Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai News: “पालकमंत्री असताना सुधारणा का केली नाही?”, मंदा म्हात्रेंची गणेश नाईकांवर टीका

नवी मुंबईतील 14 गावं बाहेर काढण्यावरून चांगलेच राजकारण तापले आहे. यामुळे शिवसेना शिंदे गट आणि गणेश नाईक आमने-सामने आले आहेत. आता या प्रकरणावर आमदार मंदा म्हात्रेंनी देखील नाईकांवर टीका केली आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Oct 06, 2025 | 09:21 PM
“पालकमंत्री असताना सुधारणा का केली नाही?”, मंदा म्हात्रेंची गणेश नाईकांवर टीका

“पालकमंत्री असताना सुधारणा का केली नाही?”, मंदा म्हात्रेंची गणेश नाईकांवर टीका

Follow Us
Close
Follow Us:

गेल्या काही दिवसांपासून नवी मुंबईतील 14 गावं बाहेर काढण्यावरून शिवसेना शिंदे गट आणि गणेश नाईकांच्या समर्थकांमध्ये चांगलाच वाद पाहायला मिळाला. कधी नव्हे ते महायुतीतील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले. आता याच प्रकरणात भाजप आमदार मंदा म्हात्रेंनी सुद्धा भाष्य केले आहे.

ही १४ गावे दत्तक घ्यावी

मंदा म्हात्रे यांनी गणेश नाईकांवर निशाणा साधत म्हटले की, “गणेश नाईक फक्त नवी मुंबईचे नाहीत, तर महाराष्ट्राचे मंत्री आहेत. जेव्हा १४ गावे बाहेर काढायची होती, तेव्हापासून मी त्यांच्या सोबत आहे आणि आजही त्यांच्या सोबत आहे. मुख्यमंत्र्यांच्या नावाने सांगितले जाते की ही गावे काढून टाकू, मात्र मी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे विनंती केली आहे की ही १४ गावे दत्तक घेऊन महाराष्ट्र शासनाकडे असावीत.

Maharashtra Rain Alert: पुढील 48 तासांमध्ये काहीतरी भयंकर घडणार! महाराष्ट्राला IMD ने दिला ‘हा’ इशारा

पालकमंत्री असताना या गावांमध्ये सुधारणा का केली नाही?

गणेश नाईक यांनी पालकमंत्री असताना या गावांमध्ये सुधारणा का केली नाही? आज या १४ गावांना नवी मुंबई महापालिकेत का समाविष्ट करायचे नाही, हेही त्यांनी स्पष्ट केले पाहिजे. नवी मुंबई महापालिकेवर कोणताही अतिरिक्त भार पडणार नाही, शासन हा भार उचलेल. तसेच मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आले आहे की १४ गावे बाहेर काढू नयेत.

नवी मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार करून पालिका लुटून खालली!

नवी मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार करून पालिका लुटून खालली. नाव घेऊन सांगेल की, पालिका कोणी कोणी कशी लुटली. जर या ग्रामस्थांना सुख सुविधा मिळाल्या, तर काय चुकीचे आहे. मी सुद्धा या गावकऱ्यांच्या पाठीशी उभी आहे आणि बघते की कोण १४ गावे बाहेर काढणार आहे.

मनोज जरांगेंनी बोलताना मर्यादा पाळावी, आरक्षणाचा लढा हा…; काँग्रेसच्या नेत्याने सुनावले खडेबोल

गणेश नाईक नवी मुंबईचे मंत्री नाही तर महाराष्ट्राचे मंत्री

पुढे मंदा म्हात्रे म्हणाल्या,”गणेश नाईक यांच्याकडे मंत्री पद आहे. त्यांनी नवीन महानगरपालिका द्यावी. ते काय फक्त नवी मुंबईचे मंत्री नाही तर महाराष्ट्राचे मंत्री आहेत.”

Web Title: Navi mumbai news manda mhatre critisise ganesh naik on 14 village issue

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2025 | 09:21 PM

Topics:  

  • Ganesh Naik
  • MLA Manda Mhatre
  • Navi Mumbai

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime: मुख्याध्यापिकेकडून अपमान झाल्याने दहावीतील विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल, नेमकं कारण काय?
1

Navi Mumbai Crime: मुख्याध्यापिकेकडून अपमान झाल्याने दहावीतील विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल, नेमकं कारण काय?

Navi Mumbai: नालायक शब्द तुम्हाला का झोंबला? सुरज पाटील यांची नरेश म्हस्केंवर टीका
2

Navi Mumbai: नालायक शब्द तुम्हाला का झोंबला? सुरज पाटील यांची नरेश म्हस्केंवर टीका

Navi Mumbai : नवरात्रोत्सवात नियमांचे उल्लंघन; नेरूळ पोलिसांची कारवाई,ध्वनी प्रदूषण प्रकरणी चार मंडळांवर गुन्हा दाखल
3

Navi Mumbai : नवरात्रोत्सवात नियमांचे उल्लंघन; नेरूळ पोलिसांची कारवाई,ध्वनी प्रदूषण प्रकरणी चार मंडळांवर गुन्हा दाखल

Navi Mumbai : गरबा खेळण्याच्या वादातून रक्तपात, सिक्युरिटी गार्डचा जागीच मृत्यू
4

Navi Mumbai : गरबा खेळण्याच्या वादातून रक्तपात, सिक्युरिटी गार्डचा जागीच मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.