Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता सत्ताधारी पक्षच निवडणूक आयोग चालवू लागलाय; संजय राऊतांना नेमकं म्हणायचंय काय?

येत्या आठवडाभरात आचारसंहिता लागेल असे सत्ताधारी पक्ष सांगत असतील तर त्यांच्यावर विश्वास ठेवू शकतो. पण निवडणुका कधीही होऊ द्या आमची पूर्ण तयारी झाली आहे. पण त्यांनी इव्हीएम मशीन कुठे दडवून ठेवले आहेत. त्यात बंद दाराआड काय कुरापती केल्या जातात यावर आम्हाला लक्ष ठेवावं लागेल, असंही संजय राऊत यांनी यावेळी म्हटलं आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Oct 11, 2024 | 01:41 PM
आता सत्ताधारी पक्षच निवडणूक आयोग चालवू लागलाय; संजय राऊतांना नेमकं म्हणायचंय काय?
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई:  महाविकास आघाडीची विधानसभा निवडणुकीची तयारी पूर्ण झाली आहे. आता कधीही निवडणुका झाल्या तरी आम्ही तयार आहोत, असा विश्वासही ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.याचवेळी त्यांनी निवडणूक आयोगाकडून निवडणुका जाहीर करण्यास होणाऱ्या विलंबावरही निशाणा साधला आहे. राज्यात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. सर्व राजकीय पक्षांनी निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. राज्यात कोणत्याही क्षणी निवडणुका जाहीर होऊ शकतात.

दरम्यान, येत्या 26 नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेची मुदत संपत आहे. गेल्याच आठवड्यात केंद्रीय निवडणूक आयोगाच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्राचा दौरा करत राज्यातील निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेतला. पण निवडणुका अद्यापही जाहीर झालेल्या नाहीत. यावरून खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकावर निशाणा साधला आहे. ” आता सत्ताधारी पक्षच निवडणूक आयोग चालवू लागला आहे. आता सत्ताधारी पक्षाकडून निवडणूक आयोगाला कार्यक्रम दिले जातात. सत्ताधारी पक्षांकडून निवडणुकांचे निर्णय घेतले जात असल्याचे दिसत आहे.

हेही वाचा: यंदाचा साहित्यक्षेत्रातील नोबेल पुरस्कार जाहीर; दक्षिण कोरियाच्या लेखिकेला मिळाला बहुमान

महाराष्ट्राच्या निवडणुकाही हरयाणा आणि जम्मू कश्मीरसोबत होणे अपेक्षित होते. मात्र, सत्ताधारी पक्षाला ते सोयीचे न वाटल्याने आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी हरयाणा आणि जम्मू-कश्मीर या राज्यांच्या निवडणुकांसोबत वेळ देणे शक्य नसल्याने महाराष्ट्राच्या निवडणुका जाहीर केल्या नाही, असा हल्लाबोलही संजय राऊतांनी केला. जेव्हा त्यांच्याकडे वेळ असतो त्यावेळी ते परदेशात जातात आणि ते ज्यावेळी परदेशात नसतात, त्यावेळी ते कोणत्यातही प्रचारात असतात. आपल्या पंतप्रधानांना ही दोनच कामे आहेत. असं दिसते. असा टोलाही त्यांनी लगावला.

येत्या आठवडाभरात आचारसंहिता लागेल असे सत्ताधारी पक्ष सांगत असतील तर त्यांच्यावर विश्वास ठेवू शकतो. पण निवडणुका कधीही होऊ द्या आमची पूर्ण तयारी झाली आहे. पण त्यांनी इव्हीएम मशीन कुठे दडवून ठेवले आहेत. त्यात बंद दाराआड काय कुरापती केल्या जातात यावर आम्हाला लक्ष ठेवावं लागेल, असंही संजय राऊत यांनी यावेळी म्हटलं आहे.वाचा

Web Title: Now the ruling party has started running the election commission what does sanjay raut really mean nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2024 | 01:41 PM

Topics:  

  • election commission of india
  • Maharashtra Assembly election 2024
  • narendra modi
  • sanjay raut

संबंधित बातम्या

Narendra Modi : ‘आम्ही भारताला गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्त…’, नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिरावर ध्वजारोहण
1

Narendra Modi : ‘आम्ही भारताला गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्त…’, नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिरावर ध्वजारोहण

Ram Mandir Dhwajarohan : राम मंदिरातील धर्मध्वजाचे धार्मिक महत्त्व काय आहे? ४४ मिनिटांचा शुभ मुहूर्त इतका महत्त्वाचा का?
2

Ram Mandir Dhwajarohan : राम मंदिरातील धर्मध्वजाचे धार्मिक महत्त्व काय आहे? ४४ मिनिटांचा शुभ मुहूर्त इतका महत्त्वाचा का?

जोहान्सबर्गमधील IBSA परिषदेत पंतप्रधान मोदींचा सहभाग; संयुक्त राष्ट्रांवर केली नाराजी व्यक्त, काय आहे कारण?
3

जोहान्सबर्गमधील IBSA परिषदेत पंतप्रधान मोदींचा सहभाग; संयुक्त राष्ट्रांवर केली नाराजी व्यक्त, काय आहे कारण?

‘आता बदलाची वेळ…’ ; G-20 मधून पंतप्रधान मोदींचा महत्त्वाचा संदेश; जागतिक विकासासाठी मांडले तीन प्रस्ताव
4

‘आता बदलाची वेळ…’ ; G-20 मधून पंतप्रधान मोदींचा महत्त्वाचा संदेश; जागतिक विकासासाठी मांडले तीन प्रस्ताव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.