Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

किती ते दुर्दैव! व्यापाऱ्याकडून शेतकऱ्याच्या कष्टाची चेष्टा; 1 किलो कांद्याला मिळतोय फक्त 1 रुपयांचा भाव

पुन्हा एकदा शेतकऱ्यांना कांदा रडवताना दिसत आहे. मात्र, यावेळी व्यापारी देखील शेतकऱ्याला रडवत आहेत. एके ठिकाणी तरी १ किलो कांद्याला फक्त 1 रुपयांचा भाव मिळाला आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 05, 2026 | 09:25 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Close
Follow Us:
  • शेतकऱ्यांच्या कांद्याला कवडीमोल भाव
  • 1 किलो कांद्याला मिळतोय फक्त 1 रुपयांचा भाव
  • बळीराजा हवालदिल
एकीकडे कांद्याला प्रतिक्विंटल २ ते ३ हजार रुपये भाव दर्शवला जात असला, तरी प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांकडून कांदा १०० ते २०० रुपये प्रतिक्विंटल, तर काही ठिकाणी १ ते ३ रुपये प्रतिकिलो दराने खरेदी केला जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. राज्यभरातील कांदाउत्पादक बळीराजासाठी ही अत्यंत लाजिरवाणी आणि वेदनादायक परिस्थिती मानली जात आहे.

गेल्या ८ ते १० वर्षांपासून कांद्याला अपेक्षित दर मिळत नसल्याचे चित्र आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही कांद्याच्या भावाने शेतकऱ्यांना रडवले असून, या परिस्थितीचा फायदा घेत व्यापारी मात्र मोठ्या प्रमाणात नफा कमावताना दिसत आहेत. शेतकऱ्यांकडून अत्यल्प दराने खरेदी केलेला कांदा ग्राहकांना मात्र १५ ते २० रुपये प्रतिकिलो दराने विकला जात असल्याचे चित्र सध्या नगर जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये पाहायला मिळत आहे.

Shivsena : “आम्ही फोटो आणि पीपीटी दाखवत नाही, काम करून दाखवतो…”, शायना एन.सी. यांचा उबाठावर हल्लाबोल

बाजारात १५ ते २५ रुपये किलो दर

शहरातील उपनगरीय भाजीबाजारांचा आढावा घेतला असता, कांद्याचे दर १५ ते २५ रुपये प्रतिकिलो असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, हाच कांदा शेतकऱ्यांकडून १ रुपयापर्यंतच्या कवडीमोल दराने खरेदी केला जात आहे. या तफावतीवर सरकार ठोस उपाययोजना करणार का, असा सवाल उपस्थित होत असून हमीभावाबाबत कोणतीही ठोस कृती न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना रडवणारी घटना

उन्हाळी हंगामातील जुना कांदा संपल्यानंतर सध्या बाजारात नवीन लाल कांदा दाखल झाला आहे. मात्र, या कांद्यालाही योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. पाथर्डी तालुक्यातील धारवाडी येथील शेतकरी अर्जुन सोनवणे यांना त्यांच्या कांद्याला अवघा १ रुपया प्रतिकिलो दर मिळाल्याने, बाजारात माल नेण्यासाठीचे गाडीभाडेही स्वतःच्या खिशातून भरावे लागले, ही घटना कांदाउत्पादकांच्या डोळ्यांत पाणी आणणारी ठरली आहे.

Pratap Sarnaik : एसटीच्या ताफ्यात ८ हजार नवीन बसेस वर्षाअखेरपर्यंत दाखल करा, प्रताप सरनाईक यांचा सज्जड दम

शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर, व्यापाऱ्यांचा नफा

कांद्याच्या शेतीसाठी लागणारा खर्चही सध्याच्या दरात वसूल होणे अशक्य झाले आहे. अनेक शेतकऱ्यांनी बँकांकडून कर्ज घेऊन पीक घेतले असून, ते कसे फेडायचे हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. दुसरीकडे, व्यापारी मात्र शेतकऱ्यांच्या अडचणींचा फायदा घेत कवडीमोल दरात कांदा खरेदी करून तो ग्राहकांना अवाच्या सव्वा दराने विकत असल्याचे चित्र ग्रामीण भागात सर्रास पाहायला मिळत आहे. यातून शेतकऱ्यांची उघड लूट आणि ग्राहकांची फसवणूक होत असल्याचा आरोप केला जात आहे.

Web Title: Onion farmers are getting only rs 1 per kilogram of onion

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 05, 2026 | 09:25 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • onion farmers

संबंधित बातम्या

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु
1

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन
2

Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण
3

Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Ahilyanagar News: एसटी चालकांना मेजवानी अन् प्रवाशांची होतेय वसुली! चक्क अनधिकृत थांबा केला तयार
4

Ahilyanagar News: एसटी चालकांना मेजवानी अन् प्रवाशांची होतेय वसुली! चक्क अनधिकृत थांबा केला तयार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.