भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवक तथा गटनेता अशोक शेळके यांच्या कार्यालयाच्या सोहळ्याची निमंत्रण पत्रिका भाजपच्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चेचा विषय बनली असून पक्षांतर्गत धुसफुशीला तोंड फुटले आहे.
पालघर ते त्र्यंबक दरम्यानच्या १५४ किलोमीटर लांबीच्या महामार्गाच्या रुंदीकरणाचा मुद्दा सध्या जिल्ह्यातील राजकारण व प्रशासनाच्या केंद्रस्थानी आला आहे. महामार्ग विभागाने २ वेळा दुरुस्ती व मजबुतीकरणाची कामेही केली.
वाढती लोकसंख्या, शहरांचा झपाट्याने होत असलेला भौगोलिक विस्तार आणि महसूल विभागाच्या कामकाजाचा वाढता व्याप लक्षात घेऊन प्रशासन अधिक कार्यक्षम व लोकाभिमुख करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
डहाणू तालुक्यात आंबेसरी बारीपाडा परिसरात मोठ्या प्रमाणात साठवून ठेवलेल्या महाराष्ट्रात प्रतिबंधित गुटखा व पानमसाल्यावर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत तब्बल २० लाख ७० हजार रुपयांचा तंबाखूजन्य माल जप्त केला आहे.
पालघर तालुक्यातील सरावली ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत, सामाजिक कार्यकर्ते अमोल गर्ने यांनी पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांची भेट घेतली
नालासोपारा पूर्वेकडेल जाबरपाडा येथील अनधिकृत बांधकामांवर कारवाईसाठी गेलेल्या वसई-विरार महापालिकेच्या पथकावर हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. यासंबधित प्रकरणी ३० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विक्रमगड तालुक्यातील फुटखंड पाडा रस्त्याचे काम रखडल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. काम पुन्हा सुरु करण्याची मागणी होत असून न झाल्यास आंदोलन करु असे ग्रामस्थांनी म्हटले आहे.
वसई पूर्वेकडील नायगावच्या टिवरी परिसरात तब्बल १००० कोटी रुपयांचा जमीन घोटाळा उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. बनावट कागदपत्रे आणि कायदेशीररित्या रद्द झालेल्या मुखपत्राचा आधार घेत फिर्यादीची ६५.३३ एकर जमीन हडपल्या…
२०२६ च्या बजेटमध्ये पालघरच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर देण्यात आला असून, महिलांपासून मच्छीमारांपर्यंत आणि शेतकऱ्यांपासून तरुणांपर्यंत सर्वांसाठीच आनंदाची बातमी आहे. मुलींना सुरक्षा आणि शिक्षण मिळण्याची शक्यता आहे.
वसई-विरार महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करत असताना निवडून आलेल्या बविआच्या नगरसेवकांनी माहिती लपवून ठेवल्याप्रकरणी त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्याची मागणी भाजपचे नितीन ठाकूर यांनी केली आहे.
विद्यार्थ्यांमध्ये पुस्तक वाचनाची गोडी निर्माण होऊन त्यांचा शैक्षणिक, वैचारिक व बौद्धिक विकास घडतो, असा विश्वास पालघरच्या जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी व्यक्त केला.
पालघर जिल्ह्यातील नायगाव येथील एका सलूनमध्ये ‘कश्मीर बनेगा पाकिस्तान’ हे गाणं वाजवल्याचा धक्कादायक प्रकार पोलिसांच्या सतर्कतेमुळे समोर आला आहे. या गंभीर घटनेची दखल घेत पोलिसांनी या सलून चालकास अटक केली…
लघुउद्योगातून कष्टाने कमावलेल्या मालमत्तेचे सोनेरुपी प्रतीक अनधिकृत सावकारांचे आकाश करतंय गिळंकृत. अशीच घटना पालघरमध्ये घडली असून सदर लघु उद्योजकाने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली आहे
गुजरातच्या उंबरगाव येथील सोळसुंबा या ग्रामपंचायतीने महाराष्ट्रातील वेवजी ग्रामपंचायत हद्दीत घुसखोरी केल्याचा आरोप या ग्रामपंचायतीने केला आहे. या संदर्भात आज दोन्ही जिल्हा प्रशासनाकडून संयुक्त हद्द निश्चितीची मोजणी सुरू
सरावली येथील गो ग्रीन इकोटेक सोल्युशन कंपनीकडून नियमबाह्यपणे घातक रासायनिक घनकचऱ्याची प्रक्रिया केली जात असल्याचा आरोप आहे.याचपार्श्वभूमीवर कंपनीवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
पालघरमधील कासा पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलवलेल्या महिलेवर हवालदार शरद बोगाडे यांनी लैंगिक अत्याचार केला. आरोपी ताब्यात घेतला गेला, गुन्हा दाखल, पोलीस निरीक्षक बदली; तपास सुरू आहे.
'डहाणू नगरपरिषद निवडणुकीत भाजप विरुद्ध शिवसेना शिंदे गट अशी थेट लढत होत आहे. दोन्ही पक्षांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावत डोअर टू डोअर प्रचारास सुरवात केली आहे.