Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Best News: बसच्या घटत्या संख्येसह रिक्षा-टॅक्सी भाडेवाढ; मुंबईकरांच्या खिशाला मोठी कात्री

शेअर रिक्षांसाठीही जादा पैसे प्रवास खर्च वाढल्याने शहरात शेअर रिक्षा-टॅक्सीची मागणी वाढलीआहे. प्रवाशांच्या सोयीसाठी शहरात शेअर रिक्षा-टॅक्सीची संख्या वाढली आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Mar 29, 2025 | 02:45 PM
देशात सर्वात जास्त विसराळू ठरले मुंबईकर; तर पुण्याचा तिसरा क्रमांक

देशात सर्वात जास्त विसराळू ठरले मुंबईकर; तर पुण्याचा तिसरा क्रमांक

Follow Us
Follow Us:

मुंबई:   शहरातील अनेक बस मार्ग बंद आहेत. त्यामुळे प्रवाशांना नाईलाजास्तव रिक्षा-टॅक्सीने प्रवास करावा लागत आहे. त्यातच फेब्रुवारी महिन्यापासून रिक्शा-टॅक्सीचे भाडे तीन रुपयांनी वाढले आहे. त्यामुळे मुंबईकरांना जादा पैसे मोजून रोजचा प्रवास करावा लागत आहे. प्रवास खर्च वाढल्याने शेअर रिक्षा-टॅक्सीची मागणी वाढत आहे. घडाळ्याच्या काट्यावर धावणाऱ्या मुंबईकरांना वेळ फार महत्वाची आहे. त्यामुळे मुंबईकर एका-एका मिनिटांचा विचार करतात. परंतु सध्या बेस्टच्या बसची संख्या कमी असल्याने शहरातील काही बस मार्ग बंद करण्यात आले आहेत. तर अनेक बस मार्गावर बस ४५ ते ५० मिनिटांनी येते. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होते. अशातच १ फेब्रुवारी पासून मुंबईत रिक्षा-टॅक्सीच्या भाडे दरात तीन रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना एक किलोमीटर जाण्यासाठी देखील रिक्शाकरिता २६ आणि टॅक्सीकरिता २८ रुपये मोजावे लागत आहे.

शेअर रिक्षांसाठीही जादा पैसे प्रवास खर्च वाढल्याने शहरात शेअर रिक्षा-टॅक्सीची मागणी वाढलीआहे. प्रवाशांच्या सोयीसाठी शहरात शेअर रिक्षा-टॅक्सीची संख्या वाढली आहे. शेअर रिक्षा-टॅक्सीमध्ये सुमारे ४० टक्के वाढ झाली आहे. सकाळी आणि सायंकाळी पीक अवरमध्ये रेल्वे स्टेशन ते कार्यालय, गृह संकुलांदरम्यान शेअर रिक्षा-टॅक्सी चालविण्यात येते. त्यानंतरच्या वेळेत रिक्षा-टॅक्सी मीटरप्रमाणे धावतात पूर्व आणि पश्चिम उपनगरात शेअर रिक्षा मोठ्या प्रमाणात धावतात. परंतु याकरिता मुंबईकरांना थोड़े जादा पैसे मोजावे लागत आहेत.

Santosh Deshmukh Case : ‘…हे तर गृहखात्याचं अपयश’; संजय राऊतांची टीका

परिस्थिती आणखी बिकट होणार

बेस्टच्या स्वमालकीच्या एक हजार बसवी वयोमर्यादा संपुष्टात येत आहे. येत्या काही वर्षांत त्या भंगारात जाणार आहे. त्यामुळे बस अभावी हळुहळू अनेक मार्गावरील बस मार्ग बंद करण्याची वेळ बेस्ट उपक्रमावर येणार आहे. घाटकोपर ते अंधेरी दरम्यान मेट्रो १ धावते. त्यामुळे या दरम्यानच्या प्रवाशांची रस्ते वाहतूकीच्या कोडींतून सुटका झाली असून त्यांना बसकरिता वाट पहावी लागत नाही. परंतु मेट्रोच्या एकेरी प्रवासासाठी ५० रुपये मोजावे लागतात.

10 लाखांच्या चोरीच्या 6 तासात लागला छडा; पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या

प्रवाशांचे आर्थिक गणित कोलमडले

बेस्टच्या प्रवासाकरिता ५ रुपये लागतात. तेथे आता शेअर रिक्शाकरिता १२ रुपये तर टॅक्सी करिता १५ ते २० रुपये प्रति प्रवासी द्यावे लागतात. त्यामुळे प्रवाशांचे आर्थिक गणित कोलमडत आहेत. त्यातच एका घरातील तीन ते चार सदस्य कामानिमित्त, महाविद्यालयात जात असतील तर त्यांचा महिन्याचा खर्च वाढला आहे. त्यामुळे बेस्टच्या बसची संख्या वाढविण्याची मागणी जोर धरत आहेत. शेअर रिक्शा-टॅक्सीमुळे मुंबईकरांचा प्रवास बेस्टच्या बसच्या तुलनेत वेगवान झाला असला तरी त्यासाठी जादा पैसे मोजावे लागत आहेत.

दक्षिण मुंबईत शेअर टॅक्सी

चर्चगेटकडून कुलाबा, नरीमनपॉईंट आदी परिसरात जाणाऱ्या बस आहेत, पण शेअर टॅक्सीधी सेवा जास्त आहे. त्यामुळे प्रवासी शेअर टॅक्सीची वाट धरतात. काही प्रवासी ग्रुप करून चालत सीएसएमटी स्थानकापर्यंत येतात.

Web Title: Mumbaikars are frustrated by the increase in rickshaw and taxi fares along with the decreasing number of buses nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2025 | 02:45 PM

Topics:  

  • Mumbai

संबंधित बातम्या

Maharashtra Rain Alert: राज्यात पावसाचा जोर वाढणार! ‘या’ जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट; ६ जुलैपर्यंत अतिमुसळधार पावसाचा इशारा
1

Maharashtra Rain Alert: राज्यात पावसाचा जोर वाढणार! ‘या’ जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट; ६ जुलैपर्यंत अतिमुसळधार पावसाचा इशारा

Mumbai Rain: मुंबईत मुसळधार पावसामुळे जलाशयांची जलपातळी ७.३१ टक्क्यांवर, पवई तलाव ओव्हरफ्लो; शुक्रवारी BMC ची मोठी बैठक
2

Mumbai Rain: मुंबईत मुसळधार पावसामुळे जलाशयांची जलपातळी ७.३१ टक्क्यांवर, पवई तलाव ओव्हरफ्लो; शुक्रवारी BMC ची मोठी बैठक

Mumbai Rain : मुसळधार पावसात मुंबईत आणखी एक दुर्घटना; साकीनाक्यात 25 फूट खोल मॅनहोलमध्ये पडून एकाचा मृत्यू
3

Mumbai Rain : मुसळधार पावसात मुंबईत आणखी एक दुर्घटना; साकीनाक्यात 25 फूट खोल मॅनहोलमध्ये पडून एकाचा मृत्यू

हेल्मेट सक्तीचा नियम सर्वांसाठी नाही! ‘या’ नागरिकांना कायद्यातून विशेष सूट; बॉम्बे उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण खुलासा
4

हेल्मेट सक्तीचा नियम सर्वांसाठी नाही! ‘या’ नागरिकांना कायद्यातून विशेष सूट; बॉम्बे उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.