वाई येथे वादळी पावसाने मोठे नुकसान
प्रांत अधिकाऱ्यांनी केली प्रत्यक्ष भेट व पाहणी
राज्यभरात अवकळी पावसाचा धुमाकूळ
वाई: भोगाव येथील वादळी पावसात नुकसान झालेल्या कुटुंबाच्या नुकसानीची दखल घेत वाईचे उपविभागीय अधिकारी (प्रांताधिकारी) डॉ. योगेश खरमाटे यांनी थेट पीडित कुटुंबाच्या घरी जाऊन पाहणी केली. वाई तालुक्यातील मौजे भोगाव (नेहर वस्ती) येथे दि. १ एप्रिल रोजी दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास.चक्रीवादळासारख्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने जोरदार तडाखा दिला.
या वादळात सुनील नारायण येवले यांच्या घरावरील चार खोल्यांचे पत्रे उडून गेल्याने घरातील धान्य, फर्निचर व इतर संसारोपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे येवले कुटुंब अक्षरशः बेघर झाले या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी उपविभागीय अधिकारी डॉ. श्री. योगेश खरमाटे,गट विकास अधिकारी नारायण घोलप यांनी पीडित कुटुंबाला समक्ष भेट दिली.
प्रांत अधिकाऱ्यांनी नुकसानीचे सविस्तर निरीक्षण करून पीडित कुटुंबाशी संवाद साधला व शासन स्तरावरून तात्काळ मदत मिळवून देण्याचे ठाम आश्वासन दिले. या प्रांत भेटीदरम्यान भोगाव तलाठी शितल वाघ, भोगाव ग्रामपंचायत अधिकारी योगेश खोपडे व महसूल सहायक दत्तात्रय काळे उपस्थित होते. स्थानिक प्रशासनाने वादग्रस्त भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचा व मदत मागण्याचा आवाहन केले आहे.
भोर तालुक्यात कुटुंबे उघड्यावर; गारपीठ अन् वादळी पावसामुळे शेतीसह घरांचे अतोनात नुकसान
भोर तालुक्यात कुटुंबे उघड्यावर
भोर शहरासह ग्रामीण भागात सोमवारी झालेल्या अवकाळी गारपीठ आणि वादळी पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतकरी आणि ग्रामस्थांचे नुकसान झाले आहे. अनेक घरांचे छप्पर उडाल्याने सामान्य नागरिकांचे संसार उघड्यावर आले आहेत. निसर्गाच्या या लहरीपणामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. भर पावसात आणि गारपिठीने काढणीला आलेल्या गहू, कांदा, ज्वारी, यासारख्या रब्बी हंगामातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आंबा बागांनाही या अवकाळीचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे बागायतदार शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतीच्या झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक गणितांची जुळवाजुळव कोलमडली आहे. तर जनावरांसाठी साठवलेला चारा भिजल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
पिंपरी-चिंचवडला अवकाळीचा तडाखा; कडाक्याच्या उन्हात कोसळल्या पावसाच्या सरी
वादळी वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की, अनेक ठिकाणी विद्युत तारा तुटल्याने व खांब पडल्याने विद्युत पुरवठा खंडीत झाला. महावितरणचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यातील वडगाव डाळ येथे ग्रामदेवता यात्रेनिमित्त उभारलेला मांडव उडून गेला. उज्वला विजय चव्हाण यांच्या घराचे छप्पर उडून सुरेश यदु गायकवाड यांच्या घरावर पडल्याने त्यांच्याही घराचे नुकसान झाले. त्यात ते जखमी झाले आहेत. इतर गावांत देखील घरांची पडझड झालेल्या नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत.






