
माऊली भेटली सोपाना; आनंद वैष्णवांना! मुख्यमंत्र्यांचा सहभाग; लाखो वारकऱ्यांच्या साक्षीने बंधूभेट सोहळा
आषाढी वारीतील अत्यंत भावस्पर्शी आणि भक्तिमय क्षण मानला जाणारा संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि संत सोपानकाका यांच्या बंधुभेटीचा सोहळा बुधवारी पंढरपूर तालुक्यातील टप्पा येथे लाखो वारकऱ्यांच्या झाला। उपस्थितीत उत्साहात पार पडला. ‘माऊली भेटली सोपाना। आनंद वैष्णवांना। टाळ मृदंगाचा गजर झाला। पंढरीचा मार्ग सुगंधी झाला॥’ या अभंगाचा गजर। यावेळी झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमुळे यंदाच्या सोहळ्याला महत्त्व प्राप्त झाले. टाळ-मृदंगांचा निनाद, ‘विठ्ठल… विठ्ठल’, ‘ज्ञानोबा-तुकाराम’ च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. भगव्या पताका, हरिनामाचा गजर आणि भाविकांच्या डोळ्यांतील भक्तिभाव अशा वातावरणातभेटीचा सोहळा अविस्मरणीय ठरला. यावेळीपालकमंत्री जयकुमार गोरे, आ. सचिन कल्याणशेट्टी, आ. अभिजीत पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, माजी खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर, माजी आ. राम सातपुते उपस्थित होते.(फोटो सौजन्य – AI)
वारीच्या परंपरेनुसार संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत सोपानकाका यांच्या पालख्यांची ही बंधूभेट वारकऱ्यांसाठी पवित्र मानली जाते. या ऐतिहासिक क्षणाचे दर्शन घेण्यासाठी टप्पा येथे लाखो वारकरी आणि ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती. मानाच्या पालख्यांनी पंढरपूर तालुक्यात प्रवेश करताच वारीतील भक्तीचा उत्साह शिगेला पोहोचला.
संतकृपा झाली। इमारत फळा आली ॥ ज्ञानदेवे रचिला पाया। उभारिले देवालया ॥’ या अभंगाप्रमाणे संतश्रेष्ठ श्री महाराजांच्या कृपाछायेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी जिल्ह्यातील दसूरपाटी येथे माऊलींच्या पालखीचे दर्शन घेतले. माऊलींच्या पादुकांसमोर नतमस्तक होत त्यांनी राज्यातील जनतेच्या सुख-समृद्धी, आरोग्य, शांतता आणि भरभराटीसाठी प्रार्थना केली. संत ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेला समता, अध्यात्म, मानवता आणि लोककल्याणाचा संदेश आजही समाजाला मार्गदर्शक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. दसुरपाटी परिसरात माऊलींच्या पालखीचे आगमन होताच संपूर्ण वातावरण भक्तिरसात न्हाऊन निघाले. टाळ-मृदंगाचा गजर, भगव्या पताका आणि ‘ज्ञानोबा-तुकाराम ‘च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. मुख्यमंत्री फडणवीस यांनी वारकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या भावना जाणून घेतल्या. मुख्यमंत्र्यांच्या दर्शनामुळे वारीतील भक्तिभावाला अधिक बळ मिळाले असून, संत परंपरेप्रती शासनाचा आदर आणि वारकरी संप्रदायाविषयीची श्रद्धा पुन्हा अधोरेखित झाल्याची भावना वारकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
‘कानडा राजा पंढरीचा’तून भक्तीचा जागर! आषाढी एकादशीनिमित्त मुंबईत विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन
७७ पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली दोन वर्षांत आषाढी वारीचे स्वरूप आमूलाग्र बदलले आहे. वारकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी शासनाने सर्व प्रकारच्या सुविधा दिल्यामुळे यंदाच्या वारीला विक्रमी संख्येने भाविक सहभागी होत असून, मागील सर्व वारींचे संख्यात्मक विक्रम मोडले जातील, सर्वयंत्रणांचे कौतुक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.