
गटातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या तातडीच्या बैठकीत मोर्चाची घोषणा करण्यात आली. बैठकीत, बाजार समितीचे सभापती मोहन जाधव, प्रदेश चिटणीस प्रतापराव पवार, दिलीप पिसाळ, मदन भोसले, निलेश शिंदे, विक्रम पिसाळ, जयसिंग जगताप, यांच्यासह, कार्यकर्त्यांनी तीव्र शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या. बावधन व शेंदुरजणे गणातील कार्यकर्ते उपस्थित होते. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश मिळावा, यासाठी अनेक कार्यकर्त्यांमार्फत मकरंद पाटील यांच्या विनवण्या करणाऱ्या, बेईमानी ऋतुजा शिंदे यांनी जिल्हा परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देऊन पुन्हा निवडून येऊन दाखवावे, असे आव्हानही बैठकीत गटातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या संतप्त कार्यकर्त्यांनी दिले.
मोहन जाधव म्हणाले, निष्ठावंतांना डावलून ऋतुजा शिंदे यांना उमेदवारी दिली. त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांनी विरोधात काम केले तरीही राष्ट्रवादीच्या मकरंद पाटील यांच्या सच्चा कार्यकर्त्यांनी रक्ताचे पाणी करून त्यांना निवडून आणले. निलेश शिंदे म्हणाले, नेत्यांनी आवश्यक ती सर्व मदत व कार्यकर्त्यांनी पदरमोड करून बावधनबाहेरचा उमेदवार जिल्हा परिषदेला प्रथमच निवडून आणला. त्यामुळे या पती-पत्नीची गद्दारी कदापी मान्य होणारी नाही. दिलीप पिसाळ, मदन भोसले यांनीही मनोगत व्यक्त केले.
वाई तालुक्यातील भोगावमध्ये अवकाळीचा तडाखा; घरावरील पत्रे उडाले अन्…; प्रांताधिकाऱ्यांनी केली पाहणी
वडील संचालक असलेल्या किसन वीर कारखान्यावर मोर्चा काढणारा विराज शिंदे लबाड आणि राजकारणातील भोंदू आहे. काँग्रेस, शिवसेना अशा सर्व पक्षात फिरून आलेल्याने आता नवा घरोबा केला आहे. तो कोणाशीच निष्ठेने राहणारा नाही. आज तो कार्यकर्त्यांना मी राष्ट्रवादी काँग्रेसचाच आहे, असे सांगत असला तरी, त्याच्यावर विश्वास ठेवण्याच्या लायकीचा नाही.
स्वतःच्या परखंदी गावातील कार्यकर्त्यांनी त्याचे वर्तन लक्षात घेऊन, त्याच्या पक्षप्रवेशास विरोध केला होता. मात्र मकरंद पाटील या नेतृत्वावर असलेल्या निष्ठेमुळे आम्ही प्रामाणिकपणे पक्षाबरोबर राहिलो, असेही कार्यकर्त्यांनी सांगितले. ऋतुजा व विराज शिंदे यांच्यामुळे जिल्ह्यात पक्षाला कमीपणा आला आहे, त्यामुळे त्याच्या घरावरील मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होऊन तीव्र निषेध करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.