Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mira Bhayander : दहिसर टोलनाका स्थलांतराच्या वादावरून भाजप-शिवसेना आमने सामने

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील दहिसर पथकर नाका वर्सोवा येथे स्थलांतरित करण्याची घोषणा शिंदे गटाच्या शिवसेनेकडून करण्यात आली असली तरी या निर्णयावरून आता राज्याच्या राजकारणात प्रचंड गोंधळ माजला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Sep 20, 2025 | 04:31 PM
Mira Bhayander : दहिसर टोलनाका स्थलांतराच्या वादावरून भाजप-शिवसेना आमने सामने
Follow Us
Close
Follow Us:

भाईंदर : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील दहिसर पथकर नाका वर्सोवा येथे स्थलांतरित करण्याची घोषणा शिंदे गटाच्या शिवसेनेकडून करण्यात आली असली तरी या निर्णयावरून आता राज्याच्या राजकारणात प्रचंड गोंधळ निर्माण झाला आहे. याचं कारण म्हणजे वर्सोवा येथील जागा वन विभागाच्या नियंत्रणात असून येथे टोल नाका उभारण्यास वनमंत्री गणेश नाईक यांनी स्पष्ट नकार दिला आहे. त्यामुळे भाजप-शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आल्याची चर्चा रंगू लागली आहे.

शिंदे यांची घोषणा – सरनाईकांचा दावा

मुंबईतील प्रवाशांना दिलासा देण्यासाठी दहिसर पथकर नाका वर्सोव्याला हलवला जाणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. यामुळे मुंबईच्या वेशीवरील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होईल, असा दावा त्यांनी केला. याचबरोबर प्रत्यक्ष कामकाज सुरू असल्याचा दावा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केला आहे.

नागरिकांचा आक्षेप – वाहतूक कोंडीचा धोका

या घोषणेनंतर मिरा-भाईंदर आणि वसई-विरार परिसरात मात्र विरोधाची लाट उसळली आहे. वर्सोवा परिसरातील रस्ता अत्यंत अरुंद असून टोल नाका उभारल्यास मोठा ताण घोडबंदर गावावर पडेल, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.अवजड वाहनांवर होणारी शुल्क आकारणी थेट मिरा-भाईंदरकरांच्या माथी मारली जाईल, अशीही नाराजी व्यक्त होत आहे. ठाण्याकडे जाणाऱ्या मार्गावरही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होईल, असे वसई-विरारकरांचे म्हणणे आहे.सर्वसामान्य प्रवाशांना ‘दहिसर’ गाठण्याची आवश्यकता नसतानाही टोल भरावा लागेल, अशी चिंता नागरिक संघटनांकडून मांडली जात आहे.

वनमंत्र्यांचा स्पष्ट नकार

नुकत्याच वाशी येथे झालेल्या लोकदरबारात भूमिपुत्र संघटनेकडून हा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यावेळी वनमंत्री गणेश नाईक यांनी ठाम भूमिका घेत सांगितले की,वर्सोवा परिसरातील जागा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखाली येते.रस्ता अरुंद असल्याने टोल नाक्यामुळे येथील वाहतूक विस्कळीत होईल.त्यामुळे येथे कोणतेही बांधकाम करण्यास आमचा स्पष्ट नकार आहे.

बेकायदेशीर टोलचा मुद्दा

भूमिपुत्र संघटनेचे नेते सुशांत पाटील यांनी या संदर्भात गंभीर आक्षेप घेतले आहेत.राष्ट्रीय महामार्गावर एमएसआरडीसीचा विद्यमान टोल नाका बेकायदेशीर आहे, असा त्यांचा आरोप आहे.महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार दहिसर टोल नाका सप्टेंबर २०२७ पर्यंत बंद होणे आवश्यक आहे.तरीदेखील नाक्याचे स्थलांतर करून लोकांना नाहक त्रास दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

राजकीय वर्तुळात चर्चा

या वादामुळे आगामी मिरा-भाईंदर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने शिंदे गटाची अडचण वाढवण्याची रणनीती आखल्याचे बोलले जात आहे. शिंदे यांच्या महत्त्वाकांक्षी घोषणेला वनमंत्र्यांच्या भूमिकेमुळे खीळ बसली असून, भाजप-शिवसेना (शिंदे गट) संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.एकीकडे प्रवाशांना दिलासा देण्याच्या नावाखाली नाक्याचे स्थलांतर करण्याचा प्रयत्न सुरू असताना, दुसरीकडे पर्यावरण, वाहतूक कोंडी आणि स्थानिक नागरिकांच्या तक्रारी या निर्णयाला अडथळा आणत आहेत. परिणामी दहिसर पथकर नाका वर्सोवा स्थलांतराचा निर्णय सध्या तरी वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

Web Title: Mira bhayander bjp shiv sena face off over dahisar toll plaza relocation dispute

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 20, 2025 | 04:25 PM

Topics:  

  • BJP-Shivsena
  • Dahisar
  • mira bhayandar

संबंधित बातम्या

Vasai Virar Crime News: आयुष्य इतकं स्वस्त झालं आहे का? वसई विरार परिसरात एकाच दिवशी 6 जणांची आत्महत्या
1

Vasai Virar Crime News: आयुष्य इतकं स्वस्त झालं आहे का? वसई विरार परिसरात एकाच दिवशी 6 जणांची आत्महत्या

BMC Politics: ७४ हजार कोटींचे बजेट आणि सत्तेचा सारीपाट; BMCच्या तिजोरीच्या चाव्या कुणाकडे?
2

BMC Politics: ७४ हजार कोटींचे बजेट आणि सत्तेचा सारीपाट; BMCच्या तिजोरीच्या चाव्या कुणाकडे?

Mira Bhayandar : डिंपल मेहता यांनी स्वीकारला मीरा भाईंदरच्या महापौर पदाचा पदभार
3

Mira Bhayandar : डिंपल मेहता यांनी स्वीकारला मीरा भाईंदरच्या महापौर पदाचा पदभार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.