Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘…ही तर केजरीवालांच्या भ्रष्टाचाराची हार’; रामदास आठवलेंचा टोला

महाराष्ट्र, हरियाणा आणि आता दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल हा दलित समाजातील मतदारांनी भाजपप्रणित एनडीएला बहुमतांचा कौल दिला असल्याची ग्वाही देत आहे, असा दावाही त्यांनी यावेळी केला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 09, 2025 | 03:36 PM
केजरीवालांच्या भ्रष्टाचाराची हार

केजरीवालांच्या भ्रष्टाचाराची हार

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला बहुमत हा मोदींच्या विकासाचा विजय असून, केजरीवालांच्या भ्रष्टाचाराची ही हार आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे. विजयावर त्यांनी दिल्लीकरांचे आभार मानले. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला दिलेल्या बहुमताबद्दल दिल्लीतील जनतेचे आभार मानत या निवडणूक निकालाचे स्वागत केले.

महाराष्ट्र, हरियाणा आणि आता दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल हा दलित समाजातील मतदारांनी भाजपप्रणित एनडीएला बहुमतांचा कौल दिला असल्याची ग्वाही देत आहे, असा दावाही त्यांनी यावेळी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाचा विकास वेगाने होत आहे. रस्ते, रेल्वे, विमानतळ ही आंतरराष्ट्रीय दर्जाची बांधली जात आहेत. तर सर्वच क्षेत्रात देशाचा विकास होत आहे. त्यामुळे विकासाची दूरदृष्टी असणारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर जनतेचा अतूट विश्वास आहे.

दरम्यान, महाराष्ट्र, हरियाणा आणि आता दिल्लीतिल जनतेने विधानसभा निवडणुकीत भाजपला बहुमत देऊन मोदींवरील विश्वासावर शिक्कामोर्तब केलेले आहे, असे सांगत आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी भ्रष्टाचाराविरुध्द आंदोलन पुकारुन नवे नेतृत्व म्हणून ते पुढे आले. मात्र, भ्रष्टाचाराविरुध्द उभे राहिलेले केजरीवाल झपाट्याने भ्रष्टाचारात गुरफटत गेले, अशी टीकाही त्यांनी केली.

शुध्द पाणी न दिल्याने पराभवाचे पाणी पाजले

दरम्यान, दिल्लीतील जनतेला केजरीवाल न्याय देऊ शकले नाहीत. दिल्लीतील जनतेला पिण्याचे शुध्द पाणीही ते देऊ शकले नाहीत. आप सरकारचे कामकाज ही खराब ठरले, त्यामुळे दिल्लीतील जनतेने अरविंद केजरीवाल यांना पराभवाचे पाणी पाजले आहे, असा टोला रामदास आठवले यांनी लगावला आहे.

पंतप्रधानांकडून जनतेचे आभार

दिल्ली विधानसभेचा निकाल जाहीर झाला. यामध्ये भाजपने 27 वर्षांनी कमबॅक केले आहे. 2020 मध्ये 8 जागा जिंकणाऱ्या भाजपने या निवडणुकीत थेट 48 जागा जिंकल्या आहेत. 10 वर्षांच्या केजरीवालांच्या सत्तेचा गड भाजपने भेदला आहे. नवी दिल्ली मतदारसंघातून अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाला आहे. दिल्लीत आता भाजपचे सरकार येणार हे स्पष्ट होताच कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला. पंतप्रधान मोदी यांनी देखील जनतेचे आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप मुख्यालयात जाऊन विजय साजरा केला आणि कार्यकर्त्यांना संबोधित देखील केले.

Web Title: Ramdas athawale criticized on aap and arvind kejriwal nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2025 | 03:35 PM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • Ramdas Athawale

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: लिटमस टेस्ट! ‘या’ निवडणुकीत ठाकरे बंधूंचे एक पॅनल; युती उद्याच्या निकालावर ठरणार?
1

Maharashtra Politics: लिटमस टेस्ट! ‘या’ निवडणुकीत ठाकरे बंधूंचे एक पॅनल; युती उद्याच्या निकालावर ठरणार?

Eknath Shinde: निवडणुकीआधीच एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; ‘या’ नेत्याने सोडली साथ?
2

Eknath Shinde: निवडणुकीआधीच एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; ‘या’ नेत्याने सोडली साथ?

Mahrashtra Politics: ठाकरे बंधूंच्या एकत्रित येण्याने BMC चे समीकरणे बदलतील का? मनसेमुळे उबाठाला काय होईल फायदा?
3

Mahrashtra Politics: ठाकरे बंधूंच्या एकत्रित येण्याने BMC चे समीकरणे बदलतील का? मनसेमुळे उबाठाला काय होईल फायदा?

‘स्वराज्य मिळालं पण सुराज्य मिळणं बाकी’; मंत्री छगन भुजबळ यांचं विधान
4

‘स्वराज्य मिळालं पण सुराज्य मिळणं बाकी’; मंत्री छगन भुजबळ यांचं विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.