Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पालघर जिल्हा शोकाकुल! आंबिस्ते आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांची आत्महत्या

आंबिस्ते आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या आत्महत्येने पालघर जिल्हा शोकाकुल झाला आहे. आमदार हरिश्चंद्र भोये आणि खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी घटनास्थळी भेट देत सखोल चौकशीची मागणी केली.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Oct 12, 2025 | 05:12 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

दीपक गायकवाड, मोखाडा: वाडा तालुक्यातील आंबिस्ते गावात घडलेली दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांची आत्महत्येची घटना संपूर्ण पालघर जिल्ह्याला हादरवून गेली आहे. कै. दिगंबर पाडवी प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या हृदयद्रावक घटनेनंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून ग्रामस्थ, पालक, शिक्षक आणि सामाजिक संघटनांकडून तीव्र दुःख, संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे.

दिल्लीमध्ये TGT शिक्षक पदांसाठी करा अर्ज! ‘या’ ठिकाणी करता येणार Apply

मृत विद्यार्थ्यांची नावे देविदास परशुराम नवले (वय १५, इयत्ता दहावी) आणि मनोज सिताराम वड (वय १४, इयत्ता नववी) अशी आहेत. हे दोघे अनुक्रमे मौजे बिवलपाडा आणि दापटी (ता. मोखाडा) येथील रहिवासी होते. दोघेही आश्रमशाळेतच निवासी असून, शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये नेहमीप्रमाणेच राहायचे. मात्र, आत्महत्येच्या काही तासांपूर्वी त्यांनी कोणतीही तक्रार किंवा असामान्य वर्तन दाखवले नव्हते, अशी माहिती सहाध्यायी व शिक्षकांकडून मिळाली आहे. त्यामुळे ही घटना नेमकी कशामुळे घडली, याचे रहस्य अद्याप उकललेले नाही.

स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. प्राथमिक तपासात या घटनेमागे ताण, मानसिक दबाव किंवा इतर कोणते कारण होते का, हे शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. पोलिसांनी विद्यार्थ्यांचे मित्र, शिक्षक तसेच आश्रमशाळेतील कर्मचारी यांचे जबाब घेण्यास सुरुवात केली आहे. या घटनेमुळे आश्रमशाळेतील वातावरण पूर्णपणे स्तब्ध झाले असून विद्यार्थ्यांमध्ये भीती आणि अस्वस्थता निर्माण झाली आहे. या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच विक्रमगड विधानसभेचे आमदार हरिश्चंद्र भोये यांनी तातडीने मोखाडा तालुक्यातील आत्महत्याग्रस्त विद्यार्थ्यांच्या कुटुंबांची भेट घेतली. त्यांनी या कठीण प्रसंगी कुटुंबीयांना धीर देत मानसिक आधाराचा हात दिला. आमदार भोये यांनी प्रशासनाशी चर्चा करून पीडित कुटुंबांना शक्य ती सर्व शासकीय मदत उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. ते म्हणाले, “अशा घटना समाजासाठी अत्यंत वेदनादायक आहेत. आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी तसेच त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी अधिक सक्षम व्यवस्था उभारणे ही काळाची गरज आहे. विद्यार्थी हे आपल्या भविष्यातील शिल्पकार आहेत आणि त्यांचे आयुष्य असे अकाली संपणे ही समाजाची सामूहिक अपयशाची निशाणी आहे.”

घटनेची माहिती मिळताच पालघरचे खासदार डॉ. हेमंत सवरा आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनीही घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी शाळेच्या परिसराची पाहणी करत संबंधित शिक्षक, पोलिस आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. घटनेमागील कारणांचा सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली. डॉ. सवरा म्हणाले, “अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी शासनाने तत्काळ मानसिक आरोग्य सल्लागार नेमावेत. विद्यार्थ्यांना शैक्षणिक तसेच भावनिक ताणाचा सामना करावा लागतो, आणि त्यासाठी त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले पाहिजे.” या घटनेनंतर जिल्हा परिषदेचे शिक्षण विभाग, आदिवासी विकास विभाग तसेच महिला व बालविकास विभागाने प्राथमिक चौकशी सुरू केली आहे. आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या राहण्याची आणि सुरक्षेची परिस्थिती तपासली जात आहे. काही सामाजिक संघटना आणि शिक्षक संघटनांनी प्रशासनाला मागणी केली आहे की, प्रत्येक आश्रमशाळेत काउन्सेलिंग सेल स्थापन करावा, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना नियमित मानसिक मार्गदर्शन दिले जाईल.

