Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मनसेचा गृहमंत्री असता तर…; बदलापूरच्या घटनेवरुन अविनाश जाधव संतापले

बदलापूरमधील एका नामांकित शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणावरुन आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी गृह विभागाला लक्ष्य करीत संताप व्यक्त केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 20, 2024 | 05:08 PM
मनसेचा गृहमंत्री असता तर…; बदलापूरच्या घटनेवरुन अविनाश जाधव संतापले
Follow Us
Close
Follow Us:

ठाणे : बदलापूरमधील एका नामांकित शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादराला आहे. या घटनेच्या निषेधार्थ सध्या शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून केली जात आहे. या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणावरुन आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी गृह विभागाला लक्ष्य करीत संताप व्यक्त केला आहे.

या प्रकरणात अधिक गांभीर्याने लक्ष देऊन फास्ट ट्रॅकवर केस चालवली पाहिजे अशी मागणी करत इथे जर मनसेचा गृहमंत्री असता तर जागेवर एन्काऊण्टर केला असता, असा संताप जाधव यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला कार्यकर्त्या गेल्या अनेक दिवसांपासून घटनेचा पाठपुरावा करत होत्या. जे घडले ते खूपच वाईट होते. असा मानसिकतेच्या लोकांचा एन्काऊंटर झाला पाहिजे. गृह खात्याने यांना ठोकले पाहिजे. लहान मुलींच्या अंगावर हात टाकण्याची कुणाची हिम्मत होणार नाही. असंही जाधव म्हणाले.

बदलापूर शहरातील नामांकित शाळेत शिशुवर्गात शिकणाऱ्या दोन चिमुकलींवर शाळेतील सफाई कामगार अक्षय शिंदे याने अत्याचार केल्याची घटना शनिवारी समोर आली. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात तसेच इतर तपासाच्या आणि वैद्यकीय बाबींमध्ये आणि आरोपीला पकडण्यात बदलापूर पूर्व पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक शुभदा शितोळे आणि पोलिस प्रशासनाने उदासीन भूमिका घेत विलंब केल्याचा आरोप काही सामाजिक आणि राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी केला होता. मंगळवारी सकाळी बदलापूर स्टेशनवर हजारो महिलांनी एकत्र येऊन घटनेचा निषेध व्यक्त केला. यावेळी महिलांनी लोकल ट्रेन रोखून धरल्या तसेच रिक्षा चालकांनीही रिक्षा बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दिला.

बदलापूरमध्ये तणावाचे वातावरण

बदलापूर घटनेवरून नागरिकांमध्ये मोठा संताप आहे. आदर्श शाळेत दोन चिमुकल्या विद्यार्थिनींवर झालेल्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर आज हजारो नागरिक रस्त्यावर उतरले. सकाळपासून नागरिकांनी शाळेबाहेर आंदोलन सुरू केले, शेकडो नागरिकांनी उपनगरीय रेल्वेची वाहतूकही रोखून धरल्याने मध्य रेल्वेची वाहतूकसेवा बंद पडली आहे. गेल्या दोन तासांपासून रेल्वेसेवा ठप्प झाली आहे. संपूर्ण बदलापुरात संतापाचे वातावरण आहे.

 

Web Title: Mns leader avinash jadhav was furious over the badlapur incident nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2024 | 05:08 PM

Topics:  

  • avinash jadhav
  • Badlapur case
  • devendra fadanvis

संबंधित बातम्या

Nepal Protest: नेपाळमध्ये महाराष्ट्राच्या 150 पर्यटकांची सुटका कधी होणार? अखेर देवेंद्र फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया
1

Nepal Protest: नेपाळमध्ये महाराष्ट्राच्या 150 पर्यटकांची सुटका कधी होणार? अखेर देवेंद्र फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया

Maharashtra Cabinet : मुंबई-ठाणे नवीन मेट्रो, पुणे-लोणावळा चौपदरीकरण मंजूर; कॅबिनेट बैठकीत १५ महत्त्वाचे निर्णय
2

Maharashtra Cabinet : मुंबई-ठाणे नवीन मेट्रो, पुणे-लोणावळा चौपदरीकरण मंजूर; कॅबिनेट बैठकीत १५ महत्त्वाचे निर्णय

Mumbai News : बीडीडी चाळीतील रहिवाशांना हक्काचं घर; काय म्हणाले देवेंद्र फडणवीस, पाहा व्हिडीओ
3

Mumbai News : बीडीडी चाळीतील रहिवाशांना हक्काचं घर; काय म्हणाले देवेंद्र फडणवीस, पाहा व्हिडीओ

नारायण राणेंनी वयाचं आणि केसावरील टोपाचं भान ठेवलं पाहिजे – Sanjay Raut
4

नारायण राणेंनी वयाचं आणि केसावरील टोपाचं भान ठेवलं पाहिजे – Sanjay Raut

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.