Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गटारी जीवावर बेतली! पार्टीसाठी गेलेले 5 जण नदीत बुडाले; एकाचा मृत्यू, एक बेपत्ता

गटारीचा उत्साह सुरु असतानाच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गटारीची पार्टी करण्यासाठी गेलेले 5 जण नदीत बुडाल्याची घटना घडली आहे. मुंबईतील तानसा नदी क्षेत्रात ही घटना घडली आहे. यातील तिघांना वाचवण्यात यश आलं आहे, तर एकाचा मृत्यू झाला आहे. एकाचा शोध सुरु आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 04, 2024 | 02:40 PM
जलविहाराचा आनंद घेण्यासाठी जात असतानाच दुर्घटना; समुद्रात बोटच बुडाली

जलविहाराचा आनंद घेण्यासाठी जात असतानाच दुर्घटना; समुद्रात बोटच बुडाली

Follow Us
Close
Follow Us:

आज सर्वत्र गटारीचा उत्साह सुरु आहे. सगळीकडे मटण आणि मासे खरेदी करण्यासाठी लोकांच्या रांगा लागल्या आहेत. श्रावण सुरु होणार असल्याने सर्वचजण गटारी साजरी करण्यासाठी नॉन व्हेज पार्ट्यांचे आयोजन करत आहेत. मात्र हा उत्साह सुरु असतानाच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गटारीची पार्टी करण्यासाठी गेलेले 5 जण नदीत बुडाल्याची घटना घडली आहे. मुंबईतील तानसा नदी क्षेत्रात ही घटना घडली आहे. यातील तिघांना वाचवण्यात यश आलं आहे, तर एकाचा मृत्यू झाला आहे. एकाचा शोध सुरु आहे.

हेदेखील वाचा- नाशिककरांना मोठा दिलासा! गंगापूर धरणातून अखेर पाण्याचा विसर्ग सुरु

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शहापूर तालुक्यातील तानसा नदी क्षेत्रात 5 जण गटारीची पार्टी करण्यासाठी गेले होते. हे सर्वजण धरणाच्या 1 नंबर गेटच्या जवळ गाडीमधून बसून पार्टी करत होते. मात्र यावेळी अचानक तानसा धरणाचे स्वयंचलित २४ दरवाजे उघडण्यात आले. त्यामुळे धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु झाला. अचानक पाणी सुरु झाल्याने पाचही जण गाडीसह नदीच्या प्रवाहाच्या दिशेने वाहू लागले. यावेळी त्यातील तिघांना गाडीच्या बाहेर उडी मारली, तर दोन जण गाडीमध्येच अडकले.

हेदेखील वाचा- मुलाचा छंद जोपासायला आम्‍ही सक्षम, शिकविण्‍याची गरज नाही; विखेंचा थोरातांना टोला

पाण्याचा प्रवाह वाढत गेल्याने गाडी अगदी काही क्षणातच नदी पात्रात बुडाली. त्यामुळे उर्वरित दोघांना पाण्यातून बाहेर येणं कठीण झालं. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक आणि पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने तात्काळ बचावकार्य सुरु केलं. या शोध कार्यात एकाचा मृतदेह सापडला तर एक जण अजूनही बेपत्ता आहे. बेपत्ता तरूणाचा शोध सुरु आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई आणि कल्याण क्षेत्रातील 5 मित्र शहापूर तालुक्यातील तानसा नदी क्षेत्रात गटारीची पार्टी करण्यासाठी गेले होते. हे मित्र धरणाच्या 1 नंबर गेटच्या जवळ गाडीमधून बसून पार्टी करत होते. मात्र यावेळी अचानक तानसा धरणाचे स्वयंचलित २४ दरवाजे उघडण्यात आले. त्यामुळे धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु झाला. पाण्याच्या प्रवाहात चही जण गाडीसह नदीच्या दिशेने वाहू लागले. यावेळी त्यातील तिघांना गाडीच्या बाहेर उडी मारली, तर दोन जण गाडीमध्येच अडकले. बुडालेल्या एकाचा मृतदेह सापडला असून दुसरा तरूण बेपत्ता आहे. दुसऱ्या बेपत्ता तरुणाचा शोध सुरू आहे.

पावसाळ्यात नदी, धरणं, धबधबा अशा ठिकाणी पर्यटकांना जाण्यासाठी बंदी घातली जाते. पावसाळ्यात अशा ठिकाणी अपघात होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते. ठाणे आणि मुंबईतसुध्दा पावसाळ्यात धरण, तलाव, नदी, धबधब्याच्या ठिकाणी पर्यटकांना जाण्यासाठी जिल्हा प्रशासनाने बंदी घातली आहे. मात्र तरीसुध्दा पर्यटक स्वत:चा जीव धोक्यात घालून अशा ठिकाणी जातात. गेल्या काही दिवसांपासून धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. अशा परस्थितीत कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी धरण, तलाव, नदी, धबधब्याच्या ठिकाणी पर्यटकांना पिकनीकसाठी जिल्हा प्रशासनाकडून बंदी घालण्यात आली आहे.

Web Title: 5 people drowned in tansa river mumbai three saved successfully one died one missing

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2024 | 02:40 PM

Topics:  

  • Marathi News
  • Mumbai

संबंधित बातम्या

Bhandup Bus Stand Accident: भांडुप बसस्थानक की ‘मृत्यूचा सापळा’? ४ बळींनंतरही प्रशासन ढिम्म; पुन्हा अपघाताने नागरिक संतप्त
1

Bhandup Bus Stand Accident: भांडुप बसस्थानक की ‘मृत्यूचा सापळा’? ४ बळींनंतरही प्रशासन ढिम्म; पुन्हा अपघाताने नागरिक संतप्त

Ahilyanagar News: ‘या’ मागण्यांसाठी 17 लाख शिक्षक बेमुदत संपावर! कर्मचारी संघटनांचा निर्णय
2

Ahilyanagar News: ‘या’ मागण्यांसाठी 17 लाख शिक्षक बेमुदत संपावर! कर्मचारी संघटनांचा निर्णय

Wardha : ST बसमध्ये भोंदू बाबांच्या जाहिरातींचा विळखा  कारवाई करण्याची मागणी
3

Wardha : ST बसमध्ये भोंदू बाबांच्या जाहिरातींचा विळखा कारवाई करण्याची मागणी

Sujat Ambedkar : विधानपरिषद निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर क्रॉस व्होटिंग होणार! 
4

Sujat Ambedkar : विधानपरिषद निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर क्रॉस व्होटिंग होणार! 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.