स्थानिक ग्रामस्थांनीही आश्रमशाळांमध्ये असलेल्या सुविधांची तपासणी करण्याची आणि विद्यार्थ्यांना सुरक्षित व समंजस वातावरण उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. काही पालकांनी सांगितले की, “आमची मुले दूरच्या गावांमधून शिक्षणासाठी आश्रमशाळेत पाठवतो. ती सुरक्षित आहेत की नाहीत, हे आम्हाला माहिती नसते. त्यामुळे शासनाने या शाळांवर नियमित देखरेख ठेवावी.” या घटनेने पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचा गंभीर प्रश्न अधोरेखित केला आहे. ग्रामीण आणि आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांना अनेकदा घरगुती अडचणी, अभ्यासाचा दबाव, एकटेपणा आणि संवादाचा अभाव यामुळे मानसिक ताण सहन करावा लागतो. याच कारणांमुळे काही विद्यार्थी आत्महत्येच्या टोकाला पोहोचतात. तज्ञांच्या मते, शिक्षण संस्थांमध्ये केवळ अभ्यासावर नव्हे तर विद्यार्थ्यांच्या भावनिक आणि मानसिक स्थितीवर लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे.

पालघर जिल्हा हा आदिवासी बहुल क्षेत्र असल्याने अनेक विद्यार्थी दूरच्या गावांमधून आश्रमशाळांमध्ये येतात. त्यामुळे त्यांना घरापासून दूर राहण्याची सवय, पालकांशी संवादाचा अभाव आणि शैक्षणिक वातावरणाशी जुळवून घेण्यात अडचणी येतात. अशा पार्श्वभूमीवर शासनाने आश्रमशाळांमध्ये समुपदेशक, मानसिक आरोग्य अधिकारी आणि विद्यार्थी कल्याण अधिकारी नेमण्याची गरज व्यक्त केली जात आहे. घटनेनंतर अनेक सामाजिक कार्यकर्ते, स्थानिक नेते आणि शिक्षकांनी पीडित कुटुंबीयांना भेटून सांत्वन केले. काही संघटनांनी मृत विद्यार्थ्यांच्या स्मरणार्थ आश्रमशाळांमध्ये ‘विद्यार्थी सुरक्षाजागर मोहीम’ सुरू करण्याची घोषणा केली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना ताण-तणाव व्यवस्थापन, आत्मविश्वास वाढविणे, संवाद कौशल्ये आणि भावनिक सक्षमता याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.

MPSC ची बंपर भरती! विविध पदांसाठी करता येणार अर्ज, जाणून घ्या सॅलरी

प्रशासनाने प्राथमिक तपासानंतर काही महत्वाचे निर्णय घेण्याचे संकेत दिले आहेत. त्यामध्ये आश्रमशाळांमध्ये CCTV कॅमेरे, रात्रीच्या वेळचे पर्यवेक्षक कर्मचारी, तसेच विद्यार्थ्यांच्या समस्यांसाठी गोपनीय हेल्पलाइन क्रमांक सुरू करण्याचा विचार केला जात आहे. आंबिस्ते आश्रमशाळेतील ही दुर्दैवी घटना केवळ दोन जिवांची हानी नाही, तर ती आपल्या शिक्षण व्यवस्थेतील मानसिक आरोग्याच्या दुर्लक्षाचे प्रतीक आहे. शासन, शिक्षक, पालक आणि समाज यांना मिळूनच विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित आणि सहानुभूतीपूर्ण वातावरण निर्माण करावे लागेल. विद्यार्थ्यांचे आयुष्य वाचवणे ही सर्वांची जबाबदारी आहे, आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज आहे.

Web Title: Palghar district in mourning two students of ambiste ashram school commit suicide

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2025 | 05:11 PM

Topics:  

  • palghar

संबंधित बातम्या

नाडी थांबलेली, हात तुटलेला… पण MBBS विद्यार्थ्याच्या तत्परतेने दुचाकीस्वाराचा जीव…
1

नाडी थांबलेली, हात तुटलेला… पण MBBS विद्यार्थ्याच्या तत्परतेने दुचाकीस्वाराचा जीव…

Palghar News : इथे ओशाळली माणूसकी, प्रसूत महिलेला रुग्णवाहीकेने अर्ध्यावर सोडले अन्… ; अंगावर काटा आणणारी दुर्दैवी घटना
2

Palghar News : इथे ओशाळली माणूसकी, प्रसूत महिलेला रुग्णवाहीकेने अर्ध्यावर सोडले अन्… ; अंगावर काटा आणणारी दुर्दैवी घटना

Eknath Shinde : “निवडणूक होताच नगर परिषद भवन बांधणार…”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून प्रचाराला सुरुवात
3

Eknath Shinde : “निवडणूक होताच नगर परिषद भवन बांधणार…”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून प्रचाराला सुरुवात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.