना होती
शिवरायांच्या नावावरुन आम्हाला बोललं जातं. पण लक्षात ठेवा छत्रपतींची मराठा सेना नव्हती ती मावळसेना होती. छत्रपतींची समाधी ही महात्मा फुलेंनी शोधून काढली. पहिली शिवजयंती फुलेंनी सुरू केली. पहिला पोवाडा फुलेंनी सुरू केला. शिवाजी महाराजांचं नाव घेता आणि आमच्यावर हल्ले करता, असा सवालदेखील भुजबळांनी यावेळी उपस्थित केला.