Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“मुख्यमंत्री झाल्यावर शिव्या शाप…”; २८८ उमेदवारांच्या मुद्द्यावरून भुजबळांचा जरांगे पाटलांना खोचक टोला

मराठा समाजाला निवडणुकीपूर्वी ओबीसीतून तसेच सगेसोयरेंची अंमलबजावणी करून आरक्षण न दिल्यास राज्यात २८८ उमेदवार उभे करायचे किंवा २८८ उमेदवार पाडायचे याबाबत जरांगे पाटील आपला निर्णय घेणार आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 18, 2024 | 05:11 PM
''मुख्यमंत्री झाल्यावर शिव्या शाप...''; २८८ उमेदवारांच्या मुद्द्यावरून भुजबळांचा जरांगे पाटलांना खोचक टोला

''मुख्यमंत्री झाल्यावर शिव्या शाप...''; २८८ उमेदवारांच्या मुद्द्यावरून भुजबळांचा जरांगे पाटलांना खोचक टोला

Follow Us
Close
Follow Us:

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील हे चांगलेच आक्रमक झाले आहेत. मात्र राज्यातील मराठा आरक्षणाचा मुद्दा अजूनही सुटलेला नाही. विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिले आहे. मात्र ओबीसींमधून आणि सगेसोयरेची अंमलबाजवणी करूनच आम्हाला आरक्षण हवे असे जरांगे पाटलांची मागणी आहे. त्यात मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातील संघर्ष आपल्याला सर्वश्रुत आहे. नुकतीच जरांगे पाटील यांची नाशिकमध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी शांतता रॅली पार पडली. यावरून छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आमने सामने आलेले पाहायला मिळत आहे. भुजबळांनी जरांगे पाटलांच्या २८८ उमेदवारांच्या मुद्द्यवरून त्यांना टोला लगावला आहे.

मराठा समाजाला निवडणुकीपूर्वी ओबीसीतून तसेच सगेसोयरेंची अंमलबजावणी करून आरक्षण न दिल्यास राज्यात २८८ उमेदवार उभे करायचे किंवा २८८ उमेदवार पाडायचे याबाबत जरांगे पाटील आपला निर्णय घेणार आहेत. २९ ऑगस्ट रोजी मनोज जरांगे पाटील हे याबाबतची भूमिका जाहीर करणार आहेत. दरम्यान याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांना टोला लगावला आहे.

काय म्हणाले छगन भुजबळ?

छगन भुजबळ बोलताना म्हणाले, ”मनोज जरांगे पाटील तुम्ही २८८ उमेदवार उभे करा. त्याच्यासाठी त्यांना वेळ द्या. मला शिव्या देऊन काय फायदा? जर का तुमचे उमेदवार निवडून आले तर तुम्ही विजयी होणार. कदाचित तुम्ही मुख्यमंत्री होणार. पण मुख्यमंत्री झाल्यावर शिव्या शाप देऊन चालत नाही. त्यामुळे आतापासूनच जरा वागणे सुधारले पाहिजे.” वरील प्रतिक्रियेत छगन भुजबळांनी मनोज जरांगे पाटलांना खोचक टोला लगावला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा मनोज जरांगे छगन भुजबळांच्या या प्रतिक्रियेवर काय बोलणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

Web Title: Minister chagan bhujbal criticized on maratha reservation protest leader manoj jarange patil for 288 candidates in maharashtra election

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2024 | 05:10 PM

Topics:  

  • Chagan Bhujabal

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.