
Vice President : सी. पी. राधाकृष्णन आज घेणार देशाच्या उपराष्ट्रपतिपदाची शपथ; राष्ट्रपती भवनात पार पडणार सोहळा
मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची देशाचे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाल्यानंतर महाराष्ट्राबाबत कृतज्ञता व्यक्त केली. ‘मी एक प्रखर देशभक्त आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून माझा कार्यकाळ माझ्या आयुष्यातील सर्वात आनंददायी अनुभव होता. महाराष्ट्रात येण्यापूर्वी मी झारखंडचे राज्यपाल म्हणून काम करत होतो’, असे नव्या उपराष्ट्रपतींनी सांगितले.
सी. पी. राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपतिपदी निवड झाली आहे. त्यानंतर आता त्यांनी ज्या-ज्या राज्यात राज्यपाल पद स्वीकारले, त्याची माहिती दिली. महाराष्ट्रात येण्यापूर्वी मी झारखंडचे राज्यपाल म्हणून काम करत होतो. तेलंगणाचे राज्यपाल आणि पुद्दुचेरीचे उपराज्यपाल म्हणून अतिरिक्त कार्यभारही सांभाळला. पण, माझा सर्वात आनंददायी कार्यकाळ महाराष्ट्रात होता. महाराष्ट्रातील माझ्या १३ महिन्यांच्या कार्यकाळात मला दोन मुख्यमंत्र्यांसोबत काम करण्याची संधी मिळाली, हे माझे भाग्यवान होते. जेव्हा मी राज्यपाल म्हणून पदभार स्वीकारण्यासाठी महाराष्ट्रात आलो, तेव्हा सध्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री होते.
नंतर त्यांच्या जबाबदाऱ्या बदलल्या. दोघांमध्ये नेहमीच सौहार्दपूर्ण संबंध होते. त्यांच्यात टीमवर्कची भावना होती. या महान राज्यासोबत काम करणे, ही माझ्यासाठी एक मोठी उपलब्धी होती. हे राज्याच्या राजकीय संस्कृती आणि उदारतेबद्दल बरेच काही सांगते, असेही त्यांनी म्हटले आहे.
दिल्लीत येणं म्हणजे…
नंतर त्यांन पुढे सांगितले, ‘महाराष्ट्राच्या गाण्यात दिल्लीच्या संदर्भात एक सुंदर ओळ आहे. दिल्लीत येणे म्हणजे अनेक प्रकारे दुसऱ्या सिंहासनाचे, म्हणजेच आपल्या लोकशाहीचे रक्षण करण्यासारखे आहे’, असेही त्यांनी म्हटले आहे.
मंगळवारी झाली उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक
जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक मंगळवारी झाली. विरोधी गटातील इंडिया आघाडी व सत्ताधारी एनडीएने सोमवारी जोरदार तयारी केल्याचे दिसून आले. सत्ताधारी एनडीएकडून सी. पी. राधाकृष्णन विरूद्ध इंडिया आघाडीकडून सुदर्शन रेड्डी यांच्यात प्रमुख लढत पार पडली. या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार सी.पी. राधाकृष्णन यांचा विजय झाला आहे.