
शिवसेना-भाजपाने मिळविले यश
विधानसभेतील मताधिक्य जमेची बाजू
असगोली गटातील विजयाचे गणित फसले
दिनेश चव्हाण/गुहागर: गुहागरमध्ये २००९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर गतवैभव गमावून बसलेल्या भाजपा-शिवसेना युतीला अखेर विजयाचा सूर गवसला आहे. परिणामी गुहागर नगरपंचायतीनंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत यश संपादन करून शिमग्याआधीच युतीच्या कार्यकत्यांनी डोल वाजविले. २०१२ च्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीचे नंदकिशोर पवार यांनी पंचायत समितीचे सभापतीपद खेचून आणले होते.
मात्र ती सत्ता केवळ एक टर्मच राहिली. यामुळे चिपळूण येथून गुहागरचे पालकत्व घेतलेले विद्यमान आमदार भास्कर जाधव यांनी २००६ मध्ये गुहागरात प्रवेश केला. राष्ट्रवादीमधून विधानपरिषदेवर काम करताना तालुक्याची बांधणी केली. जे आज त्यांच्यापासून लांब आहेत त्यांनी या नेतृत्वाला बळ दिले. सन २००९ रोजीची गुहागर विधानसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेना युतीमध्ये झालेले विभाजन त्यांना फायद्याचे ठरले. गुहागरवर आमदार जाधवांच्या रुपाने राष्ट्रवादीचे अधिराज्य आहे.
Guhagar News: निवडणुकीत गुहागरात रंगणार चुरशीच्या लढती; कोण बाजी मारणार?
आमदारकीबरोबर २०१२ ची जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक लढवून १० जागांपैकी केवळ १ जागा भाजपच्या वाट्याला दिली. त्यानंतर सलग दोन टर्म भाजपा शिवसेना युतीला आमदार जाधव यांनी रोखून धरले. मात्र जाधव यांच्या शिवसेना घरवापसीने भाजपा त्यांना मनापासून स्वीकारण्यास तयार नव्हती. असे असले तरी भाजपाने विधानसभेला युतीचा धर्म पाळला. परंतु शिवसेनेचेच दोन भाग झाल्याने धनुष्यबाणाची शिवसेना व भाजपा यांचा सूर आता चांगलाच जमला आहे. गुहागरमध्ये आमदार भास्कर जाधवरुपी वादळ युतीला रोखण्यात यश आले असले तरी जिल्हा परिषद गटाचा विचार केला तर केवळ १४५५ मतांचा फरक आहे.
Guhagar News: एसटी ‘रातराणी’ची प्रकाशवाट अंधुक; प्रवासात हेडलाईटचा प्रकाश कंदिलासारखा
ठाकरे गटाला आघाडी फायदेशीर
ठाकरे शिवसेनेने गुहागर नगरपंचायतीत मनसेबरोबर केलेली आघाडी फायद्याची ठरली आहे. श्रृंगारतळी गट मनसेला देऊन त्याचा दुहेरी लाभ मिळवण्याचा प्रयत्न केला. तर मनसेचे प्रमोद गांधी यांना विधानसभा निवडणुकीमधील पुर्वानुभव फायद्याचा ठरला आहे, पंचायत समितीमधील दोन्ही गण गेले तरी जिल्हा परिषदेवर पकड कायम ठेवण्याचे गणित त्यांना श्रृंगारतळी पंचायत समिती गणातून गवसले, भाजपाचे डॉ. राजेंद्र पवार यांची लोकप्रियता राजकारणात उपयोगी ठरली नाही. डॉ. राजेंद्र पवार गेली काही वर्षे राजकारणामधून बाहेर होते. त्याचाही तोटा पहावयास मिळतो. भाजपा शिवसेनेच्या उजडामा कट्पात असगोली गटामध्ये सर्वच शिवसेनेचे उमेदवार दिल्याने युतीचे गणित फसल्यासारखे झाले.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.