Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मनोहर जोशी यांच्या निधनाने नांदवीकर हळहळले, वर्गमित्रासह संपूर्ण गाव गहिवरला

सर नसते तर आज नांदवी हे नाव देखील कुणाला माहित झाले नसते. ज्या गावात चक्क भिक्षा मागून खायची वेळ आली होती. त्या गावाला मुख्यमंत्री आणि लोकसभा अध्यक्ष सारखं उच्च पद मिळाल्या नंतरही ते कधीच विसरले नाहीत.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Feb 24, 2024 | 11:15 AM
मनोहर जोशी यांच्या निधनाने नांदवीकर हळहळले, वर्गमित्रासह संपूर्ण गाव गहिवरला
Follow Us
Close
Follow Us:

माणगाव (भारत गोरेगावकर) – राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सर्व चाहत्यांचे सर मनोहर जोशी यांच्या दुखःद निधनाचे वृत्त त्यांचे जन्मगाव असलेल्या नांदवी गावात पोहचले आणि नांदवीसह परिसरावर शोककळा पसरली आपल्या लाडक्या सरांच्या आठवणींनी अनेकांना हुंदका लागला तर त्यांच्यासमवेत शालेय जीवन जगणाऱ्या वर्गमित्रांना अश्रू अनावरण झाले.

रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात अत्यंत छोटेशे असणारे नांदवी गाव जगाच्या नकाशावर आले ते मनोहर जोशी सरांमुळे. याच गावात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत एका सदन कुटुंबात जन्मलेल्या सरांचे नांदवीमध्ये इयत्ता चौथीपर्यंत शिक्षण झाले. घरोघरी माधुकरी मागायची आणि उदरनिर्वाह करत शिक्षण घ्यायचे हि घरची परिस्थिती चौथी नंतरच्या पुढील शिक्षणासाठी त्यांना महाडला जावे लागले. तिथेही तोच दिनक्रम असायचा बदलत्या परिस्थितीनुसार बालपणीचा मामा सुधीर जोशी यांच्याकडे पनवेल येथे गेले. तिथे सकाळी दारोदार पेपर टाकायचे आणि शिक्षण घ्यायचा हा वसा त्यांनी सोडला नाही. पुढे मुंबई महापालिकेत नोकरी लागली आणि सरांनी नांदवी येथून आपला मुक्काम मुंबईत स्थिर केला.

शिक्षणाची आवड आणि अथक परिश्रम घेण्याची तयारी असणाऱ्या सरांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सहवास लाभला आणि नांदवी सारख्या छोट्याशा खेडेगावात एकेकाळी माधुकरी मागून जीवन जगणारे सर नगरसेवक, महापौर, विरोधीपक्ष नेते, मुख्यमंत्री, खासदार, केंद्रीय मंत्री ते थेट लोकसभेचे अध्यक्ष बनले. परंतु ते कधीच जन्मभूमीला विसरले नाही. प्रत्येक पदावर असताना त्यांनी आपल्या नांदवी गावाला भेट देऊन आपुलकी कायम जपली होती. इतकेच काय तर बाळासाहेबांच्या हस्ते नांदवीतील दत्त मंदिराचे भूमिपूजन देखील खास ग्रामस्थांच्या आग्रहाखातर केले होते. सर कधी गावाला विसरले नाही म्हणून गाव आजही सरांना विसरलेलं नाही मात्र त्यांच्या निधनाने एक अतूट नातं आज निखळलं आहे.

सर आणि मी एकाच वर्गात शिकत होतो. त्यावेळेस कबड्डी हा सरांचा आवडता विषय त्यांच्यासोबत मी अनेकदा माधुकरी मागायला जात असे ही ओळख ते कधीच विसरले नाही. कुठल्याही पदावर ते असुदेत पण नांदवीत आले की पहिला निरोप पाठवायचे त्या महादेवला बोलवा मला खुप बरे वाटायचे. मी भेटलो की ‘काय महादेव कसा आहेस? पोपटीच्या शेंगा खायच्या आहेत घेऊन ये…. हे अधिकार वाणितले शब्द आता कानावर येणार नाहीत याचे दुखः आहे. हे बोलताना सरांचे वर्गमित्र महादेव देवघर यांना अश्रु अनावर झाले.

सर नसते तर आज नांदवी हे नाव देखील कुणाला माहित झाले नसते. ज्या गावात चक्क भिक्षा मागून खायची वेळ आली होती. त्या गावाला मुख्यमंत्री आणि लोकसभा अध्यक्ष सारखं उच्च पद मिळाल्या नंतरही ते कधीच विसरले नाहीत. याउलट या गावाची भरभराट कशी होईल इथला सामाजिक सलोखा टिकून कसा राहील यासाठी त्यांनी सतत प्रयत्न केले. गावातील शिक्षण पध्दतीत सुधार केला म्हणूनच आज मुलं माध्यमिक पर्यंतचे शिक्षण घेत आहेत असा नांदवीचा कोहिनूर हरपला हे सांगताना माजी सरपंच विलास म्हसकर यांचा कंठ दाटून आला.

सरांच्या कृपेने गावाला नाव प्राप्त झाले. कुठेही गेलो आणि नांदवी येथून आलोय असे सांगितले. तर लगेच लोकं विचारतात सरांचे गाववाले का? अशी ओळख केवळ सरां मुळेच मिळाली. त्यांच्या मुळेच आम्हाला शिवसेनाप्रमुखांना जवळून पहाता आले. काही झाले तरीही निष्ठा सोडायची नाही अशी तंबी कायम देणारे सर आता परत दिसणार नाही हे मनाला अस्वस्थ करते अशी भावना राजेश म्हाप्रलकर यांनी व्यक्त केली.

Web Title: Nandvikar was saddened by the death of manohar joshi the entire village along with his classmate was devastated mangaon raigad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2024 | 11:15 AM

Topics:  

  • maharashtra
  • Mangaon

संबंधित बातम्या

नीट पेपरफुटी प्रकरणी मॉडर्न महाविद्यालयाची मोठी कारवाई; मनीषा मांढरेचं अखेर निलंबन
1

नीट पेपरफुटी प्रकरणी मॉडर्न महाविद्यालयाची मोठी कारवाई; मनीषा मांढरेचं अखेर निलंबन

Pune : पुण्यात संग्रहालयांविषयी वाढतेय जागरूकता; वारसा जपण्याकडे नव्या पिढीचा कल
2

Pune : पुण्यात संग्रहालयांविषयी वाढतेय जागरूकता; वारसा जपण्याकडे नव्या पिढीचा कल

Farmers Protest: ‘गिरीष महाजन हटाव’, सुपीक जमिनी वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा
3

Farmers Protest: ‘गिरीष महाजन हटाव’, सुपीक जमिनी वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा

पशुखाद्यात अनुदानित युरियाची भेसळ, पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण; संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी
4

पशुखाद्यात अनुदानित युरियाची भेसळ, पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण; संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.