नवी मुंबईत एपीएमसीमधील एका कामगाराने “मी दहशतवादी आहे” असा खोटा बॉम्ब कॉल केल्याने मोठी घबराट निर्माण झाली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संबंधिताला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
नवी मुंबईतील वाशी शिक्षण विभागात २२ हजारांची लाच घेताना अधिकारी राजेंद्र अहिरे एसीबीच्या जाळ्यात अडकले. बिल पास करण्यासाठी लाच मागितल्याची तक्रार होती. एसीबीने सापळा रचून कारवाई केली.
मुंबईत १,००,००० आसनक्षमतेचे जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम बांधले जाणार आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमला टक्कर देण्यासाठी नवी मुंबईत एका नवीन प्रकल्पाची सुरुवात होणार आहे.
नवी मुंबई येथे जागतिक दर्जाचे स्टेडियम उभारण्यासंदर्भात मंत्रालयात आढावा बैठक झाली. या बैठकीस उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी तसेच सिडकोचे अधिकारी उपस्थित होते.
नवी मुंबईत 21 वर्षीय तरुणाने मॅट्रिमोनी साईटवर बनावट ओळख वापरून महिलांची फसवणूक केली. स्वतःला शास्त्रज्ञ/डॉक्टर सांगत लैंगिक व आर्थिक शोषण केलं. अनेक शहरांत गुन्हे उघड; आरोपी अटकेत.
वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रात सुरू असलेल्या ‘महालक्ष्मी सरस’ प्रदर्शनाला मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून दररोज मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
नवी मुंबईतील गुरुनाथ चिचकर आत्महत्या प्रकरणात एनसीबी अधिकाऱ्यांवर छळ, खंडणी व धमक्यांचे गंभीर आरोप झाले आहेत. पत्नीच्या तक्रारीनंतर उच्च न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल झाला असून तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मीरा-भाईंदर शहरातील काशिमिरा परिसरातील प्लेझंट पार्क येथे लागलेल्या भीषण आगीमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. आगीच्या तडाख्यात आजूबाजूच्या ३ ते ४ इमारती आल्याने रहिवाशांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये शुक्रवारी आयत्यावेळी घाईघाईत सादर केलेल्या प्रस्तावाच्या खाली कार्यालय रामचंद्र निवास बोनकोडे गाव असा उल्लेख असल्याचे निदर्शनास आले होते.
घणसोलीत शिक्षिकेने विद्यार्थ्यांवर चोरीचा खोटा आरोप करत पैशांची मागणी केल्याचा आरोप आहे. मानसिक छळामुळे दोन विद्यार्थ्यांनी टोकाचे पाऊल उचलले; एकाचा मृत्यू झाला, तर दुसऱ्यावर उपचार सुरू आहेत.
स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया यांच्या सहकार्याने राबविण्यात आलेल्या या मोहिमेचा उद्देश समुदायाभिमुख फिटनेसला चालना देणे आणि लोकांना सक्रिय व निरोगी जीवनशैलीकडे प्रेरित करणे हा होता.
“नशा मुक्त भारत २०२८” या अभियानाच्या अनुषंगाने पंजाब राज्यातून ट्रक तसेच रेल्वे मार्गाने हेरॉईन व अफू यांसारख्या अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळ्यांविरुद्ध नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात गुन्हे दाखल करण्यात आले.