
इगतपुरी ते आमने या दरम्यान सध्या केवळ दोन एक्झिट आहेत. अपघात झाल्यास जखमींना तातडीने मदत मिळवण्यासाठी हे अंतर अडथळा ठरत आहे. जर कसारा येथे नवीन एक्झिट उभारला, तर अवघ्या १ किलोमीटरवर वैद्यकीय उपचार आणि मदत उपलब्ध होऊ शकते. तसेच मुंबई-नाशिक महामार्ग हा पर्यायी मार्ग म्हणून केवळ दीड किलोमीटरवर उपलब्ध होईल. त्यामुळे राज्य शासनाने तातडीने सर्वेक्षण करून कसारा एक्झिट मंजूर करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
MSC Bank Scam सुनेत्रा पवारांना मोठा दिलासा; शिखर बँक गैरव्यवहार प्रकरणाला पूर्णविराम
सिमेंट काँक्रीटमुळे रस्ता कायम तापलेला असतो, वेगाच्या मर्यादेचे उल्लंघन आणि रस्त्याची रचना यामुळे वाहनांच्या टायरवर ताण येतो, त्यातच रस्त्यांवरील साध्यामध्ये असलेले अंतर वाहनांच्या सुरक्षिततेसाठी धोक्याचे ठरत आहे. समृद्धी महामार्गावर अपघात झाल्यानंतर टोल प्रशासन किया महामार्ग व्यवस्थापनाकडून कोणतीही तात्काळ मदत मिळत नसल्याची ओरड प्रवाशांनी केली आहे.
प्राथमिक उपचार आणि रुग्णवाहिका मिळण्यास विलंब होत असल्याने अनेक जखमींना वेळेवर उपचार न मिळाल्याने मृत्यूला सामोरे जावे लागत आहे. या मार्गावर दररोज होणान्या अपघातांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ३० ते ३५ लोकांना आतापर्यंत या महामार्गावर कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे. प्रशासनाने केवळ टोल वसुलीवर लक्ष न देता प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
८८ इगतपुरी से आमने यादरम्यान अपघात
घेऊन जाण्यास दहा ते पंधरा किलोमिटरचा फेरा मारावा लागतो. रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी एक तर पिंप्रीसदी एक्झिट किया शहापूरजवळील खुट्चर एक्सिट या मार्ग रुगणालय गाठावे लागते. अपघात जास्त ठिकाण व रुग्णालय यातील अंतर फारसे मोठे असणे तसेच समृद्धी एक्झिट हेदेखील खूप दूरवर असल्याने समृद्धी महामार्ग जणू मृत्यूचे दार ठरत आहे.
– राजेश असोपा, प्रवासी, शहापूर
राज्यसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीत तिढा कायम; काँग्रेसनंतर आता ठाकरे गटाने केला दावा
मी, अंतरावर ८८ समृद्धी महामार्गावर आमने से सिन्नर या १२० कि. मी. कोणत्याही प्रकारची सोय सुविधा उदाहरणार्थ हॉटेल, पेट्रोल पंप, गॅरेज यासह क्रेन, रुग्णालय या गोष्टी उपलब्ध नसल्याने वाहतूकदार प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असतात. या त्रुटीमुळे अपघातग्रस्तांना मदत मिळत नसल्याने समृद्धी महामार्ग वरील प्रवास हा जिकरीचा ठरत आहे. अलीम शेख, वाहनचालक
सिमेंट काँक्रीटचा असल्याने या मागांवर प्रवास करताना वाहनाचे टायर अधिक गरम होतात, १००% फिटनेस नसलेल्या गाड्यांमुळे टायर फुटण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. इगतपुरी ते कसारा आणि कसारा ते आमने दरम्यान रस्त्यामध्ये सुमारे एक इंचाचे ‘गॅप’ आहेत, यामुळे भरधाव वेगात असलेली वाहने जोरदार आदळतात आणि चालकाचे नियंत्रण सुटून अपघात होतात.