Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mangal Prabhat Lodha: ‘वंदे मातरम्’ राष्ट्रगीताला 150 वर्षे पूर्ण होणार; मंत्री लोढांनी केले ‘हे’ आवाहन

वंदे मातरम गीताला ऐतिहासिक पार्श्वभूमी असून देशप्रेम निर्माण करण्याचे सामर्थ्य या गीतात आहे. भारतमातेच्या या राष्ट्रगीताचा गौरव जनतेच्या उत्सुर्फ सहभागाने झाला पाहिजे, असे मंत्री लोढा म्हणाले आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 01, 2025 | 05:14 PM
Mangal Prabhat Lodha: ‘वंदे मातरम्’ राष्ट्रगीताला 150 वर्षे पूर्ण होणार; मंत्री लोढांनी केले ‘हे’ आवाहन
Follow Us
Close
Follow Us:

सार्ध शताब्दी पूर्ततेच्या निमित्ताने कौशल्य विभागाकडून विविध कार्यक्रम
मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे जनतेला आवाहन
‘वंदे मातरम्’ या भारतमातेच्या राष्ट्रगीताला 150 वर्षे पूर्ण होणार

मुंबई: थोर कवी आणि तत्वज्ञ बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी १८७५ साली लिहिलेल्या ‘वंदे मातरम्’ या भारतमातेच्या राष्ट्रगीताला येत्या ७ नोव्हेंबर रोजी १५० वर्ष पूर्ण होत असल्याने कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने वंदे मातरम गीताच्या सार्ध शताब्दी महोत्सवाच्या लोगो डिझाईन स्पर्धेला सुरुवात झाली आहे.

‘वंदे मातरम्’ हे गीत देशभक्ती आणि राष्ट्रीय अस्मितेचं प्रतीक असून आजही ‘वंदे मातरम्’ ऐकताना भारतीयांच्या मनात देशप्रेमाची ज्योत प्रज्वलित होते या महान साहित्य कृतीला दीडशे वर्ष पूर्ण होत आहेत.या निमित्ताने सार्ध शताब्दी महोत्साच्या अंतर्गत विविध उपक्रम आयोजित केले जाणार आहेत. या महोत्सवाचा लोगो जनतेतुन तयार व्हावा यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले असल्याचे मंत्री  मंगलप्रभात लोढा यांनी स्पष्ट केले आहे.

वंदे मातरम गीताला ऐतिहासिक पार्श्वभूमी असून देशप्रेम निर्माण करण्याचे सामर्थ्य या गीतात आहे. भारतमातेच्या या राष्ट्रगीताचा गौरव जनतेच्या उत्सुर्फ सहभागाने झाला पाहिजे . त्यामुळे आपले मित्र परिवार, संघटना, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये तसेच सामाजिक माध्यमांवर या ऐतिहासिक सोहळ्याला व्यापक रूप देण्याचा आमचा प्रयत्न असून या सार्ध शताब्दी महोत्सव स्पर्धेत सर्वानी सहभाग घ्यावा असे आवाहन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे. यात भाग घेण्यासाठी surl.lu/nmqcfx या लिंकवर क्लिक करावे लागणार आहे. तसेच विशिष्ट क्यूआर कोडवर स्कॅन करावे लागणार आहे. स्पर्धेची अंतिम तारीख १० सप्टेंबर असणार आहे.

“राज्यातील कौशल्य विद्यापीठ, आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र, शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये ‘वंदे मातरम्’च्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जाईल. राज्यातील प्रत्येक तालुक्यात ५ हजारहून अधिक देशप्रेमींसोबत सार्ध शताब्धी महोत्सव साजरा होणार असून त्याची रुपरेषा लवकरच जाहीर करण्यात येईल . त्यासंदर्भात 6 शासकीय आणि 7 अशासकीय सदस्यांची समिती स्थापन करण्यात आलीय. प्रतिष्ठित व्यक्तींचा त्यात समावेश करण्यात आलाय”, अशी माहितीही कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिलीय.

Mangal Prabhat Lodha: ताडदेवमधील रहिवाशांच्या मदतीला धावून आले देवाभाऊ; मंत्री लोढांनी मानले आभार

ताडदेवमधील रहिवाशांच्या मदतीला धावून आले देवाभाऊ

ताडदेव येथील वेलिंग्टन हाइट्स इमारतीसंदर्भात कोर्टाने घरे खाली करण्याचे आदेश दिल्यानंतर रहिवाशांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तक्षेपामुळे रहिवाशांना अखेर न्याय मिळाला आहे. तपासाअंती स्पष्ट झाले की या प्रकरणात रहिवाशांची काहीही चूक नसून बिल्डरकडून गंभीर फसवणूक करण्यात आली होती. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली ऑक्युपन्सी सर्टिफिकेट (OC) व संबंधित फाईल रखडलेल्या होत्या. रहिवाशांवर अन्याय होऊ नये म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने कारवाई करत जर सर्व बाबींचे अनुपालन व्यवस्थित झाले असेल तर ओसी देण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले.

Web Title: Vande mataram geet centenary festival logo design competition begins mangal prabhat lodha mumbai news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2025 | 05:14 PM

Topics:  

  • Mangal Prabhat Lodha
  • Mumbai News
  • Skill Development
  • vande mataram

संबंधित बातम्या

Manoj Jarange Maratha Protest फटाके फोडत गुलाल उधळत करण्यात आला जल्लोष
1

Manoj Jarange Maratha Protest फटाके फोडत गुलाल उधळत करण्यात आला जल्लोष

Manoj Jarange Patil Live: ‘महावादळ’ थंडावले! मनोज जरांगे पाटलांनी सोडले उपोषण; आंदोलकांनी उधळला ‘जल्लोषाचा गुलाल’
2

Manoj Jarange Patil Live: ‘महावादळ’ थंडावले! मनोज जरांगे पाटलांनी सोडले उपोषण; आंदोलकांनी उधळला ‘जल्लोषाचा गुलाल’

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील उधळणार विजयी गुलाल! मराठा आरक्षणाबाबत ‘या’ सहा मागण्या झाल्या मान्य
3

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील उधळणार विजयी गुलाल! मराठा आरक्षणाबाबत ‘या’ सहा मागण्या झाल्या मान्य

Maratha Reservation : आरक्षण मिळेपर्यंत कपडे घालणार नाही; मराठा तरूणाचा अजब निर्धार
4

Maratha Reservation : आरक्षण मिळेपर्यंत कपडे घालणार नाही; मराठा तरूणाचा अजब निर्धार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.